शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

आजपासून रंगणार आशियाई चुरस

By admin | Updated: July 6, 2017 01:52 IST

गुरुवारपासून येथे सुरू होत असलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी यजमान भारतीय संघ सज्ज असून, स्पर्धेत चमकदार

भुवनेश्वर : गुरुवारपासून येथे सुरू होत असलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी यजमान भारतीय संघ सज्ज असून, स्पर्धेत चमकदार कामगिरी करून पदकतालिकेत अव्वल तिनांमध्ये स्थान पटकावण्याचे लक्ष्य यजमानांनी ठेवले आहे. विशेष म्हणजे, ऐन वेळी रांची शहराने या स्पर्धेच्या आयोजनातून माघार घेतल्यानंतरही भुवनेश्वर येथे अव्वल दर्जाच्या सोयीसुविधा देण्यात यजमान यशस्वी ठरले. ओडिशाच्या राजधानी शहरात या स्पर्धेच्या निमित्ताने ४५ देशांतील सुमारे ८००हून अधिक अ‍ॅथलिट येणार असून ४२ खेळांत आपले कौशल्य दाखवतील. यंदाच्या स्पर्धेतही काही अव्वल खेळाडूंची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवेल. दर वर्षीप्रमाणे यंदाही अनेक अव्वल अ‍ॅथलिटनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. त्यामुळे दर दोन वर्षांनी होत असलेल्या या स्पर्धेत यंदाही ग्लॅमरची कमतरता जाणवेल. दखल घेण्याची बाब म्हणजे, या स्पर्धेनंतर लगेच लंडनमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होणार असल्याने अव्वल खेळाडूंनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.(वृत्तसंस्था) यजमानांच्या कामगिरीकडे लक्ष...१ जागतिक स्तरावर नेहमी कमजोर स्थिती राहिलेल्या भारताने आशियाई स्पर्धांमध्ये मात्र मजबूत स्थान मिळविले आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासामध्ये सर्वाधिक पदके मिळविण्याच्या यादीमध्ये भारताने चीन व जपाननंतर तिसरे स्थान मिळविले आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी यजमान देशाने ९५ सदस्यांचा संघ निवडला असून त्यामध्ये ४६ महिला खेळाडूंचा समावेश आहे. यंदाच्या स्पर्धेत भारताने सर्वांत मोठा संघ पाठविला आहे. २वुहानमध्ये झालेल्या गेल्या वेळच्या स्पर्धेत भारताने चार सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्य अशा १३ पदकांसह स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले होते. यंदा मात्र भारताला कामगिरीत आणखी सुधारणा होण्याची आशा आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने कमीत कमी ५ सुवर्णांसह १५ ते २० पदके जिंकण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ओडिशाचा इतिहास आणि संस्कृती यांच्या अप्रतिम सादरीकरणासह आधुनिक आर्थिक विकासाचे रंग उधळताना २२व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी कलिंगा स्टेडियममध्ये आशियाई स्पर्धा सुरू झाल्याची घोषणा केली. या वेळी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सेबेश्चियन को आणि आशियाई संघटनेचे प्रमुख दहलन अल हमद यांचीही उपस्थिती होती. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला आणि क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री पटनाईक यांनी स्पर्धा उद्घाटनाची घोषणा केल्यानंतर आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघटनेचा झेंडा फडकावला.