शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

स्टार्कच्या पहिल्याच षटकाने दिशा निश्चित झाली

By admin | Updated: March 29, 2015 23:54 IST

मोक्याच्या क्षणी काही संघ, काही खेळाडू कामगिरीचा स्तर उंचावण्यात यशस्वी ठरतात. काही संघ व खेळाडू मात्र त्यात अपयशी ठरतात

मोक्याच्या क्षणी काही संघ, काही खेळाडू कामगिरीचा स्तर उंचावण्यात यशस्वी ठरतात. काही संघ व खेळाडू मात्र त्यात अपयशी ठरतात. चॅम्पियन्स व चॅलेंजर्स यांच्या दरम्यान हाच मुख्य फरक असतो. आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड संघांदरम्यान रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान याची प्रचिती आली. आॅस्ट्रेलिया संघ या लढतीत शिकाऱ्याप्रमाणे भासला. मिशेल स्टार्कचे पहिले षटक सर्व काही स्पष्ट करणारे होते. वेग, स्विंग आणि नियंत्रण याचा अचूक मेळ साधत स्टार्कने ब्रेन्डन मॅक्युलमचा त्रिफळा उडवला. त्या वेळीच विश्वकप विजेता निश्चित झाला. त्याच वेळी सर्व काही घडले, असे सांगता येत नसले तरी त्याचा प्रभाव मात्र निश्चितच पडला. त्यानंतर न्यूझीलंडने संघर्ष केला, पण पॉवर प्लेमध्ये जेम्स फॉकनरच्या पहिल्याच षटकात विश्वविजेतेपद निश्चित झाले. मोक्याच्या क्षणी कामगिरीचा दर्जा उंचावणाऱ्या आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या यादीत फॉकनरने स्थान पक्के केले. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आॅस्ट्रेलियाला विजेतेपदासाठी पसंती दर्शविण्यात येत होती आणि अंतिम सामना प्रारंभ होण्यापूर्वीही ती कायम होती. काही संघ अशी प्रतिमा जपण्यात यशस्वी ठरतात. न्यूझीलंड संघ अंडरडॉग्ज होता आणि अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे कामगिरीचा दर्जा उंचावण्यासोबत प्रतिस्पर्धी संघासोबत तुल्यबळ लढत देण्याचे आव्हान होते. मोक्याच्या क्षणी मात्र न्यूझीलंडला कामगिरीचा दर्जा उंचावण्यात अपयशी ठरला. गुप्तिल, अ‍ॅण्डरसन आणि रोंची यांच्या बाद होण्यामुळे ते स्पष्ट झाले. प्रत्युत्तरात खेळताना फिंचला लवकरच गमावल्यानंतर स्मिथ व वॉर्नर यांनी विश्वविजेत्याच्या थाटात खेळ केला. सर्वोत्तम संघाने विजय मिळविला. न्यूझीलंड व आॅस्ट्रेलिया हे दोन्ही संघ अंतिम फेरीपर्यंत आक्रमक क्रिकेट खेळले. पण, या विश्वकप स्पर्धेतील सर्वोत्तम बाब म्हणजे दोन नवे चेंडू आणि मोठ्या बॅटदरम्यानच्या लढतीत मैदाने लहान असली, तरी गोलंदाजांनी फलंदाजांना पिछाडीवर सोडल्याचे निदर्शनास येते. जर तुमच्याकडे स्टार्क किंवा बोल्टप्रमाणे स्विंग, वहाब रियाज किंवा मोर्ने मोर्केलप्रमाणे वेग, इम्रान ताहिर किंवा डॅनियल व्हेटोरी किंवा रविचंद्रन अश्विन यांच्याप्रमाणे चेंडू वळवण्याची क्षमता असेल, तर निश्चितच फलंदाजांवर वर्चस्व गाजवता येते. भारतीय संघाने या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठताना खरंच चांगली कामगिरी केली आहे. अनेक खेळाडूंच्या वयाचा विचार करता या स्पर्धेमुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल. वन-डे क्रिकेटमध्ये गोलंदाज कामगिरीत सातत्य राखतील, अशी आशा आहे. गोलंदाजीमुळे उभय संघांतील फरक स्पष्ट होतो. विश्वकप स्पर्धेतून हा संदेश मिळाला असून, भारतासाठी हा महत्त्वाचा संदेश आहे. (टीसीएम)