शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

भारतीय गोलंदाजांकडून बाउन्सरचा प्रभावी वापर

By admin | Updated: March 23, 2015 01:31 IST

सर्वसाधारण विचार करता कमकुवत मानल्या जाणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजांनी विश्वकप क्रि केट स्पर्धेत छाप सोडली आहे.

सिडनी : सर्वसाधारण विचार करता कमकुवत मानल्या जाणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजांनी विश्वकप क्रि केट स्पर्धेत छाप सोडली आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाच्या ७० पैकी ४३ फलंदाजांना माघारी परतवण्याची कामगिरी केली आहे. भारतीय संघ आॅस्ट्रेलियात दाखल झाला तेव्हापासून भारतीय फलंदाज उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीवर शॉट पिच चेंडूंना कसे सामोरे जाणार, असा प्रश्न विचारला जात होता, पण तीन महिन्यांच्या कालावधीनंतर भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आखूड टप्प्याच्या माराचा योग्य वापर करीत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. भारताने आतापर्यंत सात सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाच्या ७० विकेट घेतल्या आहेत. त्यातील ४३ विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. त्यापैकी २५ फलंदाज आखूड टप्प्याच्या चेंडूंवर बाद झाले आहेत, हे विशेष. काही दिवसांपूर्वी कर्णधार धोनीने तीन वर्षांपूर्वीच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला होता. त्यावेळी त्याला ‘आयसीसी’ने प्रत्येक षटकात दोन बाऊन्सरला परवानगी देण्याबाबत विचारण्यात आले होते. धोनी म्हणाला होता, ‘कुणीतरी मला प्रतिषटक दोन बाऊन्सरच्या नियमावर प्रतिक्रिया विचारत होता. मी उत्तर दिले होते, ‘एक बाऊन्सर व्यवस्थितपणे टाकता येत नाही, मग दोन बाऊन्सर काय मी घरी घेऊन जाणार.’ त्यावेळी धोनीच्या या व्यंगात्मक उत्तराला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी कसून मेहनत घेतली. आॅस्ट्रेलियात वेगवान गोलंदाजांना अधिक बळी मिळतात, हा अनुभव आहे, पण यापूर्वी भारतीय गोलंदाजांना येथील खेळपट्ट्यांचा कधीच एवढा प्रभावी वापर करता आलेला नाही. भारतातर्फे मोहम्मद शमीने १७ विकेट घेतल्या आहेत, तर उमेश यादवने १४ आणि मोहित शर्माने ११ बळी घेतले आहेत. या स्पर्धेत मोहम्मद शमीच्या स्थानी एकमेव सामना खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारने एक बळी घेतला आहे. त्यात मोहितने बाऊन्सरचा प्रभावी वापर केला आहे. मोहित १३० किलोमीटर प्रति तास वेगाने गोलंदाजी करताना अचानक १४० किलोमीटर प्रति तास वेगाने मारा करू शकतो. पाकचा माजी वेगवान गोलंदाज व यूएई संघाचा प्रशिक्षक आकीब जावेदने पर्थमध्ये म्हटले होते की, ‘मोहितचा बाऊन्सर सर्वांत प्रभावी आहे.’ कर्णधार धोनीचेही मोहितबाबत असेच मत आहे. (वृत्तसंस्था)