शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आश्विनपासून सर्वांत अधिक धोका : प्लेसिस

By admin | Updated: November 3, 2015 03:59 IST

टी-२० आणि वन-डे सामन्यांची मालिका जिंकल्यानंतरही पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला आगामी कसोटी मालिकेत भारतातील फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांबाबत चिंता सतावत

मोहाली : टी-२० आणि वन-डे सामन्यांची मालिका जिंकल्यानंतरही पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला आगामी कसोटी मालिकेत भारतातील फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांबाबत चिंता सतावत आहे. आगामी मालिकेत आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विनला खेळणे आमच्यासाठी सर्वांत मोठे आव्हान राहील, असे मत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू ुप्लेसिसने व्यक्त केले.आगामी कसोटी मालिकेत खेळपट्ट्या यजमान संघासाठी अनुकूल राहतील अशी आशा आहे का, याबाबत ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल राहील, अशी आशा आहे आणि त्यानुसार योजना आखली जाईल. माझ्या मते, भारतीय क्रिकेट पूर्वीच्या तुलनेत अधिक आक्रमक झाले आहे. सुरुवातीला भारतातील खेळपट्ट्याकडून तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या दिवशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती; पण आता पहिल्या दिवसापासून खेळपट्टीवर चेंडू वळायला सुरुवात होते.’’गुरुवारपासून प्रारंभ होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सोमवारी आयएस बिंद्रा पीसीए स्टेडियममध्ये सराव सत्रानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘याचा अर्थ, कसोटी सामना ५ दिवस चालणार नाही. कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपणार असेल, तर त्यादृष्टीने योजना आखून आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील. मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत.’’ दुखापतीतून सावरल्यानंतर कसोटी मालिकेत पुनरागम करीत असलेल्या आश्विनच्या आव्हानाला सामोरे जाणे महत्त्वाचे ठरेल, असेही ड्युप्लेसिसने सांगितले. ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘आश्विन जागतिक दर्जाचा फिरीकपटू आहे; पण टी-२० मालिकेत आम्ही त्याला यशस्वीपणे सामोरे गेलो आहोत. आता कसोटी क्रिकेटचा प्रश्न आहे. येथे त्याला अधिक टर्न मिळेल.’’ड्युप्लेसिसने सांगितले, ‘आश्विनला खेळणे आमच्यासाठी सर्वांत मोठे आव्हान आहे; पण आम्ही त्यासाठी योजना आखली आहे. आश्विनला आम्ही कसे खेळतो, यावरच या मालिकेचा निकाल अवलंबून राहील.’’मोहालीच्या खेळपट्टीबाबत ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘खेळपट्टी कोरडी भासत आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून फिरकीपटूंना मदत मिळेल, अशी आशा आहे. सध्या खेळपट्टी तशीच वाटत आहे.’’ ड्युप्लेसिसने मुंबईत खेळल्या गेलेल्या पाचव्या व अखेरच्या वन-डे सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीवर टीका करणाऱ्या भारतीय संघव्यवस्थापनावर नेम साधला.(वृत्तसंस्था) भारतीय संघाने विजय मिळविला असता तर तक्रार केली असती, असे वाटत नाही. या दौऱ्यात आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. मोहालीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारताचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहेत. कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाच्या यशात वेगवान गोलंदाज मोर्ने मोर्कलची भूमिका महत्त्वाची ठरेल.- फाफ डू प्लेसिस