शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

बीसीसीआय योग्य प्रक्रियेचा अवलंब करीत आहे

By admin | Published: May 26, 2017 3:33 AM

मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवेदन मागवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) योग्य प्रक्रियेचे पालन करीत आहे.

लंडन : ‘मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवेदन मागवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) योग्य प्रक्रियेचे पालन करीत आहे. कारण, विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर समाप्त होत आहे,’ असे मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने गतमोसमात १७ कसोटी सामन्यांपैकी १२ सामने जिंंकले आहेत. तरी, बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी आवेदन मागण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर एक गोष्ट निश्चित झाली आहे, की अनिल कुंबळे यांच्या कार्यकाळामध्ये कोणतीही वाढ होणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये कोहलीला कुंबळे यांच्या कार्यकाळाबाबत विचारण्यात आले. या वेळी कोहलीने म्हटले की, ‘जेव्हापासून मला कळायला लागले, तेव्हापासून माझ्या माहितीप्रमाणे मागील कित्येक वर्षांपासून याच प्रकारची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. गेल्या वेळीही हीच प्रक्रिया कायम ठेवण्यात आली होती. कार्यकाळ एका वर्षाचा होता आणि निश्चितच ही प्रक्रियाही तशीच असेल.’ (वृत्तसंस्था)हार्दिक पंड्या आणि केदार जाधव यांच्या संघातील समावेशामुळे फलंदाजीसाठी खालचा मध्यमक्रम मजबूत झाला आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनीवर मॅच फिनिश करण्याचा दबाव कमी होणार आहे. आम्ही खालचा मध्यक्रम मजबूत करण्याच्या दृष्टीनेच हे बदल केले आहेत. आम्हाला वाटते की, गेल्या दोन वर्षांपासून महेंद्रसिंह धोनीवर खूप दबाव आला होता. धोनी स्वत:ला सिद्ध करू शकत नव्हता कारण असे संघात खेळाडू नव्हते की जे त्याच्याबरोबर मॅच फिनिश करण्याचा संयम दाखवू शकत होते, असेसुद्धा विराटने सांगितले.