शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

विजयाचे श्रेय गोलंदाजांना : गौतम गंभीर

By admin | Updated: April 22, 2015 03:09 IST

कोलकाता नाईट रायडर्सने काल दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर सहा गडी राखून विजय मिळविला. कर्णधार गौतम गंभीरने या विजयाचे श्रेय

नवी दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्सने काल दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर सहा गडी राखून विजय मिळविला. कर्णधार गौतम गंभीरने या विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले आहे. यजमान संघाला कमी धावसंख्येवर रोखल्यामुळे हा विजय साकारला, असे गंभीर म्हणाला.केकेआरच्या उमेश यादव (२/१८), पीयूष चावला (२/२७) आणि मोर्ने मोर्कल (२/३0) यांच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा डाव आठ बाद १४६ असा गुंडाळला गेला. सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गंभीर म्हणाला, ‘‘गेल्या वर्षीपेक्षा आजची विकेट वेगळी होती. ही खेळपट्टी कशी बदलेल याचा अंदाज लावणे कठीण होते. आम्ही येथे अनेक रणजी सामने खेळलो असलो तरी पिचचे स्वरूप हवामानावर बरेचसे अवलंबून असते. दिल्लीला हरविणे सोपे नव्हते, हा एक महत्त्चाचा सामना होता, कारण त्यांच्याकडे युवराजसिंग आणि अँजेलो मॅथ्यूज यांसारखे मॅचविनर खेळाडू आहेत. त्यामुळे आमचा मार्ग सोपा नव्हता.’’ गंभीर पुढे म्हणाला, ‘‘मी शेवटपर्यंत टिकून राहायचे ठरविले होते. विजयासाठी आघाडीफळीपैकी कोणीतर एकाने १७-१८ षटके टिकून खेळायचे अशी आमची रणनीती होती. त्यात मीच पुढाकार घेतला. कर्णधाराने आपली जबाबदारी पार पाडली तर, इतरांकडून अपेक्षा करू शकतो.’’