शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट, फुटबॉलने आठवडा गाजवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:53 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या आठवड्यात खूप चांगली प्रगती झाली आहे. सर्वप्रथम महिला आशिया चषक अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताला धक्का दिला. अनेकांना धक्का बसेल की मी याकडे प्रगती म्हणून का बघतोय. आजपर्यंत कधीही भारतीय महिलांनी आशिया चषक गमावलेला नाही.

- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या आठवड्यात खूप चांगली प्रगती झाली आहे. सर्वप्रथम महिला आशिया चषक अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताला धक्का दिला. अनेकांना धक्का बसेल की मी याकडे प्रगती म्हणून का बघतोय. आजपर्यंत कधीही भारतीय महिलांनी आशिया चषक गमावलेला नाही. पण यावेळी एक अनपेक्षित निकाल लागला. बांगलादेशने केवळ अंतिम फेरी नाही, तर साखळी फेरीतही भारताला नमविल्याने हा विजय योगायोग नव्हता. महिला क्रिकेटचा प्रसार करायचा असेल, तर इतर संघांनाही चांगली कामगिरी करावी लागेल. यामुळे खेळाची उत्सुकताची वाढेल. आशियाचा विचार केल्यास भारताव्यतिरिक्त श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान यांनाही चांगली कामगिरी करणे जरुरी आहे. यामुळेच मला हा चांगला निकाल वाटतो. त्याचबरोबर भारतालाही एक धोक्याची सूचना मिळाली आहे. शिवाय बांगलादेशला एका माजी भारतीय क्रिकेटपटू अंजू जैनने मार्गदर्शन केले आहे आणि याक्जा सर्वाधिक फायदा बांगलादेशला झाला.दुसरे म्हणजे, स्कॉटलंडन नंबर वन एकदिवसीय संघ असलेल्या इंग्लंडला नमविले. स्कॉटलंडने ६ धावांनी बाजी मारली, असली तरी विजय हा विजय असतो. यामुळे आयसीसीला आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागेल. त्यांनी निर्णय घेतला की, २०१९ च्या विश्वचषकापासून केवळ १० संघच खेळतील. २०१५ मध्ये १४ संघ होते. या कमी करण्यात आलेल्या संघामध्ये स्कॉटलंडचा समावेश असून त्यांनी या धकामेदार विजयासह स्वत:ची क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे आयसीसीला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा लागेल.१४ जूनपासून जागतिक फुटबॉलचा थरार सुरु होईल. जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉलची ओळख आहे. अनेक संघ सर्वोत्तम खेळ करत या स्पर्धेत आले असल्याने अत्यंत चुरशीचा खेळ यावेळी अनुभवायला मिळेल. अव्वल क्रमांकावरील जर्मनी , त्यानंतर ब्राझील, सर्वांना धक्का देत तिसऱ्या स्थानावर आलेले बेल्जियम, अर्जेंटिना यासारखे बलाढ्य देश एकमेकांविरुद्ध भिडणार असल्याने स्पर्धा अत्यंत अटीतटीची व रोमांचक होईल यात शंका नाही. याआधीच्या विश्वचषक स्पर्धेत जर्मनीने सहज बाजी मारली होती. पण मी विश्वचषक स्पर्धेविषयी जास्त चर्चा करणार नाही. त्याऊलट भारतीय फुटबॉलमध्ये काय घडत आहे यावर जास्त लक्ष देईन. नुकताच मुंबईत इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धा खेळविण्यात आली. भारताने अंतिम सामन्यात केनियाला २-० असे नमवून जेतेपद पटकावले खरे, पण याआधी जे काही झाले ते लक्ष वेधणारे ठरले.पहिला सामना भारताने चायनिज तैपईविरुद्ध ५-० असा जिंकला. पण प्रेक्षक तुरळक होते. यानंतर कर्णधार सुनील छेत्रीने सोशल मिडियावर एका व्हिडिओद्वारे भारतीयांना स्टेडियमवर येण्यास भावनिक आवाहन केले. यानंतर भारताच्या सर्वच सामन्यांना तुफान प्रतिसाद मिळाला. या सर्व सामन्यांमध्ये भारतीयांचा उत्साह कमालीचा होता. यावरुन भारतामध्ये फुटबॉलची क्रेझ मोठी आहे हे कळाले, आता ती क्रेझ कशी काबीज करायचे हे मुख्य आव्हान आहे. यासाठी आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशनला अधिक मार्केटिंग करावे लागेल. तसेच, विश्वचषक खेळायचे असेल, तर आपल्याला ब्राझील, जर्मनी यांच्या स्तराचा खेळ खेळावा लागेल. यासाठी कदाचित आणखी १५-२० वर्ष लागतील पण याला पर्याय नाही. त्याचबरोबर आशियाई खेळांमध्ये भारतीय फुटबॉल संघ सहभागी होणार नसल्याचे चर्चा होती. पण प्रशिक्षक व कर्णधारासह इतर खेळाडूंची मागणी आहे की आशियाई स्पर्धा खेळू द्या. कारण इथे कडवी स्पर्धा असून येथून खूप काही शिकता येईल. जर खेळाडूंना अधिक संधी मिळाली नाही, तर भारतीय फुटबॉलची प्रगती मर्यादितच राहिल. 

टॅग्स :Sportsक्रीडाCricketक्रिकेटFootballफुटबॉल