शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

कसोटीपटूंना मिळणार ‘डबल कमाई’

By admin | Updated: October 3, 2016 06:06 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या कसोटीपटूंना आनंदाची बातमी देताना त्यांच्या मानधनामध्ये तब्बल दुप्पट वाढ केली आहे.

मुंबई : क्रिकेटविश्वातील सर्वांत श्रीमंत संघटना म्हणून ओळखली जाणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या कसोटीपटूंना आनंदाची बातमी देताना त्यांच्या मानधनामध्ये तब्बल दुप्पट वाढ केली आहे. क्रिकेटचे पारंपरिक रूप असलेल्या ‘कसोटी’ क्रिकेटकडे अधिक आकर्षक बनविण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.सध्या भारतीय क्रिकेटपटूंना प्रत्येक कसोटी सामन्यासाठी सात लाख रुपयांचे मानधन मिळते; मात्र आता बीसीसीआयने यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याने यापुढे प्रत्येक खेळाडूला एका सामन्यासाठी १५ लाख रुपये मिळतील. त्याचवेळी बीसीसीआयने राखीव खेळाडूंच्या मानधनामध्येही दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, राखीव खेळाडूंना ७ लाख रुपये मिळतील. मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये बीसीसीआयने हा निर्णय घेतला. यासंबंधी बोर्डचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, ‘कसोटी क्रिकेटला अधिक प्राधान्य देण्याच्या हेतूने आम्ही खेळाडूंच्या सामना मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटला अधिक आकर्षक आणि नवीन पिढीसाठी अधिक जवळचे करण्यासाठी आम्ही या वेळी चर्चा केली. कसोटी क्रिकेटप्रती आपल्याला खेळाडूंची आवड कायम ठेवायची असल्यास, त्यांच्या मानधनामध्ये वाढ करणे गरजेचे आहे.’ (वृत्तसंस्था)