शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आशिया चषकाची फायनल - नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

By admin | Updated: March 6, 2016 20:56 IST

नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी करण्याचा प्रथम निर्णय घेतला आहे. भारतीय संघात रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि आशिष नेहराचे पुनरागमन झाले आहे

ऑनलाइन लोकमत
मीरपूर, दि. ६ - आशिया चषकाच्या अंतिम लढतीतील पावसाचे विघ्न टळले आहे.  सामन्याला सुरवात झाली असुन नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आहे. नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी करण्याचा प्रथम निर्णय घेतला आहे. भारतीय संघात रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि आशिष नेहराचे पुनरागमन झाले आहे. आशिया चषकाची अंतिम लढत १५ षटकाची होणार आहे. सामना स्थानिक वेळेनुसार ९.३० वाजता सुरु होणार आहे. तर भारतीय वेळेनुसार ९ वाजता सामन्यास सुरवात होणार आहे. मिरपूरच्या शेरे-ए-बांगला स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. सहाव्यांदा विजेतेपद मिळविण्याच्या इराद्याने टीम इंडियाचे शिलेदार मैदानात उतरणार आहेत.
 

दरम्यान, मीरपूरच्या शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता अंतिम सामनाला सुरवात होणार होती. परंतु धूळीकणांसहित आलेले वादळ आणि जोरदार पावसामुळे हा सामना वेळेवर सुरू झाला नाही. पावसाचा जोर एवढा प्रचंड होता की हा सामनाच रद्द होण्याची शक्यता दिसत होती. दरम्यान,सामन्यापूर्वी सरावासाठी मैदानावर उतरलेले दोन्ही संघाचे खेळाडू पाऊस सुरु झाल्यानंतर ड्रेसिंगरुमध्ये परतले. खेळपट्टीवर पुन्हा कव्हर घालण्यात आले आहे. मिरपूरमध्ये ढगाळ वातावरण होते. आशिया कप टी-२० स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारत आणि बांगलादेशमध्ये अंतिम सामन्याचा थरार रंगला आहे. या स्पर्धेत भारत आतापर्यंत अजिंक्य राहिला असून, बांगलादेशला साखळी फेरीत फक्त भारताकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. पण त्यांनी त्यांच्यापेक्षा बलाढय असणा-या पाकिस्तान आणि श्रीलंका या संघावर मात केल्यामुळे बांगलादेशला कमी लेखून चालणार आहे. अंतिम सामन्यापूर्वीच बांगलादेशी चाहत्यांनी धोनीच आक्षेपार्ह पोस्टर सोशल मिडियावर व्हायरला करुन आधीच वादाला सुरुवात केली आहे. यापूर्वीही एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव केल्यानंतर बांगलादेशी वर्तमानपत्राने असाच उद्दामपणा केला होता. त्यामुळे चाहत्यांमधली ही ठसन मैदानावरही दिसू शकते. भारतीय संघाला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. - प्रतिस्पर्धी संघ - भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराजसिंग, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, आशिष नेहरा, जसप्रीत बुमराह, अजिंक्य रहाणे, हरभजनसिंग, पवन नेगी, भुवनेश्वर कुमार.बांगलादेश : मुशर्रफ मुर्तझा (कार्णधार), तामिम इक्बाल, सौम्या सरकार, शब्बीर रहमान, मुशफिकर रहीम, शाकीब अल हसन, महमुदुल्लाह रियाद, मोहम्मद मिथून, अराफात सन्नी, तस्कीन अहमद, अल अमीन हुसेन, नासिर हुसेन,अबू हैदर, नुरुर हसन, इमरुल कायेस.