मीरपूर, दि. १७ -भारताच्या १०५ धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशचा डाव गडगडला असून ७ गडी अवघ्या ५५ धावांत बाद झाले आहेत. मोहित शर्माने ४ तर स्टुअर्ट बिन्नीने ३ गडी टिपले.
त्यापूर्वी बांग्लादेशविरुद्धच्या दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताचा डाव अवघ्या १०५ धावांत आटोपला. भारताचे सर्व गडी अवघ्या २५.३ ओव्हर्समध्ये पॅव्हेलियनमध्ये परतले. तस्कीन अहमदने भेदक मारा करत ५ गडी टिपले. त्याच्या गोलंदाजीपुढे बारतीय फलंदाजांची तारांबळ उडाली. अखेर मोहित शर्मा व उमेशने थोडीफार फटकेबाजी केल्याने भारताला १०० धावांचा पल्ला तरी पार करता आला. इतर सर्व फलंदाज पटापट तंबूत परतले.