शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

आॅस्ट्रेलियाचा ८००वा कसोटी सामना

By admin | Updated: March 15, 2017 01:19 IST

आजपासून १४० वर्षांपूर्वी १५ मार्च १८८७ रोजी मेलबोर्नमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटची सुरुवात करणारा आॅस्ट्रेलिया संघ या प्रवासात रांचीमध्ये एक नवा विक्रम नोंदवणार आहे.

नवी दिल्ली : आजपासून १४० वर्षांपूर्वी १५ मार्च १८८७ रोजी मेलबोर्नमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटची सुरुवात करणारा आॅस्ट्रेलिया संघ या प्रवासात रांचीमध्ये एक नवा विक्रम नोंदवणार आहे. भारताविरुद्धचा तिसरा कसोटी सामना आॅस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासातील ८००वा कसोटी सामना ठरणार आहे. स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील संघ ही लढत संस्मरणीय ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहील. आॅस्ट्रेलिया ८०० कसोटी सामने खेळणारा जगातील दुसरा देश ठरणार आहे. इंग्लंडने यापूर्वी ही कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या नावावर ९८३ कसोटी सामन्यांची नोंद आहे. इंग्लंडने ८००वा कसोटी सामना ७ नोव्हेंबर २००२ रोजी आॅस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये खेळला होता. त्या लढतीत त्यांना ३८४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. रांचीमध्ये प्रथमच कसोटी सामन्याचे आयोजन होत असून, हा एक ऐतिहासिक सामना ठरणार आहे. कारण आगामी एक दशकापेक्षा अधिक कालावधीत कुठला अन्य देश ८०० कसोटी सामने खेळण्याची शक्यता नाही. इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियानंतर वेस्ट इंडीज (५२०) संघाचा क्रमांक आहे. ८००च्या आकड्यापासून हा संघ बराच दूर आहे. भारतीय संघाचा विचार करता ५१० कसोटी सामने खेळणारा भारतीय संघ चौथ्या स्थानी आहे. त्यानंतर न्यूझीलंड (४२०), दक्षिण आफ्रिका (४०९), पाकिस्तान (४०७), श्रीलंका (२५७), झिम्बाब्वे (१०१), बांगलादेश (९९) आणि आयसीसी विश्व इलेव्हन (१) यांचा क्रमांक लागतो. आॅस्ट्रेलियाने आतापर्यंत ७९९ कसोटी सामने खेळले असून, त्यांत ३७७ सामन्यांत विजय मिळविला, तर २१४ सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. दोन सामने टाय झाले, तर उर्वरित २०६ सामने अनिर्णीत राहिले. सध्याच्या मालिकेदरम्यान आॅस्ट्रेलियन संघ भारतात कसोटी सामन्यांचे अर्धशतक पूर्ण करणार आहे. धरमशाला येथे होणारा चौथा कसोटी सामना भारतातील त्यांचा ५०वा कसोटी सामना असेल. आॅस्ट्रेलियाने सर्वाधिक ३४१ सामने इंग्लंडविरुद्ध खेळले आहेत. त्यानंतर वेस्ट इंडीज (११६), दक्षिण आफ्रिका (९४) आणि भारत (९२) यांचा क्रमांक लागतो. आॅस्ट्रेलियाने एक लढत आयसीसी विश्व इलेव्हन संघाविरुद्धही खेळली आहे. आॅस्ट्रेलियाने मायदेशात ४१०, तर विदेशात ३७९ आणि तटस्थ स्थळावर १० कसोटी सामने खेळले आहेत. आॅस्ट्रेलियाने आतापर्यंत तीन दिवस-रात्र कसोटी सामने खेळलेले आहेत. आॅस्ट्रेलियाने मायदेशानंतर सर्वाधिक १७१ सामने इंग्लंडमध्ये खेळले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमध्ये प्रत्येकी ५० सामने खेळले आहेत. या महिनाअखेर भारताचा या यादीमध्ये समावेश होणार आहे. (वृत्तसंस्था) आॅस्ट्रेलियाने सर्वांत कमी सामने झिम्बाब्वेमध्ये (१ कसोटी) खेळले आहेत. ही लढत १९९९मध्ये खेळली गेली होती. रांची ठरणार भारताचे २६ वे कसोटी केंद्ररांची : महेंद्रसिंह धोनीने येथील स्टेडियमच्या उद््घाटनप्रसंगी डफ वाजविला होता. त्याची ही प्रतिमा येथील स्थानिक नागरिकांच्या हृदयात कायम आहे; पण चार वर्षांनंतर हे शहर भारताचे २६ वे कसोटी केंद्र म्हणून आपले नाव अधोरेखित करीत असताना येथील मूड मात्र निराशाजनक आहे. रांचीमध्ये गुरुवारपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारत व आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या शहरात हा पहिलाच कसोटी सामना आहे; पण शहराचा सर्वांत आवडता सुपुत्र दिल्लीमध्ये स्थानिक वन-डे संघाचे नेतृत्व करण्यात व्यस्त आहे.