शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

गोलंदाजीस चांगली मदत

By admin | Updated: January 24, 2017 00:36 IST

भारतीय संघ पाच महिन्यांनंतर होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी आता वन-डे सामना खेळणार नाही. पण कर्णधार विराट कोहलीला

कोलकाता : भारतीय संघ पाच महिन्यांनंतर होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी आता वन-डे सामना खेळणार नाही. पण कर्णधार विराट कोहलीला याबाबत चिंता नाही. टी-२० क्रिकेट अधिक खेळल्यामुळे संघाला ५० षटकांच्या सामन्यातील डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करण्यास मदत मिळेल, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. भारतीय संघाला रविवारी अखेरच्या वन-डे लढतीत पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा सफाया करता आला नाही. आता भारत जून महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी वन-डे सामना खेळणार नाही. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कोहली म्हणाला, ‘‘वन-डे सामना खेळण्याची संधी मिळणार नसल्याचा काही परिणाम होणार नाही. आम्ही जेवढे अधिक टी-२० सामने खेळू त्याचा लाभ वन-डेमध्ये डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करण्यास होईल याचा आम्हाला नक्कीच लाभ मिळेल.’’इंग्लंडमधील वातावरणाबाबत बोलताना कोहली म्हणाला, ‘‘तेथे धावा कशा वसूल करता येतील, याचा विचार करणे आवश्यक आहे. तंत्र मजबूत असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये धावा करणे शक्य होते.’’ फलंदाजांसाठी अनुकूल ठरलेल्या मालिकेत भारताच्या सलामीवीरांना छाप सोडता आली नाही. पण कर्णधाराने शिखर धवन अ‍ॅन्ड कंपनीची पाठराखण केली. विराट म्हणाला, ‘‘खेळाडूंना सूर गवसण्यासाठी वेळ देणे आवश्यक असते. आपल्या सलामीवीरांचे मनोधैर्य कायम राखणे गरजेचे आहे. एक-दोन तांत्रिक बाबींची उणीव दूर केली म्हणजे त्यांना नक्की सूर गवसेल.’’(वृत्तसंस्था)आश्विनच्या सान्निध्यात राहायला आवडले असते : रसूल४भारतीय संघात खेळणारा काश्मीर खोऱ्यातील पहिला क्रिकेटपटू अशी रसूलची ओळख आहे. तो म्हणाला, ‘‘आश्विनला विश्रांती देण्यात आली हे माहीत नव्हते. मला बीसीसीआय कार्यालयातून फोन आला त्या वेळी आश्विनसोबत वास्तव्य करायला व त्याच्याकडून टीप्स घ्यायला मिळेल, म्हणून मी आनंदी झालो. आश्विनसारख्या खेळाडूसोबत सात दिवस वास्तव्य म्हणजे बरेच काही शिकणे असा अर्थ आहे.’’४मी मुश्ताक अली ट्रॉफीसाठी जम्मूत राज्य संघासोबत सराव करीत होतो. सकाळी बीसीसीआयमधून फोन आला. आता मी दिल्लीकडे रवाना होत आहे. २०१४ मध्ये ढाका येथे बांगला देशविरुद्ध एकमेव वन-डे खेळल्यानंतर गोलंदाज म्हणून माझ्यात फार सुधारणा घडल्याचे रसूलने सांगितले. ४यंदा रणजी करंडकाआधी एनसीएत केवळ फिरकीपटूंसाठी शिबिर झाले. तेथे मला नरेंद्र हिरवाणी आणि निखिल चोप्रा यांचे मार्गदर्शन मिळाले. एनसीएतील २० दिवस माझ्यासाठी लाभदायी ठरले. गोलंदाजीचे आकलन करण्याची संधी मिळाली, असे रसूलचे मत आहे.यंदा रणजी करंडकात ३८ गडी बाद करणारा रसूल झटपट क्रिकेटमध्ये चेंडू हवेत वेगाने फेकतो. इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात भारत अ कडून ३८ धावांत तीन गडी बाद केल्यामुळे भारतीय संघात स्थान मिळाले असावे, असे रसूलचे मत आहे. रसूलला आता टीम इंडियाचे मुख्य कोच आणि दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याविषयी रसूल म्हणाला, ‘‘मला कुंबळेंसोबत फार वेळ चर्चा करण्याची संधी मिळाली नाही. आता मात्र बरेच काही शिकायला मिळेल, अशी आशा आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल खेळणारा रसूल विराटच्या नेतृत्वात देशासाठी विशेष कामगिरी करण्यास उत्सुक आहे.’’आश्विन, जडेजा यांना टी-२० साठी विश्रांतीनवी दिल्ली : कसोटी आणि वन-डे मालिकेतील विजयात मोलाची भूमिका बजाविणारे रविचंद्रन आश्विन, तसेच रवींद्र जडेजा यांना इंग्लंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. लेगस्पिनर अमित मिश्रा, तसेच आॅफस्पिनर परवेझ रसूल या दोघांचे स्थान घेतील.बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय निवड समितीने संघव्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर आश्विन, जडेजा यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. अमित मिश्रा आणि परवेझ रसूल हे त्यांचे स्थान घेतील. मालिकेतील पहिला सामना कानपूर येथे २६ जानेवारीला, दुसरा सामना नागपुरात २९ जानेवारीला, तसेच तिसरा सामना १ फेब्रुवारी रोजी बंगळुरूयेथे होईल. ३४ वर्षांच्या मिश्राने मागचा वन-डे सामना न्यूझीलंडविरुद्ध आॅक्टोबरमध्ये खेळला. त्याने १८ धावांत पाच गडी बाद केले होते. तो इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी संघात होता, पण एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. रसूल एकमेव वन-डे २०१४ मध्ये खेळला, पण आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्याचा त्याला अनुभव नाही. रणजी करंडकातील शानदार कामगिरीमुळे त्याला संघात निवडण्यात आले.