शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

Fifa World Cup 2022 India: फीफा वर्ल्ड कपमध्ये का खेळत नाही भारत? एकदा संधी मिळाली होती पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 12:19 IST

२० नोव्हेंबर पासून फीफा विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

नवी दिल्ली : आता जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार २० नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे. 

फीफा विश्वचषक २०२२ मध्ये एकूण ३२ संघ सहभागी होत आहेत, मात्र यामध्ये नेहमीप्रमाणे भारताला स्थान मिळाले नाही. कारण भारतीय संघ पुन्हा एकदा फीफा विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यामध्ये अपयशी झाला. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पात्रता फेरीतच दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र कतार, सौदी अरेबिया, इराण, जपान, आणि दक्षिण कोरिया या आशियातील संघांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारताने देखील एकदा या फुटबॉल विश्वचषकात जागा मिळवली होती मात्र एका कारणामुळे संघाचे ते स्वप्न स्वप्नच राहिले. 

शूज घालूनच खेळण्याची दिली होती परवानगी१९५० साली ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकासाठी भारत पात्र ठरला होता, तरीही संघाला सहभाग घेता आला नव्हता. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे तेव्हा भारतीय खेळाडूंना अनवाणी पायाने फुटबॉल खेळण्याची सवय होती, जी त्यांच्यासाठी घातक ठरली. मोहम्मद अब्दुल सलीम नावाचा भारतीय फुटबॉलपटू त्याच्या काळात स्कॉटिश फुटबॉल क्लब 'सेल्टिक'साठी अनवाणी पायाने हा खेळ खेळायचा. फीफाच्या नियमांनुसार, खेळाडूंना विश्वचषकात शूज घालूनच खेळायचे होते, परंतु भारतीय खेळाडूंना शूज घालून खेळण्याची सवय नव्हती. त्यामुळे त्यावेळेसही भारताला विश्वचषकापासून दूर राहावे लागले होते. 

तेव्हापासून स्वप्न स्वप्नच राहिलेदुसरे कारण असेही सांगण्यात आले की हा सामना परदेशी मैदानावर होणार असल्याने भारतीय फुटबॉल संघटनेने तसेच सरकारने खर्च उचलण्यास नकार दिला होता. विशेष बाब म्हणजे फीफा भारतीय संघाचा खर्च उचलण्यास तयार असतानाही भारताला या स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. संघातील निवडीवरून वाद, सरावाचा अभाव ही देखील सहभागी न होण्याची कारणे ठरली आहेत. 

रॅंकिंगच्या बाबतीत भारत खराब स्थितीतदरम्यान, भारतातील फुटबॉल चाहत्यांसाठी खेदाची बाब म्हणजे १९५०च्या विश्वचषकापासून भारतीय संघ पुन्हा एकदाही या मेगा टूर्नामेंटसाठी पात्र ठरू शकला नाही. फीफाच्या क्रमवारीतही भारतीय फुटबॉल संघाची स्थिती खराब असून सध्या संघ क्रमवारीत १०६व्या स्थानावर आहे. अर्थात टॉप-१०० मध्येही भारताचा समावेश नाही. 

यावेळी विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊसअलीकडेच फीफा विश्वचषकाची बक्षीस रक्कम देखील जाहीर करण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण विश्वचषकात वाटण्यात येणारी बक्षीस रक्कम सुमारे ३,५८५ कोटी एवढी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये विश्वचषक विजेत्या संघाला ४२ मिलियन म्हणजेच सुमारे ३४२ कोटी रूपये मिळणार आहेत. मागील अर्थात २०१८च्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम ४ मिलियन डॉलरहून अधिक आहे.   सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSunil Chhetriसुनील छेत्रीIndiaभारतQatarकतार