शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बीडब्ल्यूएफ विश्व टूर फायनल्स; श्रीकांत, सिंधू यांचे आव्हान जवळपास संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 07:08 IST

श्रीकांतला तायवानच्या वांग जू वेईविरुद्ध एका गेमची आघाडी घेतल्यानंतर पराभवाला सामोरे जावे लागले

बँकॉक : भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू व किदाम्बी श्रीकांत गुरुवारी येथे बीडब्ल्यूएफ विश्व टूर फायनल्सच्या आपल्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत पराभूत झाले आहेत. त्यामुळे हे दोन्ही बॅडमिंटनपटू बाद फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर झाले आहेत. आठवडाभरापूर्वी विश्व चॅम्पियन सिंधूला रतचानोक इंतानोनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता, यावेळीही त्यापेक्षा काही वेगळे घडले नाही. तिसऱ्या मानांकित थायलंडच्या खेळाडूने १८-२१, १३-२१ ने सहज विजय मिळविला.

श्रीकांतला तायवानच्या वांग जू वेईविरुद्ध एका गेमची आघाडी घेतल्यानंतर पराभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वी जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या खेळाडूविरुद्ध श्रीकांतची कामगिरी ३-० अशी होती. वांगने एक गेमने पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन करताना १९-२१, २१-९, २१-१९ ने विजय नोंदवला. त्याआधी, श्रीकांत व वांग यांच्यादरम्यान ९-९ अशी बरोबरी होती. त्यानंतर श्रीकांतने ११-१० अशी आघाडी घेतली आणि ब्रेकनंतर त्याने १५-११ अशी आघाडी घेतली. श्रीकांतने रॅलीमध्ये वर्चस्व गाजवत १७-१२ अशी आघाडी घेतली.

 ‘आज माझा दिवस नव्हताच. पहिला गेम गमाविल्यामुळे फरक पडला. माझे टायमिंगही चांगले नव्हते, त्यामुळे मी निराश आहे.’-पी. व्ही. सिंधू

 ‘मला चुरशीच्या लढतीत विजय मिळविण्याची पद्धत शोधावी लागेल. मी तिसऱ्या गेममध्ये बराच वेळ त्याच्यावर वर्चस्व गाजवले; पण अखेर पराभव स्वीकारावा लागला. - किदाम्बी श्रीकांत 

टॅग्स :BadmintonBadmintonPV Sindhuपी. व्ही. सिंधू