शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

अश्विन-साहाची नाबाद शतकी भागीदारी; भारत सुस्थितीत

By admin | Updated: August 10, 2016 05:53 IST

रविचंद्रन अश्विन व वृद्धिमान साहा यांनी केलेल्या नाबाद शतकी भगीदारीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला ५ बाद २३४ धावा केल्या. अश्विन ७५ तर वृद्धिमान साहा ४८ धावावर खेळत होते

ऑनलाइन लोकमतसेंट लुसिया, दि. १० : वेस्ट इंडिजविरुध्दचा तिसरा कसोटी सामना जिंकून चार सामन्यांची मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असलेला भारतीय संघ पहिल्याच दिवशी अडचणीत आला. पण मोक्याच्या वेळी रविचंद्रन अश्विन व वृद्धिमान साहा यांनी केलेल्या नाबाद शतकी भगीदारीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला ५ बाद २३४ धावा केल्या. अश्विन ७५ तर वृद्धिमान साहा ४८ धावावर खेळत होते. आघाडीचा फलंदाज राहुलने ५० व राहानेने ३५ धावांचे योगदान दिले.दरम्यान, शिखर धवन, कर्णधार विराट कोहली स्वस्तात परतल्यानंतर आणि अर्धशतकवीर लोकेश राहुलही (५०) बाद झाल्याने भारताने चहापानापर्यंत ५२ षटकात ५ बाद १३० धावांची मजल मारली होती. विशेष म्हणजे मालिकेत प्रथमच संधी देण्यात आलेला रोहित शर्माही (९) अपयशी ठरल्यानंतर भरवशाचा अजिंक्य रहाणे (३५) खराब फटका मारुन परतला. पण अश्विन आणि साहा यांनी विकेटन पडू देता खेळपट्टीवर उभे ठाकले.

डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. कर्णधार जेसन होल्डरचा विश्वास गोलंदाजांनी सार्थ ठरवताना भारतीयांना जखडवून ठेवले. सलामीवीर शिखर धवन अडखळत खेळत असताना दुसरीकडे राहुल आत्मविश्वासाने खेळत होता. शॅनन गॅब्रियलने धवनला (४) यष्टीरक्षक शेन डॉर्विचकरवी बाद करुन भारताला पहिला धक्का दिला. भारत या धक्क्यातून सावरत असतानाचा युवा गोलंदाज अलझारी जोसेफने कर्णधार विराट कोहलीला स्लीपमध्ये डॅरेन ब्रावो करवी झेलबाद केले.

या निर्णायक बळीनंतर विंडिजला राहुलच्या तंत्रशुध्द फटकेबाजीला सामोरे जावे लागले. यावेळी मुंबईकर अजिंक्य रहाणेने संयमी फलंदाजी घेत खेळपट्टीचा अंदाज घेतला. तर, स्थिरावलेल्या राहुलने शानदार अर्धशतक झळकावले. मात्र, अष्टपैलू रोस्टन चेसने राहुलला क्रेग ब्रेथवेटकरवी झेलबाद करुन पुन्हा भारताला बॅकफूटवर आणले. राहुलने ६५ चेंडूत ६ चौकारांसह ५० धावा फटकावल्या. त्याने रहाणेसह तिसऱ्या बळीसाठी ५८ धावांची भागीदारी केली.

यानंतर रोहित शर्माच्या कामगिरीकडे भारतीयांचे लक्ष होते. मात्र तो केवळ ९ धावा काढून जोसेफचा शिकार ठरल्याने भारताची ४ बाद ८७ अशी अवस्था झाली. रहाणे आणी अश्विन यांनी पाचव्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. रहाणे - अश्विन भारताला सावरणार असे दिसत असतानाच रहाणेचा चेसला स्वीप करण्याचा अंदाज चुकला आणि तो त्रिफळाचीत झाला. रहाणेच्या य चुकीमुळे भारताचा अर्धा संघ १२६ धावांत परतला. उद्या भारताला अश्विन, साहा, जडोजा यांचाकडून खेळपट्टीवर टिकून धावा वाढवण्याच्या आशा असतील.