शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

धोनीच्या नेतृत्वामध्ये कमतरता

By admin | Updated: October 27, 2015 02:45 IST

मुंबईत झालेल्या निर्णायक सामन्यातील मानहानिकारक पराभवानंतर भारताचे माजी दिग्गज फलंदाज लिट्ल मास्टर सुनील गावसकर यांनी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वावर जोरदार टीका करताना या पराभवाला

नवी दिल्ली : मुंबईत झालेल्या निर्णायक सामन्यातील मानहानिकारक पराभवानंतर भारताचे माजी दिग्गज फलंदाज लिट्ल मास्टर सुनील गावसकर यांनी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वावर जोरदार टीका करताना या पराभवाला त्याला जबाबदार धरले. धोनीच्या नेतृत्वामध्ये कल्पकतेची आणि प्रयोगशीलतेची कमतरता राहिल्याने भारताला पराभवास सामोरे जावे लागले, असे गावसकर यांनी सांगितले.गोलंदाजी बदलण्याच्या निर्णयावर धोनीच्या नेतृत्वामध्ये कल्पकता बघण्यास मिळाली नाही. त्यामुळे गोलंदाजीमध्ये त्याच्याकडे जास्त विकल्प राहिले नाहीत. याआधी त्याने गोलंदाजीत काही बदल केले; ेमात्र कोणालाही बळी घेण्यात यश आले नाही, असे गावसकर म्हणाले. गोलंदाजी भारताचा सर्वांत मोठा चिंतेचा विषय बनला असून, त्यामुळेच वानखेडेवर भारताला मोठा पराभव स्वीकारावा लागला, असेही गावसकर यांनी सांगितले.गोलंदाजीबाबत गावसकर म्हणाले, की सध्याच्या घडीला गोलंदाजी भारतीय संघासाठी सर्वांत मोठी चिंता आहे. टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत आपल्या गोलंदाजांची कामगिरी आपण पाहिलीच आहे. वानखेडेच्या खेळपट्टीवर चेंडू फिरकी आणि उसळी घेत होता; मात्र आपल्या गोलंदाजांनी त्यानुसार गोलंदाजी केली नाही.आपल्या गोलंदाजांनी १३५च्या वेगाने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर आखूड मारा केला. या वेगाने तुम्ही आफ्रिकेच्या फलंदाजांवर आखूड टप्प्यांचा मारा करू शकत नाही. जर तुम्हाला बाउन्सर टाकायचे असतील, तर तुमचा वेग किमान १४५ किमी प्रतितास इतका असावा. या सामन्यात आश्विनच्या अनुपस्थितीत भारतीय उतरले होते. आगामी कसोटी मालिकेत तो खेळेल, अशी आशा आहे, असेही गावसकर म्हणाले. (वृत्तसंस्था)