शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गोलंदाजीस चांगली मदत

By admin | Updated: January 24, 2017 00:36 IST

भारतीय संघ पाच महिन्यांनंतर होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी आता वन-डे सामना खेळणार नाही. पण कर्णधार विराट कोहलीला

कोलकाता : भारतीय संघ पाच महिन्यांनंतर होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी आता वन-डे सामना खेळणार नाही. पण कर्णधार विराट कोहलीला याबाबत चिंता नाही. टी-२० क्रिकेट अधिक खेळल्यामुळे संघाला ५० षटकांच्या सामन्यातील डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करण्यास मदत मिळेल, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. भारतीय संघाला रविवारी अखेरच्या वन-डे लढतीत पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा सफाया करता आला नाही. आता भारत जून महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी वन-डे सामना खेळणार नाही. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कोहली म्हणाला, ‘‘वन-डे सामना खेळण्याची संधी मिळणार नसल्याचा काही परिणाम होणार नाही. आम्ही जेवढे अधिक टी-२० सामने खेळू त्याचा लाभ वन-डेमध्ये डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करण्यास होईल याचा आम्हाला नक्कीच लाभ मिळेल.’’इंग्लंडमधील वातावरणाबाबत बोलताना कोहली म्हणाला, ‘‘तेथे धावा कशा वसूल करता येतील, याचा विचार करणे आवश्यक आहे. तंत्र मजबूत असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये धावा करणे शक्य होते.’’ फलंदाजांसाठी अनुकूल ठरलेल्या मालिकेत भारताच्या सलामीवीरांना छाप सोडता आली नाही. पण कर्णधाराने शिखर धवन अ‍ॅन्ड कंपनीची पाठराखण केली. विराट म्हणाला, ‘‘खेळाडूंना सूर गवसण्यासाठी वेळ देणे आवश्यक असते. आपल्या सलामीवीरांचे मनोधैर्य कायम राखणे गरजेचे आहे. एक-दोन तांत्रिक बाबींची उणीव दूर केली म्हणजे त्यांना नक्की सूर गवसेल.’’(वृत्तसंस्था)आश्विनच्या सान्निध्यात राहायला आवडले असते : रसूल४भारतीय संघात खेळणारा काश्मीर खोऱ्यातील पहिला क्रिकेटपटू अशी रसूलची ओळख आहे. तो म्हणाला, ‘‘आश्विनला विश्रांती देण्यात आली हे माहीत नव्हते. मला बीसीसीआय कार्यालयातून फोन आला त्या वेळी आश्विनसोबत वास्तव्य करायला व त्याच्याकडून टीप्स घ्यायला मिळेल, म्हणून मी आनंदी झालो. आश्विनसारख्या खेळाडूसोबत सात दिवस वास्तव्य म्हणजे बरेच काही शिकणे असा अर्थ आहे.’’४मी मुश्ताक अली ट्रॉफीसाठी जम्मूत राज्य संघासोबत सराव करीत होतो. सकाळी बीसीसीआयमधून फोन आला. आता मी दिल्लीकडे रवाना होत आहे. २०१४ मध्ये ढाका येथे बांगला देशविरुद्ध एकमेव वन-डे खेळल्यानंतर गोलंदाज म्हणून माझ्यात फार सुधारणा घडल्याचे रसूलने सांगितले. ४यंदा रणजी करंडकाआधी एनसीएत केवळ फिरकीपटूंसाठी शिबिर झाले. तेथे मला नरेंद्र हिरवाणी आणि निखिल चोप्रा यांचे मार्गदर्शन मिळाले. एनसीएतील २० दिवस माझ्यासाठी लाभदायी ठरले. गोलंदाजीचे आकलन करण्याची संधी मिळाली, असे रसूलचे मत आहे.यंदा रणजी करंडकात ३८ गडी बाद करणारा रसूल झटपट क्रिकेटमध्ये चेंडू हवेत वेगाने फेकतो. इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात भारत अ कडून ३८ धावांत तीन गडी बाद केल्यामुळे भारतीय संघात स्थान मिळाले असावे, असे रसूलचे मत आहे. रसूलला आता टीम इंडियाचे मुख्य कोच आणि दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याविषयी रसूल म्हणाला, ‘‘मला कुंबळेंसोबत फार वेळ चर्चा करण्याची संधी मिळाली नाही. आता मात्र बरेच काही शिकायला मिळेल, अशी आशा आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल खेळणारा रसूल विराटच्या नेतृत्वात देशासाठी विशेष कामगिरी करण्यास उत्सुक आहे.’’आश्विन, जडेजा यांना टी-२० साठी विश्रांतीनवी दिल्ली : कसोटी आणि वन-डे मालिकेतील विजयात मोलाची भूमिका बजाविणारे रविचंद्रन आश्विन, तसेच रवींद्र जडेजा यांना इंग्लंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. लेगस्पिनर अमित मिश्रा, तसेच आॅफस्पिनर परवेझ रसूल या दोघांचे स्थान घेतील.बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय निवड समितीने संघव्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर आश्विन, जडेजा यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. अमित मिश्रा आणि परवेझ रसूल हे त्यांचे स्थान घेतील. मालिकेतील पहिला सामना कानपूर येथे २६ जानेवारीला, दुसरा सामना नागपुरात २९ जानेवारीला, तसेच तिसरा सामना १ फेब्रुवारी रोजी बंगळुरूयेथे होईल. ३४ वर्षांच्या मिश्राने मागचा वन-डे सामना न्यूझीलंडविरुद्ध आॅक्टोबरमध्ये खेळला. त्याने १८ धावांत पाच गडी बाद केले होते. तो इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी संघात होता, पण एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. रसूल एकमेव वन-डे २०१४ मध्ये खेळला, पण आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्याचा त्याला अनुभव नाही. रणजी करंडकातील शानदार कामगिरीमुळे त्याला संघात निवडण्यात आले.