शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
4
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
5
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
6
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
7
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
8
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
9
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
10
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
11
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
12
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
13
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
14
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
15
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
16
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
17
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
18
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
19
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
20
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली

कसोटीसाठी भारतीय गोलंदाजी आक्रमण संतुलित : श्रीनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2015 23:47 IST

कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारताची गोलंदाजीची बाजू संतुलित असून, ५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी

नवी दिल्ली : कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारताची गोलंदाजीची बाजू संतुलित असून, ५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेत यजमान संघाला याचा लाभ मिळेल, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने व्यक्त केले. गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला अलीकडेच टी-२० व वन-डे सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला, पण मोहालीमध्ये प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाज चांगली कामगिरी करतील, अशी आशा श्रीनाथने व्यक्त केली. श्रीनाथ म्हणाला, की भारताचे वेगवान आणि फिरकी माऱ्याचे संयोजन नेहमी यशस्वी ठरले आहे. मायदेशात खेळताना फिरकीपटूंची भूमिका नेहमी उल्लेखनीय ठरली आहे. वेगवान गोलंदाज ५० टक्के बळी घेण्यात यशस्वी ठरले नाही, तरी ४० टक्के बळी घेण्यात यशस्वी ठरू शकतात. जर, यात फिरकीपटूंचा समावेश राहिला, तर भारताची गोलंदाजीची बाजू अधिक मजबूत होईल आणि कसोटी मालिकेत त्याचा यजमान संघाला लाभ मिळेल.भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा वाहणाऱ्या ईशांत शर्माला एका सामन्याच्या बंदीच्या शिक्षेमुळे मोहाली कसोटी सामन्यात खेळता येणार नाही.