शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

धोनी नवे विक्रम करून टीकाकारांना देणार उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 20:23 IST

९००० धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी केवळ ८२ धांवाची गरज आहे. त्यामुळे त्याने या मालिकेत हा टप्पा पूर्ण केल्यास तो पाचवा भारतीय कर्णधार बनण्याचा मान मिळू शकतो आणि टीकाकांरांनाही शांत करु शकतो.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ : मर्यादित षटकाचा कर्णधार एम.एस. धोनी सध्या आपल्या खराब कामगीरीमुळे टीकाकारांचे लक्ष बनला आहे. आयपीएलमध्येही त्याची कामगीरी सर्वसाधारणच झाली होती. त्याचा अनुभव पाहता तो लवकरच आपल्या नेहमीच्या शैलीत टिकाकारांना उत्तर देइल. सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात विजयाने खाते उघडले आहे. धोनीने आपल्या एकदिवसीय सामन्यांमधून ८९१८ धावा केल्या आहेत. त्याला ९००० धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी केवळ ८२ धांवाची गरज आहे. त्यामुळे त्याने या मालिकेत हा टप्पा पूर्ण केल्यास तो पाचवा भारतीय कर्णधार बनण्याचा मान मिळू शकतो आणि टीकाकांरांनाही शांत करु शकतो.
 
या दौऱ्यात अनेक नवोदित खेळाडू आपले नशीब आजमावत आहेत. त्यात धोनी सर्वात जास्त अनुभवी खेळाडू आहे. सध्या धोनीच्या कामगीरीमुळे त्याच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण त्याने या मालिकेदरम्यान नऊ हजार धावांचा टप्पा पार केल्यास तो सर्वच टीकाकारांना उत्तर देऊ शकतो. शिवाय त्याला नव्या विक्रमाची संधी आहे. यापूर्वी सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, अझरुद्दीन आणि राहुल द्रविड यांनी हा टप्पा पूर्ण केला होता. त्यामुळे त्याने यामालिकेत नऊ हजार धावा पूर्ण केल्यास तो पाचवा भारतीय ठरणार आहे.
यासोबतच त्याच्या नावावर आणखीन रेकॉर्ड नोंदवली जाऊ शकतो. त्याने जर नऊ हजारांचा टप्पा पूर्ण केल्यास तो जगातील तिसरा विकेटकीपर बॉटसमन ठरणार आहे. या पूर्वी हा मान श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टला मिळाला होता.
झिम्बाब्वे दौऱ्यातील भारतीय संघात धोनी हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. भारतीय टीममधील धोनी वगळता ९ खेळाडूंनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीतील ८३ सामने खेळले आहेत. तर धोनीने एकूण २७५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. धोनीचा अनुभव १६ खेळाडूंपेक्षा जास्त असून, त्याने इतर खेळाडूंपेक्षा १९२ एकदिवसीय सामने अधिक खेळले आहेत.