शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

Exclusive :'मिस्टर एशिया'त झेंडा फडकवणाऱ्या महाराष्ट्रपुत्राला हवीय नोकरी...

By प्रसाद लाड | Updated: October 18, 2018 10:23 IST

देशासाठी सर्वस्व विसरावं. सर्वोत्तम कामगिरी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकाला गवसणी घालावी. तिरंगा डौलानं फडकताना पाहावा, अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते.

ठळक मुद्दे तब्बल 23 वर्षांनी भारताला मिस्टर आशिया हा किताब जिंकवून देणारा शरीरसौष्ठवपटू मात्र शासकीय नोकरीसाठी जोडे झिजवून थकला आहे.

मुंबई : देशासाठी सर्वस्व विसरावं. सर्वोत्तम कामगिरी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकाला गवसणी घालावी. तिरंगा डौलानं फडकताना पाहावा. राष्ट्रगीताची धुन ऐकताना अभिमानाने उर भरून यावा. देशाचं नाव अभिमानाने आपल्यामुळे उंच व्हावं, अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. जसा एखादा खेळाडू देशासाठी सारं काही अर्पण करतो. त्यामुळे देशानेही आपल्याला पाठिंबा द्यावा, पदकाच्या मार्गातील अडचणी दूर कराव्यात, अशी अपेक्षा जर खेळाडू बाळगत असेल, तर त्यात गैर काहीच नसावे. पण सध्याच्या घडीला तब्बल 23 वर्षांनी भारताला मिस्टर आशिया हा किताब जिंकवून देणारा शरीरसौष्ठवपटू मात्र शासकीय नोकरीसाठी जोडे झिजवून थकला आहे. भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकवून देणारा सुनीत जाधव अजूनही सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत आहे. 

सुनीतने आशियाई स्पर्धेत जेतेपद पटकावले. त्याचे बरेच सत्कार झाले, पण सरकारला त्याचे सोयर-सुतकही नाही. खेळाडूंसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे म्हणणाऱ्या क्रीडा मंत्र्यांच्या गावीही सुनीतचा हा भीमपराक्रम नसावा, ही खेदजनक बाब आहे. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदक पटकावले की त्याचा लगेच शासनातर्फे सत्कार केला जातो. पण जेतेपद जिंकून दोन आठवडे होत आले तरी सुनीतच्या नशिबी सरकारी सत्कार अजूनही नाही.

या साऱ्या प्रकाराबद्दल सुनीत म्हणाला की, " माझ्यासारख्या खेळाडूंनी सरकारकडून प्रोत्साहनाची अपेक्षा करणे गैर नक्कीच नाही. मी जेव्हा दोनदा राष्ट्रीय स्पर्धा जिंकलो होतो. तेव्हा मी सरकारी नोकरीसाठी अर्ज केला होता. पण त्यावेळी असा पराक्रम करणारे बरेच जण आहेत, असे मला सांगण्यात आले. आता तर मी भारताला तब्बल 23 वर्षांनी आशियाई सुवर्णपदक जिंकवून दिले आहे. त्यामुळे आतातरी मला शासकीय नोकरी मिळाली, अशी साधारणा अपेक्षा जर मी ठेवत असेन तर त्यामध्ये गैर काहीच नाही. " 

हा पाहा सुनीत जाधवची खास मुलाखत

सुनीत हा सर्वसामान्य कुटुंबातला. मुंबईत स्वत:चे घर नाही. दादरला एका लहानशी खोली त्याने भाडेतत्वावर घेतली आहे. त्याचबरोबर शरीरसौष्ठव हा खेळही महागडा आहे. महिन्याला 30-40 हजार रुपये शरीरावर खर्च करावे लागतात. आता आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यावर सुनीतसारख्या गरजू खेळाडूला सरकार मदत करत नसेल, तर त्याने कुणाकडे पाहायचे? हा यक्षप्रश्न आहे.

" हरयाणामधून बरेच खेळाडू घडताना दिसतात. त्यांना पदकही मिळतात, या साऱ्या गोष्टीचे कारण त्यांना सरकारने दिलेल्या सुविधा आहेत. खेळाडूंना जर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नसेल तर त्याची कामगिरी नेत्रदीपक होते. महाराष्ट्र सरकारही खेळाडूंसाठी बरेच काही करत आहे. त्यामुळेच क्रीडा खात्याकडून मला नोकरीची अपेक्षा आहे," असे सुनीत सांगत होता.

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवIndiaभारत