शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

Commonwealth Games 2018: मणिपूर ते राष्ट्रकुल... मीराबाईचा थक्क करणारा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 17:08 IST

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मीराबाईने भारताला सुवर्णपदकाची बोहनी करून दिली. एखादे पदक मिळाल्यावर या खेळाडूंना वलय निर्मण होतं, ते प्रकाशझोतात येतात. पण या पदकामागची त्यांची मेहनत मात्र तोपर्यंत कुणाला दिसत नाही. मीराबाईचा आतापर्यंतचा हा थक्का करणारा प्रवास.

ठळक मुद्देरिओमधून भारतात आल्यावर मीराबाई निराशेच्या गर्तेत सापडली. मीराबाईची कारकिर्द संपली, असंही काही जण म्हणायला लागले होते. कारण मीराबाई ही मानसीक रुग्ण बनली होती.

मुंबई : 'गोल्ड' कोस्ट या नावाला जागली ती भारताची मीराबाई चानू. कारण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मीराबाईने भारताला सुवर्णपदकाची बोहनी करून दिली. एखादे पदक मिळाल्यावर या खेळाडूंना वलय निर्मण होतं, ते प्रकाशझोतात येतात. पण या पदकामागची त्यांची मेहनत मात्र तोपर्यंत कुणाला दिसत नाही.

मीराबाई चानू, मणिपूरची. इम्फालपासून जवळपास 200 किलोमीटर लांब तिचं गाव होतं. कुंजुराणी ही त्यावेळी वेटलिफ्टिंगमध्ये भन्नाट फॉर्मात होती. मीराबाईने कुजुंराणीला प्रेरणास्थानी ठेवलं. त्यावेळी याच खेळात कारकिर्द घडवायचं तिने ठरवलं. गावात कोणतीही खेळाची साधनं नव्हती. घरची परिस्थितीही बेताचीच. पण काही करून वेटलिफ्टिंगमध्ये कारकिर्द घडवायची, हे तिने मनाशी पक्क केलं होतं. वयाच्या 13व्या वर्षी मीराबाई घरापासून जवळपास 60 किलोमीटर लांब असलेल्या खुमान क्रीडा संकुलात सराव करायला लागली.

कनिष्ठ गटात मीराबाईची कामगिरी चांगली होत होती. 2011 साली तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन पदके पटकावली आणि आपली दखल घ्यायला तिने भाग पाडले. 2013 साली ती वेटलिफ्टिंगमध्ये देशातील सर्वोत्तम खेळाडू होती. 2014 साली झालेल्या ग्लासगो येथील राट्रकुल खेळीत तिने रौप्यपदक पटकावले होते. त्यावेळी 2016 साली होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाई देशाला पदक जिंकवून देणार, अशी शाश्वती काही जाणकारांना वाटत होती.

ऑलिम्पिकची जोरदार तयारी तिने सुरु केली. राष्ट्रीय स्पर्धा गाजवली. त्यानंतर आपली आदर्श असलेल्या कुंजुराणी, हिचेही विक्रम तिने मोडीत काढले. स्पर्धांची तयारी करताना तिने साऱ्या वैयक्तिक गोष्टीही बाजूला ठेवल्या. आपल्या सख्या बहिणीच्या लग्नालाही तिने जाणे टाळले होते. अथक मेहनत घेत ती रिओमध्ये दाखल झाली, पण पदकांपासून वंचित राहीली. जी कामिगरी ती सहजपणे करू शकत होती, तीदेखील तिच्याकडून झाली नव्हती. या गोष्टीचा तिच्यावर विपरीत परिणाम झाला.

रिओमधून भारतात आल्यावर मीराबाई निराशेच्या गर्तेत सापडली. लोकांच्या विश्वासाला आपण तडा दिला, देशाने आपल्यावर एवढे पैसे खर्च केले, पण आपण रीत्याहाती परत आलो, असा विचार मीराबाईने करायला सुरुवात केली. या विचारांतून ती बाहेर येत नव्हती. सराव पूर्णपणे बंद झाला होता. मीराबाईची कारकिर्द संपली, असंही काही जण म्हणायला लागले होते. कारण मीराबाई ही मानसीक रुग्ण बनली होती. त्यावेळी तिच्यावर मानसोपचार करण्यात आले आणि तिला पुन्हा खेळाकडे वळवण्यात तिच्या कुटुंबियांना आणि प्रशिक्षकांना यश मिळाले. मीराबाई पुन्हा खेळाकडे वळली आणि 2017 साली झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताने तब्बल 22 वर्षांनी या या मानाच्या स्पर्धेत पदक पटकावले होते. यापूर्वी कर्नम मल्लेश्वरीने 1994 आणि 1995 साली विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.

अमेरिकेत झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील पदकानंतर पुन्हा एकदा मीराबाईच्या कारकिर्दीला वगळे वळण मिळाले. आता तिने डोळ्यापुढे राष्ट्रकुल स्पर्धा ठेवली होती. राष्ट्रकुलसाठी गोल्ड कोस्टमध्ये दाखल झाल्यावरही मीराबाई सुवर्णपदक जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटले नव्हते. पण गुणवत्ता, अथक मेहनत, चिकाटी आणि जिद्द यांच्या जोरावर मीराबाईने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८Mirabai Chanuमीराबाई चानू