शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

आश्विनपासून सर्वांत अधिक धोका : प्लेसिस

By admin | Updated: November 3, 2015 03:59 IST

टी-२० आणि वन-डे सामन्यांची मालिका जिंकल्यानंतरही पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला आगामी कसोटी मालिकेत भारतातील फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांबाबत चिंता सतावत

मोहाली : टी-२० आणि वन-डे सामन्यांची मालिका जिंकल्यानंतरही पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला आगामी कसोटी मालिकेत भारतातील फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांबाबत चिंता सतावत आहे. आगामी मालिकेत आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विनला खेळणे आमच्यासाठी सर्वांत मोठे आव्हान राहील, असे मत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू ुप्लेसिसने व्यक्त केले.आगामी कसोटी मालिकेत खेळपट्ट्या यजमान संघासाठी अनुकूल राहतील अशी आशा आहे का, याबाबत ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल राहील, अशी आशा आहे आणि त्यानुसार योजना आखली जाईल. माझ्या मते, भारतीय क्रिकेट पूर्वीच्या तुलनेत अधिक आक्रमक झाले आहे. सुरुवातीला भारतातील खेळपट्ट्याकडून तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या दिवशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती; पण आता पहिल्या दिवसापासून खेळपट्टीवर चेंडू वळायला सुरुवात होते.’’गुरुवारपासून प्रारंभ होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सोमवारी आयएस बिंद्रा पीसीए स्टेडियममध्ये सराव सत्रानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘याचा अर्थ, कसोटी सामना ५ दिवस चालणार नाही. कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपणार असेल, तर त्यादृष्टीने योजना आखून आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील. मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत.’’ दुखापतीतून सावरल्यानंतर कसोटी मालिकेत पुनरागम करीत असलेल्या आश्विनच्या आव्हानाला सामोरे जाणे महत्त्वाचे ठरेल, असेही ड्युप्लेसिसने सांगितले. ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘आश्विन जागतिक दर्जाचा फिरीकपटू आहे; पण टी-२० मालिकेत आम्ही त्याला यशस्वीपणे सामोरे गेलो आहोत. आता कसोटी क्रिकेटचा प्रश्न आहे. येथे त्याला अधिक टर्न मिळेल.’’ड्युप्लेसिसने सांगितले, ‘आश्विनला खेळणे आमच्यासाठी सर्वांत मोठे आव्हान आहे; पण आम्ही त्यासाठी योजना आखली आहे. आश्विनला आम्ही कसे खेळतो, यावरच या मालिकेचा निकाल अवलंबून राहील.’’मोहालीच्या खेळपट्टीबाबत ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘खेळपट्टी कोरडी भासत आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून फिरकीपटूंना मदत मिळेल, अशी आशा आहे. सध्या खेळपट्टी तशीच वाटत आहे.’’ ड्युप्लेसिसने मुंबईत खेळल्या गेलेल्या पाचव्या व अखेरच्या वन-डे सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीवर टीका करणाऱ्या भारतीय संघव्यवस्थापनावर नेम साधला.(वृत्तसंस्था) भारतीय संघाने विजय मिळविला असता तर तक्रार केली असती, असे वाटत नाही. या दौऱ्यात आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. मोहालीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारताचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहेत. कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाच्या यशात वेगवान गोलंदाज मोर्ने मोर्कलची भूमिका महत्त्वाची ठरेल.- फाफ डू प्लेसिस