शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

स्टार्कच्या पहिल्याच षटकाने दिशा निश्चित झाली

By admin | Updated: March 29, 2015 23:54 IST

मोक्याच्या क्षणी काही संघ, काही खेळाडू कामगिरीचा स्तर उंचावण्यात यशस्वी ठरतात. काही संघ व खेळाडू मात्र त्यात अपयशी ठरतात

मोक्याच्या क्षणी काही संघ, काही खेळाडू कामगिरीचा स्तर उंचावण्यात यशस्वी ठरतात. काही संघ व खेळाडू मात्र त्यात अपयशी ठरतात. चॅम्पियन्स व चॅलेंजर्स यांच्या दरम्यान हाच मुख्य फरक असतो. आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड संघांदरम्यान रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान याची प्रचिती आली. आॅस्ट्रेलिया संघ या लढतीत शिकाऱ्याप्रमाणे भासला. मिशेल स्टार्कचे पहिले षटक सर्व काही स्पष्ट करणारे होते. वेग, स्विंग आणि नियंत्रण याचा अचूक मेळ साधत स्टार्कने ब्रेन्डन मॅक्युलमचा त्रिफळा उडवला. त्या वेळीच विश्वकप विजेता निश्चित झाला. त्याच वेळी सर्व काही घडले, असे सांगता येत नसले तरी त्याचा प्रभाव मात्र निश्चितच पडला. त्यानंतर न्यूझीलंडने संघर्ष केला, पण पॉवर प्लेमध्ये जेम्स फॉकनरच्या पहिल्याच षटकात विश्वविजेतेपद निश्चित झाले. मोक्याच्या क्षणी कामगिरीचा दर्जा उंचावणाऱ्या आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या यादीत फॉकनरने स्थान पक्के केले. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आॅस्ट्रेलियाला विजेतेपदासाठी पसंती दर्शविण्यात येत होती आणि अंतिम सामना प्रारंभ होण्यापूर्वीही ती कायम होती. काही संघ अशी प्रतिमा जपण्यात यशस्वी ठरतात. न्यूझीलंड संघ अंडरडॉग्ज होता आणि अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे कामगिरीचा दर्जा उंचावण्यासोबत प्रतिस्पर्धी संघासोबत तुल्यबळ लढत देण्याचे आव्हान होते. मोक्याच्या क्षणी मात्र न्यूझीलंडला कामगिरीचा दर्जा उंचावण्यात अपयशी ठरला. गुप्तिल, अ‍ॅण्डरसन आणि रोंची यांच्या बाद होण्यामुळे ते स्पष्ट झाले. प्रत्युत्तरात खेळताना फिंचला लवकरच गमावल्यानंतर स्मिथ व वॉर्नर यांनी विश्वविजेत्याच्या थाटात खेळ केला. सर्वोत्तम संघाने विजय मिळविला. न्यूझीलंड व आॅस्ट्रेलिया हे दोन्ही संघ अंतिम फेरीपर्यंत आक्रमक क्रिकेट खेळले. पण, या विश्वकप स्पर्धेतील सर्वोत्तम बाब म्हणजे दोन नवे चेंडू आणि मोठ्या बॅटदरम्यानच्या लढतीत मैदाने लहान असली, तरी गोलंदाजांनी फलंदाजांना पिछाडीवर सोडल्याचे निदर्शनास येते. जर तुमच्याकडे स्टार्क किंवा बोल्टप्रमाणे स्विंग, वहाब रियाज किंवा मोर्ने मोर्केलप्रमाणे वेग, इम्रान ताहिर किंवा डॅनियल व्हेटोरी किंवा रविचंद्रन अश्विन यांच्याप्रमाणे चेंडू वळवण्याची क्षमता असेल, तर निश्चितच फलंदाजांवर वर्चस्व गाजवता येते. भारतीय संघाने या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठताना खरंच चांगली कामगिरी केली आहे. अनेक खेळाडूंच्या वयाचा विचार करता या स्पर्धेमुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल. वन-डे क्रिकेटमध्ये गोलंदाज कामगिरीत सातत्य राखतील, अशी आशा आहे. गोलंदाजीमुळे उभय संघांतील फरक स्पष्ट होतो. विश्वकप स्पर्धेतून हा संदेश मिळाला असून, भारतासाठी हा महत्त्वाचा संदेश आहे. (टीसीएम)