शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

CoronaVirus: कोरोनामुळे खेळाचे अर्थकारण सर्वाधिक प्रभावित होईल : बिंद्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 03:32 IST

बिंद्रा म्हणाला, ‘ही सर्वांत महत्त्वाच्या समस्यांपैकी एक समस्या राहणार आहे. त्यातून सावरण्यासाठी पैसा महत्त्वाचा घटक राहील. खेळाडूंना सराव सुरू ठेवण्यासाठी साधन व सहकार्य निश्चित करण्यासाठी पैसा महत्त्वाचा ठरेल.’ ​​​​​​​

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होईपर्यंत खेळाचे अर्थकारण बिघडणार आहे आणि त्यामुळे खेळाडूंना आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे, असे मत अभिनव बिंद्राने व्यक्त केले.ऑलिम्पिक चॅम्पियन नेमबाज बिंद्राने व्यावसायिक मुद्यावर चर्चा करताना म्हटले, ‘कोरोना व्हायरसमुळे खेळाच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक फटका बसणार आहे. कारण यादरम्यान कुठली स्पर्धा होणार नाही. खेळाडूंना पैशाची उणीव भासेल.’बिंद्रा पुढे म्हणाला, ‘ही सर्वांत महत्त्वाच्या समस्यांपैकी एक समस्या राहणार आहे. त्यातून सावरण्यासाठी पैसा महत्त्वाचा घटक राहील. खेळाडूंना सराव सुरू ठेवण्यासाठी साधन व सहकार्य निश्चित करण्यासाठी पैसा महत्त्वाचा ठरेल.’खेळाने यापूर्वी जगाला युद्ध व नैसर्गिक आपत्तीच्या काळात मोठी मदत केली आहे. आताही खेळ सकारात्मक भूमिका बजावू शकतो, पण संतुलन साधल्यानंतरच हे घडू शकते.’ भारतातील एकमेव वैयक्तिक आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता बिंद्रा म्हणाला, ‘खेळामध्ये सीमा ओलांडण्याची क्षमता आहे. पण, मला विश्वास आहे की, पुढील काही महिने प्रत्येकाचे लक्ष्य जीवनात स्थैर्य आणण्यावर केंद्रित झालेले असेल. खेळ मनोधैर्य उंचावण्यासाठी व लोकांना पुढे वाटचाल करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.’ या महामारीमुळे जगभरात २६ लाखांपेक्षा अधिक व्यक्ती संक्रमित आहेत. त्यात आतापर्यंत १.८५ लाख व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामुळे जगभरात सर्व क्रीडास्पर्धा ठप्प झाल्या आहेत किंवा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यात टोकियो आॅलिम्पिकचाही समावेश आहे. (वृत्तसंस्था)