शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Breaking news : नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारताला सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 16:38 IST

भारताच्या मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांची सोनरी कामगिरी.

नवी दिल्ली : नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारताकडून आज सुवर्ण कामगिरी पाहायला मिळाली. भारताच्या मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी 10 मी. एअर पिस्तुल प्रकारातील मिश्र दुहेरी विभागात सुवर्णपदक पटकावले.

मनू आणि सौरभ हे सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. ही स्पर्धा सध्या चीनमधील बीजिंग येथे सुरु आहे. पण यापूर्वी नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेतही या दोघांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. मनू आणि सौरभ यांनी यजमान चीनच्या खेळाडूंच्या जोडीला अंतिम फेरीत 16-6 असे पराभूत करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

मनू आणि सौरभ यांनी पात्रता फेरीमध्ये 482 गुण पटकावले होते. त्यामुळे मनू आणि सौरभ यांना पात्रता फेरीत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मनूने मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले असले तरी तिला महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात चांगली कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेच्या पात्रता फेरीचा अडथळाही तिला पार करता आला नव्हता. पण मिश्र दुहेरी प्रकारामध्ये मात्र मनूने सौरभबरोबर खेळताना ही कसर भरून काढली.

यापूर्वी भारताच्या अंजुम मौदगिल आणि दिव्यांश सिंग पवार यांनी सुवर्णपदक पटकावले होते. भारताचे या स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक होते. अंजुम आणि दिव्यांश या जोडीने चीनच्या लिऊ रुक्सुअन आणइ यांग हाओरन यांच्यावर अटीतटीच्या लढतीत 17-15 असा विजय मिळवला आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

टॅग्स :ShootingगोळीबारIndiaभारत