शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Exclusive :'मिस्टर एशिया'त झेंडा फडकवणाऱ्या महाराष्ट्रपुत्राला हवीय नोकरी...

By प्रसाद लाड | Updated: October 18, 2018 10:23 IST

देशासाठी सर्वस्व विसरावं. सर्वोत्तम कामगिरी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकाला गवसणी घालावी. तिरंगा डौलानं फडकताना पाहावा, अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते.

ठळक मुद्दे तब्बल 23 वर्षांनी भारताला मिस्टर आशिया हा किताब जिंकवून देणारा शरीरसौष्ठवपटू मात्र शासकीय नोकरीसाठी जोडे झिजवून थकला आहे.

मुंबई : देशासाठी सर्वस्व विसरावं. सर्वोत्तम कामगिरी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकाला गवसणी घालावी. तिरंगा डौलानं फडकताना पाहावा. राष्ट्रगीताची धुन ऐकताना अभिमानाने उर भरून यावा. देशाचं नाव अभिमानाने आपल्यामुळे उंच व्हावं, अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. जसा एखादा खेळाडू देशासाठी सारं काही अर्पण करतो. त्यामुळे देशानेही आपल्याला पाठिंबा द्यावा, पदकाच्या मार्गातील अडचणी दूर कराव्यात, अशी अपेक्षा जर खेळाडू बाळगत असेल, तर त्यात गैर काहीच नसावे. पण सध्याच्या घडीला तब्बल 23 वर्षांनी भारताला मिस्टर आशिया हा किताब जिंकवून देणारा शरीरसौष्ठवपटू मात्र शासकीय नोकरीसाठी जोडे झिजवून थकला आहे. भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकवून देणारा सुनीत जाधव अजूनही सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत आहे. 

सुनीतने आशियाई स्पर्धेत जेतेपद पटकावले. त्याचे बरेच सत्कार झाले, पण सरकारला त्याचे सोयर-सुतकही नाही. खेळाडूंसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे म्हणणाऱ्या क्रीडा मंत्र्यांच्या गावीही सुनीतचा हा भीमपराक्रम नसावा, ही खेदजनक बाब आहे. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदक पटकावले की त्याचा लगेच शासनातर्फे सत्कार केला जातो. पण जेतेपद जिंकून दोन आठवडे होत आले तरी सुनीतच्या नशिबी सरकारी सत्कार अजूनही नाही.

या साऱ्या प्रकाराबद्दल सुनीत म्हणाला की, " माझ्यासारख्या खेळाडूंनी सरकारकडून प्रोत्साहनाची अपेक्षा करणे गैर नक्कीच नाही. मी जेव्हा दोनदा राष्ट्रीय स्पर्धा जिंकलो होतो. तेव्हा मी सरकारी नोकरीसाठी अर्ज केला होता. पण त्यावेळी असा पराक्रम करणारे बरेच जण आहेत, असे मला सांगण्यात आले. आता तर मी भारताला तब्बल 23 वर्षांनी आशियाई सुवर्णपदक जिंकवून दिले आहे. त्यामुळे आतातरी मला शासकीय नोकरी मिळाली, अशी साधारणा अपेक्षा जर मी ठेवत असेन तर त्यामध्ये गैर काहीच नाही. " 

हा पाहा सुनीत जाधवची खास मुलाखत

सुनीत हा सर्वसामान्य कुटुंबातला. मुंबईत स्वत:चे घर नाही. दादरला एका लहानशी खोली त्याने भाडेतत्वावर घेतली आहे. त्याचबरोबर शरीरसौष्ठव हा खेळही महागडा आहे. महिन्याला 30-40 हजार रुपये शरीरावर खर्च करावे लागतात. आता आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यावर सुनीतसारख्या गरजू खेळाडूला सरकार मदत करत नसेल, तर त्याने कुणाकडे पाहायचे? हा यक्षप्रश्न आहे.

" हरयाणामधून बरेच खेळाडू घडताना दिसतात. त्यांना पदकही मिळतात, या साऱ्या गोष्टीचे कारण त्यांना सरकारने दिलेल्या सुविधा आहेत. खेळाडूंना जर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नसेल तर त्याची कामगिरी नेत्रदीपक होते. महाराष्ट्र सरकारही खेळाडूंसाठी बरेच काही करत आहे. त्यामुळेच क्रीडा खात्याकडून मला नोकरीची अपेक्षा आहे," असे सुनीत सांगत होता.

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवIndiaभारत