शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

भारतीयांचा स्वप्नभंग...

By admin | Updated: April 1, 2016 04:24 IST

गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे टी-२० विश्वचषक जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न धुळीस मिळाले. लेंडल सिमन्स याने नाबाद ८३ धावांनी स्फोटक खेळी करीत सव्वाशे कोटी भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरले.

- शिवाजी गोरे, रोहित नाईक : मुंबई

गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे टी-२० विश्वचषक जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न धुळीस मिळाले. लेंडल सिमन्स याने नाबाद ८३ धावांनी स्फोटक खेळी करीत सव्वाशे कोटी भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. त्याच्या व जॉन्सन चालर््स (३६ चेंडूत ५२) तसेच आंद्रे रसेल (२० चेंडूत नाबाद ४३) यांच्या फटकेबाजीमुळे वेस्ट इंडिजने भारताचे १९३ धावांचे आव्हान पार करून सेमी फायनल जिंकली. कोहलीची ६३ चेंडूंतील नाबाद ८९ धावांची खेळी व्यर्थ ठरली. २ बाद १९२ अशी धावसंख्या उभारली तेव्हा भारत ही लढत सहज जिंकेल, असे वाटत होते. गेलचा (५) अडसर बुमराने दूर करताच जल्लोषाला उधाण आले होते. मात्र, सिमन्स, रसेल व चालर््स या त्रिकुटाच्या फटकेबाजीने भारताचा विजय हिरावला. १९.४ चेंडूत ३ बाद १९६ धावा करून विंडीजचे फायनलचे तिकिट बुक केले. विंडीज फलंदाजांनी तब्बल २० चौकार आणि ११ षटकांरांची आतषबाजी करीत भारतीय गोलंदाजी निष्प्रभ केली. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर इंग्लंडचे आव्हान असेल.- टी२० विश्वचषकच्या बाद फेरीत वेस्ट इंडिजने पाठलाग केलेल्या सर्वोच्च धावा. याआधी आॅस्टे्रलियाने २०१० साली पाकविरुध्द १९२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.- सर्वाधिक १६ वेळा कोहलीने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५० किंवा त्याहून अधिक धावा काढल्या आहेत. गेल आणि ब्रेंडन मॅक्क्युलमने प्रत्येकी १५ वेळा अशी कामगिरी केली.- टी२० विश्वचषकात विंडिजने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. या सामन्यासह भारताने स्पर्धेत ५ पैकी ४ नाणेफेक गमावल्या. - कोहलीने केलेल्या धडाकेबाज ८९ धावांच्या जोरावर टीम इंडियाने टी २०च्या उपांत्य सामन्यात विंडिजपुढे २ बाद १९२ धावांचे विराट आव्हान उभे केले. मात्र ही त्याची खेळी व्यर्थ ठरली.- आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या लिंडल सिमन्सची ‘घरच्या मैदानावर’ निर्णायक फटकेबाजी. त्याने ५१ चेंडूत ८२ धावा तडकावल्या.- ईडन गार्डन्सवर ३ एप्रिलला होणाऱ्या अंतिम सामन्यात विंडिजसमोर बलाढ्य इंग्लंडचे आव्हान असेल.