शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

डीआरएससाठी आयसीसीकडून बीसीसीआयची मनधरणी

By admin | Updated: October 16, 2016 21:31 IST

भारताने पंचांच्या निर्णयाची समीक्षा करणा-या प्रणालीचा(डीआरएस) वापर करावा यासाठी आयसीसीकडून बीसीसीआयची वारंवार मनधरणी करण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत 

धर्मशाला, दि. 16 - भारताने पंचांच्या निर्णयाची समीक्षा करणा-या प्रणालीचा(डीआरएस) वापर करावा यासाठी आयसीसीकडून बीसीसीआयची वारंवार मनधरणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून २० आॅक्टोबर रोजी आयसीसी महाव्यवस्थापक ज्योफ अलार्डिस बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यासमक्ष अपग्रेड करण्यात आलेल्या डीआरएस प्रणालीचे सादरीकरण देणार आहेत. भारत- इंग्लंड मालिकेतील पाच कसोटी सामन्यादरम्यान डीआरएसचा वापर व्हावा, असे आयसीसीला वाटते.मुख्य कोच अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली हे देखील सादरीकरणाच्यावेळी उपस्थित राहतील. हे दोघेही या काळात वन डे साठी नवी दिल्लीत वास्तव्यास असतील. कुंबळे स्वत: आयसीसी क्रिकेट समितीचे चेअरमन आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या डीआरएसचा स्वीकार करण्यास नकार देणारा भारत हा एकमेव देश आहे. या तंत्राचा पहिल्यांदा वापर २००८ मध्ये झाला होता.बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी भारत- न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन डे दरम्यान पत्रकारांशी चर्चा करताना आम्ही डीआरएसला कधीही नकार दिला नव्हता, असे स्पष्ट केले. डीआरएसमधील उणिवा आधी दूर व्हाव्यात. ही पद्धतपरिपूर्ण असेल तर आम्हाला अमलात आणण्यास हरकत नाही. या पद्धतीत सुधारणा झाल्यास आम्हाला देखील वापर करण्यास हरकत राहणार नसल्याचे लंकेच्या दौ-याच्यावेळी देखील मी स्पष्ट केले होते.’ ठाकूर पुढे म्हणाले,‘ कुंबळे स्वत: आयसीसी क्रिकेट समितीचे बॉस आहेत. त्यांनी डीआरएसवर एमआयटीच्या(मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी)अहवालाचा अभ्यास केला आहे. आयसीसी महाव्यवस्थापक नवी दिल्लीत सादरीकरण देतील त्यावेळी कुंबळे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतरच डीआरएसचे सुधारित रूप मान्य करण्यास आम्ही तयार आहोत की नाही हे मी सांगू शकेन. मी डीआरएसच्या सादरीकरणाद्वारे समाधानी झालो तर आगामी भारत- इंग्लंड मालिकेदरम्यान डीआरएस वापराबद्दल गंभीरपणे विचार केला जाईल.’(वृत्तसंस्था)