शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

संघाच्या कामगिरीवर धोनी खूश

By admin | Updated: March 1, 2015 01:10 IST

संघातील सर्व खेळाडूंची कामगिरी चांगली होत असून, खेळाच्या प्रत्येक विभागात कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरत आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली.

संघातील सर्व खेळाडूंची कामगिरी चांगली होत असून, खेळाच्या प्रत्येक विभागात कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरत आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली. भारतीय संघाने शनिवारी संयुक्त अरब अमिरात संघाचा पराभव करीत आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळल्या जात असलेल्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. यूएई संघाविरुद्ध विजय मिळविल्यानंतर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला, ‘गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत असून, खेळाच्या अन्य विभागावर याचा प्रभाव दिसत आहे. आमची फलंदाजी चांगली आहे. आज एक झेल सुटला असला तरी आमचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार होत आहे. संघातील सर्वच खेळाडू आपली भूमिका चोख बजावत आहे. आम्ही सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी केलेली आहे. कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे.’ धोनीने गोलंदाजांची प्रशंसा केली. धोनी म्हणाला, ‘उपखंडाबाहेर काही सामने गमाविले. त्यावेळी मधल्या षटकांमध्ये आम्ही बळी घेण्यात अपयशी ठरत होतो. आमच्यासाठी ही चिंतेची बाब होती. आता नव्या चेंडूने विकेट घेण्यात यशस्वी ठरत असून, फिरकीपटू मधल्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजविण्यास सक्षम आहेत.’ यूएईविरुद्धच्या लढतीबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘आम्ही योजनाबद्ध खेळ केला. आम्ही प्रतिस्पर्धी संघाला धावा फटकाविण्याची संधी दिली नाही. पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वरने या सामन्यात चांगला मारा केला. अधिक सामने खेळल्यानंतर तो डेथ ओव्हर्समध्ये कशी गोलंदाजी करतो, याची कल्पना येईल.’