शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

क्रिकेट, फुटबॉलने आठवडा गाजवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:53 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या आठवड्यात खूप चांगली प्रगती झाली आहे. सर्वप्रथम महिला आशिया चषक अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताला धक्का दिला. अनेकांना धक्का बसेल की मी याकडे प्रगती म्हणून का बघतोय. आजपर्यंत कधीही भारतीय महिलांनी आशिया चषक गमावलेला नाही.

- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या आठवड्यात खूप चांगली प्रगती झाली आहे. सर्वप्रथम महिला आशिया चषक अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताला धक्का दिला. अनेकांना धक्का बसेल की मी याकडे प्रगती म्हणून का बघतोय. आजपर्यंत कधीही भारतीय महिलांनी आशिया चषक गमावलेला नाही. पण यावेळी एक अनपेक्षित निकाल लागला. बांगलादेशने केवळ अंतिम फेरी नाही, तर साखळी फेरीतही भारताला नमविल्याने हा विजय योगायोग नव्हता. महिला क्रिकेटचा प्रसार करायचा असेल, तर इतर संघांनाही चांगली कामगिरी करावी लागेल. यामुळे खेळाची उत्सुकताची वाढेल. आशियाचा विचार केल्यास भारताव्यतिरिक्त श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान यांनाही चांगली कामगिरी करणे जरुरी आहे. यामुळेच मला हा चांगला निकाल वाटतो. त्याचबरोबर भारतालाही एक धोक्याची सूचना मिळाली आहे. शिवाय बांगलादेशला एका माजी भारतीय क्रिकेटपटू अंजू जैनने मार्गदर्शन केले आहे आणि याक्जा सर्वाधिक फायदा बांगलादेशला झाला.दुसरे म्हणजे, स्कॉटलंडन नंबर वन एकदिवसीय संघ असलेल्या इंग्लंडला नमविले. स्कॉटलंडने ६ धावांनी बाजी मारली, असली तरी विजय हा विजय असतो. यामुळे आयसीसीला आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागेल. त्यांनी निर्णय घेतला की, २०१९ च्या विश्वचषकापासून केवळ १० संघच खेळतील. २०१५ मध्ये १४ संघ होते. या कमी करण्यात आलेल्या संघामध्ये स्कॉटलंडचा समावेश असून त्यांनी या धकामेदार विजयासह स्वत:ची क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे आयसीसीला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा लागेल.१४ जूनपासून जागतिक फुटबॉलचा थरार सुरु होईल. जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉलची ओळख आहे. अनेक संघ सर्वोत्तम खेळ करत या स्पर्धेत आले असल्याने अत्यंत चुरशीचा खेळ यावेळी अनुभवायला मिळेल. अव्वल क्रमांकावरील जर्मनी , त्यानंतर ब्राझील, सर्वांना धक्का देत तिसऱ्या स्थानावर आलेले बेल्जियम, अर्जेंटिना यासारखे बलाढ्य देश एकमेकांविरुद्ध भिडणार असल्याने स्पर्धा अत्यंत अटीतटीची व रोमांचक होईल यात शंका नाही. याआधीच्या विश्वचषक स्पर्धेत जर्मनीने सहज बाजी मारली होती. पण मी विश्वचषक स्पर्धेविषयी जास्त चर्चा करणार नाही. त्याऊलट भारतीय फुटबॉलमध्ये काय घडत आहे यावर जास्त लक्ष देईन. नुकताच मुंबईत इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धा खेळविण्यात आली. भारताने अंतिम सामन्यात केनियाला २-० असे नमवून जेतेपद पटकावले खरे, पण याआधी जे काही झाले ते लक्ष वेधणारे ठरले.पहिला सामना भारताने चायनिज तैपईविरुद्ध ५-० असा जिंकला. पण प्रेक्षक तुरळक होते. यानंतर कर्णधार सुनील छेत्रीने सोशल मिडियावर एका व्हिडिओद्वारे भारतीयांना स्टेडियमवर येण्यास भावनिक आवाहन केले. यानंतर भारताच्या सर्वच सामन्यांना तुफान प्रतिसाद मिळाला. या सर्व सामन्यांमध्ये भारतीयांचा उत्साह कमालीचा होता. यावरुन भारतामध्ये फुटबॉलची क्रेझ मोठी आहे हे कळाले, आता ती क्रेझ कशी काबीज करायचे हे मुख्य आव्हान आहे. यासाठी आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशनला अधिक मार्केटिंग करावे लागेल. तसेच, विश्वचषक खेळायचे असेल, तर आपल्याला ब्राझील, जर्मनी यांच्या स्तराचा खेळ खेळावा लागेल. यासाठी कदाचित आणखी १५-२० वर्ष लागतील पण याला पर्याय नाही. त्याचबरोबर आशियाई खेळांमध्ये भारतीय फुटबॉल संघ सहभागी होणार नसल्याचे चर्चा होती. पण प्रशिक्षक व कर्णधारासह इतर खेळाडूंची मागणी आहे की आशियाई स्पर्धा खेळू द्या. कारण इथे कडवी स्पर्धा असून येथून खूप काही शिकता येईल. जर खेळाडूंना अधिक संधी मिळाली नाही, तर भारतीय फुटबॉलची प्रगती मर्यादितच राहिल. 

टॅग्स :Sportsक्रीडाCricketक्रिकेटFootballफुटबॉल