शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

Commonwealth Games 2018: मणिपूर ते राष्ट्रकुल... मीराबाईचा थक्क करणारा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 17:08 IST

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मीराबाईने भारताला सुवर्णपदकाची बोहनी करून दिली. एखादे पदक मिळाल्यावर या खेळाडूंना वलय निर्मण होतं, ते प्रकाशझोतात येतात. पण या पदकामागची त्यांची मेहनत मात्र तोपर्यंत कुणाला दिसत नाही. मीराबाईचा आतापर्यंतचा हा थक्का करणारा प्रवास.

ठळक मुद्देरिओमधून भारतात आल्यावर मीराबाई निराशेच्या गर्तेत सापडली. मीराबाईची कारकिर्द संपली, असंही काही जण म्हणायला लागले होते. कारण मीराबाई ही मानसीक रुग्ण बनली होती.

मुंबई : 'गोल्ड' कोस्ट या नावाला जागली ती भारताची मीराबाई चानू. कारण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मीराबाईने भारताला सुवर्णपदकाची बोहनी करून दिली. एखादे पदक मिळाल्यावर या खेळाडूंना वलय निर्मण होतं, ते प्रकाशझोतात येतात. पण या पदकामागची त्यांची मेहनत मात्र तोपर्यंत कुणाला दिसत नाही.

मीराबाई चानू, मणिपूरची. इम्फालपासून जवळपास 200 किलोमीटर लांब तिचं गाव होतं. कुंजुराणी ही त्यावेळी वेटलिफ्टिंगमध्ये भन्नाट फॉर्मात होती. मीराबाईने कुजुंराणीला प्रेरणास्थानी ठेवलं. त्यावेळी याच खेळात कारकिर्द घडवायचं तिने ठरवलं. गावात कोणतीही खेळाची साधनं नव्हती. घरची परिस्थितीही बेताचीच. पण काही करून वेटलिफ्टिंगमध्ये कारकिर्द घडवायची, हे तिने मनाशी पक्क केलं होतं. वयाच्या 13व्या वर्षी मीराबाई घरापासून जवळपास 60 किलोमीटर लांब असलेल्या खुमान क्रीडा संकुलात सराव करायला लागली.

कनिष्ठ गटात मीराबाईची कामगिरी चांगली होत होती. 2011 साली तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन पदके पटकावली आणि आपली दखल घ्यायला तिने भाग पाडले. 2013 साली ती वेटलिफ्टिंगमध्ये देशातील सर्वोत्तम खेळाडू होती. 2014 साली झालेल्या ग्लासगो येथील राट्रकुल खेळीत तिने रौप्यपदक पटकावले होते. त्यावेळी 2016 साली होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाई देशाला पदक जिंकवून देणार, अशी शाश्वती काही जाणकारांना वाटत होती.

ऑलिम्पिकची जोरदार तयारी तिने सुरु केली. राष्ट्रीय स्पर्धा गाजवली. त्यानंतर आपली आदर्श असलेल्या कुंजुराणी, हिचेही विक्रम तिने मोडीत काढले. स्पर्धांची तयारी करताना तिने साऱ्या वैयक्तिक गोष्टीही बाजूला ठेवल्या. आपल्या सख्या बहिणीच्या लग्नालाही तिने जाणे टाळले होते. अथक मेहनत घेत ती रिओमध्ये दाखल झाली, पण पदकांपासून वंचित राहीली. जी कामिगरी ती सहजपणे करू शकत होती, तीदेखील तिच्याकडून झाली नव्हती. या गोष्टीचा तिच्यावर विपरीत परिणाम झाला.

रिओमधून भारतात आल्यावर मीराबाई निराशेच्या गर्तेत सापडली. लोकांच्या विश्वासाला आपण तडा दिला, देशाने आपल्यावर एवढे पैसे खर्च केले, पण आपण रीत्याहाती परत आलो, असा विचार मीराबाईने करायला सुरुवात केली. या विचारांतून ती बाहेर येत नव्हती. सराव पूर्णपणे बंद झाला होता. मीराबाईची कारकिर्द संपली, असंही काही जण म्हणायला लागले होते. कारण मीराबाई ही मानसीक रुग्ण बनली होती. त्यावेळी तिच्यावर मानसोपचार करण्यात आले आणि तिला पुन्हा खेळाकडे वळवण्यात तिच्या कुटुंबियांना आणि प्रशिक्षकांना यश मिळाले. मीराबाई पुन्हा खेळाकडे वळली आणि 2017 साली झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताने तब्बल 22 वर्षांनी या या मानाच्या स्पर्धेत पदक पटकावले होते. यापूर्वी कर्नम मल्लेश्वरीने 1994 आणि 1995 साली विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.

अमेरिकेत झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील पदकानंतर पुन्हा एकदा मीराबाईच्या कारकिर्दीला वगळे वळण मिळाले. आता तिने डोळ्यापुढे राष्ट्रकुल स्पर्धा ठेवली होती. राष्ट्रकुलसाठी गोल्ड कोस्टमध्ये दाखल झाल्यावरही मीराबाई सुवर्णपदक जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटले नव्हते. पण गुणवत्ता, अथक मेहनत, चिकाटी आणि जिद्द यांच्या जोरावर मीराबाईने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८Mirabai Chanuमीराबाई चानू