शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Asian Games 2018: स्वर्गीय पती मुरली देवरा यांना पदक समर्पित - हेमा देवरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 07:20 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेत या खेळाचा प्रथमच समावेश झाला आणि आम्ही येथे खेळायला येणार या निर्णयाने आमचा सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

अभिजित देशमुखथेट जकार्ता येथून

जकार्ता - आशियाई क्रीडा स्पर्धेत या खेळाचा प्रथमच समावेश झाला आणि आम्ही येथे खेळायला येणार या निर्णयाने आमचा सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. येथे खेळताना पहिल्याच वर्षी आम्ही कांस्यपद जिंकले त्यामुळे तो आनंद अजून द्विगुणीत झाला; पण या सर्वांचे श्रेय मी माझे पती स्वर्गीय मुरली देवरा यांना देते आणि हे पदक त्यांना समर्पित करते. कारण, त्यांनीच हा खेळ मला शिकविला. ते जर आता असते तर त्यांनासुद्धा खूप आनंद झाला असता, असे ब्रिजमध्ये मिश्र गटात कांस्यपदक जिंकलेल्या भारतीय संघांच्या खेळाडू मुंबईच्या हेमा देवरा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

हेमा देवरा म्हणाल्या की, ब्रिजमध्ये कांस्यपदक जिंकून आम्ही इतिहास बनवून भारताचा गौरव वाढविला आहे, याचा अभिमान वाटतो. माझ्यासारखेच संघातील इतर खेळाडू किरण नदर, हिमानी खंडेलवाल, बाकिराजू सत्यनारायण, गोपीनाथ मन्ना, राजीव खंडेलवाल यांना पदक जिंकण्याचा आनंद आहे; पण आमची अपेक्षा सुवर्ण किंवा रौप्यपदकाची होती. जपान, चीन, इंडोनेशिया यांच्या सारख्या बलाढ्य संघांना पराभूत करून, आम्ही उपांत्य फेरी गाठली. ब्रिजमध्ये अगदी छोट्या चुकीमुळे सामना हरलासुद्धा जातो, उपांत्य फेरीत थायलंडविरुद्ध ४ पेक्षाही कमी गुणांनी आम्ही हरलो त्याची खूप खंत आहे.

आम्ही सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप चांगली तयारी केली होती, म्हणून आम्ही गटात शीर्षवर राहिलो. ब्रिज हा चेस प्रमाणेच बुद्धीचा खेळ आहे,आपल्या जोडीदारासोबत चांगली रणनीती, संमेलन प्रणाली आणि चर्चा खूप महत्त्वाची असते. प्रत्येक वेळी आम्ही सुधारणांवर लक्ष केंद्रित करतो आणि स्पर्धात्मक विचार नेहमीच असतो. संभावतेचा खेळ असला, तरी संरक्षणसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. दुसरीकडे या खेळाची रणनीती अशी आखावी लागते की, आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा नेहमीच ४-५ पाऊल पुढचा विचार करणे आवश्यक आहे.ब्रिज खेळायला मी खूप उशिरा सुरुवात केली; कारण माझे प्रथम प्राधान्य घर आणि कुटुंब होते. भारतीय ब्रिज संघात माझी निवड २००० मध्ये चाचणी स्पर्धेतून झाली. त्याच वर्षी आम्ही श्रीलंकेमध्ये पहिली स्पर्धा जिंकली. मी अतापर्यंत १२-१३ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मॉन्ट्रियाल, कॅनडा स्पर्धेमध्ये बिल गेट्स, वॉरेन बफेट यांच्या विरुद्ध खेळण्याची संधी लाभली. माझा या खेळातील तरुण व उद्योन्मुख खेळाडूंना सल्ला आहे की, त्यांनी या खेळाचा सखोल अभ्यास करावा आणि खेळताना नेहमी प्रतिस्पर्धी खेळाडू कसे खेळतात, याचे अवलोकन करावे. आशियाई स्पर्धेत या खेळाला स्थान मिळाले आहे, त्यामुळे हा खेळ पुढील काळात अजून वाढेल असा विश्वास आहे.आमची अपेक्षा सुवर्णपदकांची होती, कांस्यपदक मिळून आम्ही संतुष्ट नाही. आमच्या संघात सगळेच नॅशनल चॅम्पियन आणि इंटरनॅशनल स्पर्धा जिंकलेले खेळाडू आहे. ब्रिजच्या काही स्पर्धा अजून बाकी आहे, कमीत कमी अजून २ पदके अपेक्षित आहेत. हा खेळ सांघिक असून, तालमेल खूप महत्त्वाचा असतो. आपल्या भारत देशामध्ये ब्रिजचे महत्त्व वाढत आहे आणि तरुणसुद्धा या खेळाकडे आवडीने वळत आहेत. आगामी काळात या प्रत्येक राज्यात हा खेळ खेळला जावा, असा आमचा प्रयत्न राहणार आहे.- देबाशिष रे,भारतीय ब्रिज संघाचे मार्गदर्शक 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाSportsक्रीडा