शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: गोपीचंद सर नसते तर... द्युतीच्या यशामागे मोठं योगदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 10:02 IST

Asian Games 2018: चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमबॅक करताना द्युती चंदने आशियाई स्पर्धेत भारताला महिलांच्या 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून दिले.

जकार्ता - चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमबॅक करताना द्युती चंदने आशियाई स्पर्धेत भारताला महिलांच्या 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून दिले. 2014मध्ये द्युतीला प्रतिबंधक द्रव्याचे सेवन केल्याप्रकरणी चार वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. मात्र. त्याविरोधात तीने क्रीडा लवादाकडे दाद मागितली आणि तिचा विजय झाला. मात्र, बंदीच्या काळात द्युतीला कोणीही आधार दिला नाही. नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या द्युतीच्या मदतीला बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद पुढे आले. त्यांनी तिला नैराश्यातून बाहेर काढले आणि त्यांच्या हैदराबाद येथील अकादमीत राहण्यास सांगितले. द्युतीने ज्यावेळी आशियाई रौप्यपदक जिंकले तेव्हा गोपीचंद यांच्या आनंदासमोर गगन ठेंगणे वाटत होते. गोपीचंद म्हणाले, आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. द्युतीने करून दाखवले. ती माझ्यासह सर्व खेळाडूंची प्रेरणास्थान आहे. तिच्या जिद्दीला आणि दृढनिश्चयाला सलाम. कठीण प्रसंगाशी दोन हात करणाऱ्या प्रत्येक खेळाडूची ती रोल मॉडल आहे. 

द्युतीने 20 वर्षांनंतर भारताला आशियाई स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत पदक जिंकून दिले आहे. यापूर्वी 1998 साली रचिता मिस्त्रीने कांस्यपदक जिंकले होते.  22 वर्षीय द्युतीचे हे पहिलेच आशियाई पदक आहे. ती म्हणाली, 2014 चे वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात खराब वर्ष होते. लोकं माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा करत होते. आज त्याच मुलीने कमबॅक करताना देशाला पदक जिंकून दिले. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडा