शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न पूर्ण

By admin | Updated: March 25, 2015 02:21 IST

नववर्षाचा दुसरा दिवसदेखील जल्लोषाचा राहिला; आणि यास निमित्त होते ते वर्ल्डकप स्पर्धेत यूएई संघाकडून चमकदार कामगिरी केलेल्या यष्टीरक्षक स्वप्निल पाटील याचे आगमन.

रोहित नाईक ल्ल मुंबईगुढीपाडव्यानंतरचा दुसराच दिवस... सगळीकडे एक दिवस आधीच नववर्षाचे जल्लोषात स्वागत झालेले. मात्र वसई-नायगावमध्ये नववर्षाचा दुसरा दिवसदेखील जल्लोषाचा राहिला; आणि यास निमित्त होते ते वर्ल्डकप स्पर्धेत यूएई संघाकडून चमकदार कामगिरी केलेल्या यष्टीरक्षक स्वप्निल पाटील याचे आगमन. वर्ल्डकपची तयारी आणि त्यानंतरचा आॅस्टे्रलिया दौरा आटपून स्वप्निल तब्बल ३ महिन्यांनंतर घरी परतला होता. या अनपेक्षित स्वागताने स्वप्निलदेखील भारावून गेला. वर्ल्डकपमध्ये संयुक्त अरब अमिराती (यूएई) संघाला एकही विजय मिळवता आला नाही. मात्र स्वप्निलच्या खेळीवर लक्ष लागलेल्या वसईकरांनी त्याच्या प्रत्येक खेळीचा मनसोक्त आनंद घेतला. स्वप्निलने यानिमित्ताने संघाची कामगिरी, वर्ल्डकपचा अनुभव यावर ‘लोकमत’सोबत खास बातचीत केली.हा अनुभव खूप रोमांचक होता. बलाढ्य संघांविरुद्ध खेळण्याचा आनंद लुटला. वर्ल्डकपमध्ये खेळण्याचे लहानपासून स्वप्न होते, ते यानिमित्ताने पूर्ण झाले, असे स्वप्निलने सांगतानाच आम्ही कधीही इतक्या उच्च दर्जाचे क्रिकेट खेळलो नव्हतो. या स्पर्धेमुळे यूएई क्रिकेटला खूप फायदा होणार असून, प्रत्येक खेळाडूला आपल्या मर्यादा कळाल्या आहेत आणि त्यानुसार संघ पुन्हा उभा राहील, असेही स्वप्निल म्हणाला.भारताविरुद्ध खेळताना नेमक्या काय भावना होत्या? यावर त्याने सांगितले की, निश्चितच तो सामना भावनिक होता. मात्र मी वेळीच स्वत:ला सावरले. या सामन्यात मोठी खेळी करण्याचे ठरवले होते. दुर्दैवाने त्यात यश आले नाही. आर. अश्विनच्या क्लास गोलंदाजीवर मी बाद झालो. तो जबरदस्त गोलंदाज असून, त्याची गोलंदाजी आव्हानात्मक आहे. द. आफ्रिकेची गोलंदाजी खूप भेदक आहे. जगातील सर्वोत्तम गोलंदाजीविरुद्ध अर्धशतक झळकावल्याचा आनंद आहे. डेल स्टेन अप्रतिमच आहे, परंतु त्याच्यापेक्षा मॉर्नी मॉर्केल जास्त भेदक वाटला, असेही स्वप्निल म्हणाला.दरम्यान, पुढील वर्ल्डकपमध्ये केवळ १० संघांना प्रवेश देण्याच्या आयसीसीच्या निर्णयाविषयी स्वप्निल म्हणाला, अशाने आयसीसीच्या सहयोगी देशांना उच्च दर्जाचे क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेदेखील हा विषय उचलून धरला असून, त्याच्या सांगण्याप्रमाणे निदान मुख्य संघांनी सहयोगी सदस्य असलेल्या देशांचा दौरा करावा. जेणेकरून तेथील क्रिकेटचा स्तर उंचावण्यास मदत होईल. मी जेव्हा कधी यूएईवरून भारतात येतो तेव्हा विमानतळावर मोजकेच नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित असायचे. या वेळी मात्र ही संख्या खूप मोठी होती. सर्वांना बघूनच माझा थकवा निघून गेला. शिवाय गाडीत बसल्यावरदेखील घरच्यांना खूप फोन येत होते, त्यामुळे गावामध्ये नक्की काहीतरी हालचाल सुरू असल्याची जाणीव झाली. गावात पोहोचल्यावर मोठा धक्काच बसला. माझ्या स्वागतासाठी हार-तुरे, बॅण्डबाजा अशी जय्यत तयारी होती. मी याची काहीच कल्पना केलेली नसल्याने खूपच भारावून गेलो.- स्वप्निल पाटील (यष्टीरक्षक, यूएई)