शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बीसीसीआयचे आर्थिक व्यवहार रोखणार?

By admin | Updated: October 4, 2016 03:29 IST

कोणत्याही परिस्थितीत आपल्या शिफारशींना बीसीसीआयमध्ये लागू करण्याचा निर्धार केलेल्या निवृत्त न्या. आर. एम. लोढा समितीने आता

नवी दिल्ली : कोणत्याही परिस्थितीत आपल्या शिफारशींना बीसीसीआयमध्ये लागू करण्याचा निर्धार केलेल्या निवृत्त न्या. आर. एम. लोढा समितीने आता, बँकांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) व्यवहार रोखण्याचे निर्देश दिले आहेत. लोढा समितीने ३० सप्टेंबरला बीसीसीआयने आपल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये (एसजीएम) घेतलेल्या आर्थिक निर्णयांना अवैध ठरवताना बँकांना बीसीसीआयसह आर्थिक व्यवहार न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच वेळी शुक्रवारी मुंबईत झालेल्या एसजीएममध्ये सदस्य क्रिकेट संघटनांनादेखील कोणतेही आर्थिक व्यवहार न करण्याचे निर्देश समितीने दिले आहेत. दरम्यान, लोढा समितीने बीसीसीआयला आपल्या एसजीएममध्ये दैनंदिनी कार्याव्यतिरिक्त इतर कोणतेही निर्णय न घेण्याबाबत सांगितले होते. मात्र, तरीही बीसीसीआयने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यामध्ये आर्थिक व्यवहारांचाही समावेश होता.(वृत्तसंस्था) चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा आयपीएल...कोलकाता : लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले, ‘‘जर लोढा शिफारशींना लागू करण्यात आले, तर भारताला पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल.’’ लोढा शिफारशींनुसार आयपीएलच्या आधी किंवा नंतर १५ दिवसांचा रिकामा वेळ असणे आवश्यक आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी १ ते १८ जूनपर्यंत होणार असून, आयपीएल मे महिन्याच्या अंतिम दिवसांत समाप्त होण्याची अपेक्षा आहे. ‘‘मला नाही माहिती भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यायोग्य ठरेल की नाही. जर लोढा शिफारशीनुसार जायचे ठरवल्यास, तर तुम्हाला आयपीएल व चॅम्पियन्स ट्रॉफी यापैकी एका स्पर्धेला मुकावे लागेल. त्यामुळे बीसीसीआयला यावर निर्णय घ्यावा लागेल,’’ असे ठाकूर म्हणाले. शिवाय, पाकिस्तानसह क्रिकेट खेळण्याविषयी ठाकूर म्हणाले, की जेव्हा भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळेल तेव्हाच भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रश्न येईल....तरच ‘डीआरएस’ घेऊबीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी वादग्रस्त डीआरएस प्रणाली मान्य करण्याचे संकेत देताना सांगितले, ‘‘या प्रणालीतील त्रुटी दूर झाल्यास आणि अचूकतेच्या जवळपास ही प्रणाली आल्यास नक्कीच आम्ही ही प्रणाली लागू करू. आम्ही पुन्हा डीआरएसचे काम पाहू. जर या प्रणालीची कामगिरी समाधानकारक राहिली, तर बीसीसीआय डीआरएसला मान्यता देईल.’’ सगळ्या शिफारशी शक्य नाही लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी लागू करण्याबाबत जरी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले असले, तरी या शिफारशींना संपूर्णपणे लागू करणे अशक्य आहे, असे बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे मत आहे. ठाकूर म्हणाले, ‘‘बीसीसीआयला सुधारण्यांविषयी काहीच अडचण नाही. गेल्या १८ महिन्यांत बोर्डाने क्रिकेट सल्लागार समिती नियुक्त केली, ज्यामध्ये माजी खेळाडूंचा समावेश आहे. आम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये खूप काम केले आहे. तसेच, आम्ही अनेक शिफारशी मान्य करून त्या लागूही केल्या आहेत. मात्र, काही शिफारशी लागू करता येणार नसून, आम्ही त्याची कारणेही दिले आहेत.’’