शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून रंगणार आशियाई चुरस

By admin | Updated: July 6, 2017 01:52 IST

गुरुवारपासून येथे सुरू होत असलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी यजमान भारतीय संघ सज्ज असून, स्पर्धेत चमकदार

भुवनेश्वर : गुरुवारपासून येथे सुरू होत असलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी यजमान भारतीय संघ सज्ज असून, स्पर्धेत चमकदार कामगिरी करून पदकतालिकेत अव्वल तिनांमध्ये स्थान पटकावण्याचे लक्ष्य यजमानांनी ठेवले आहे. विशेष म्हणजे, ऐन वेळी रांची शहराने या स्पर्धेच्या आयोजनातून माघार घेतल्यानंतरही भुवनेश्वर येथे अव्वल दर्जाच्या सोयीसुविधा देण्यात यजमान यशस्वी ठरले. ओडिशाच्या राजधानी शहरात या स्पर्धेच्या निमित्ताने ४५ देशांतील सुमारे ८००हून अधिक अ‍ॅथलिट येणार असून ४२ खेळांत आपले कौशल्य दाखवतील. यंदाच्या स्पर्धेतही काही अव्वल खेळाडूंची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवेल. दर वर्षीप्रमाणे यंदाही अनेक अव्वल अ‍ॅथलिटनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. त्यामुळे दर दोन वर्षांनी होत असलेल्या या स्पर्धेत यंदाही ग्लॅमरची कमतरता जाणवेल. दखल घेण्याची बाब म्हणजे, या स्पर्धेनंतर लगेच लंडनमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होणार असल्याने अव्वल खेळाडूंनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.(वृत्तसंस्था) यजमानांच्या कामगिरीकडे लक्ष...१ जागतिक स्तरावर नेहमी कमजोर स्थिती राहिलेल्या भारताने आशियाई स्पर्धांमध्ये मात्र मजबूत स्थान मिळविले आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासामध्ये सर्वाधिक पदके मिळविण्याच्या यादीमध्ये भारताने चीन व जपाननंतर तिसरे स्थान मिळविले आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी यजमान देशाने ९५ सदस्यांचा संघ निवडला असून त्यामध्ये ४६ महिला खेळाडूंचा समावेश आहे. यंदाच्या स्पर्धेत भारताने सर्वांत मोठा संघ पाठविला आहे. २वुहानमध्ये झालेल्या गेल्या वेळच्या स्पर्धेत भारताने चार सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्य अशा १३ पदकांसह स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले होते. यंदा मात्र भारताला कामगिरीत आणखी सुधारणा होण्याची आशा आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने कमीत कमी ५ सुवर्णांसह १५ ते २० पदके जिंकण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ओडिशाचा इतिहास आणि संस्कृती यांच्या अप्रतिम सादरीकरणासह आधुनिक आर्थिक विकासाचे रंग उधळताना २२व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी कलिंगा स्टेडियममध्ये आशियाई स्पर्धा सुरू झाल्याची घोषणा केली. या वेळी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सेबेश्चियन को आणि आशियाई संघटनेचे प्रमुख दहलन अल हमद यांचीही उपस्थिती होती. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला आणि क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री पटनाईक यांनी स्पर्धा उद्घाटनाची घोषणा केल्यानंतर आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघटनेचा झेंडा फडकावला.