शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

अश्विन-साहाची नाबाद शतकी भागीदारी; भारत सुस्थितीत

By admin | Updated: August 10, 2016 05:53 IST

रविचंद्रन अश्विन व वृद्धिमान साहा यांनी केलेल्या नाबाद शतकी भगीदारीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला ५ बाद २३४ धावा केल्या. अश्विन ७५ तर वृद्धिमान साहा ४८ धावावर खेळत होते

ऑनलाइन लोकमतसेंट लुसिया, दि. १० : वेस्ट इंडिजविरुध्दचा तिसरा कसोटी सामना जिंकून चार सामन्यांची मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असलेला भारतीय संघ पहिल्याच दिवशी अडचणीत आला. पण मोक्याच्या वेळी रविचंद्रन अश्विन व वृद्धिमान साहा यांनी केलेल्या नाबाद शतकी भगीदारीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला ५ बाद २३४ धावा केल्या. अश्विन ७५ तर वृद्धिमान साहा ४८ धावावर खेळत होते. आघाडीचा फलंदाज राहुलने ५० व राहानेने ३५ धावांचे योगदान दिले.दरम्यान, शिखर धवन, कर्णधार विराट कोहली स्वस्तात परतल्यानंतर आणि अर्धशतकवीर लोकेश राहुलही (५०) बाद झाल्याने भारताने चहापानापर्यंत ५२ षटकात ५ बाद १३० धावांची मजल मारली होती. विशेष म्हणजे मालिकेत प्रथमच संधी देण्यात आलेला रोहित शर्माही (९) अपयशी ठरल्यानंतर भरवशाचा अजिंक्य रहाणे (३५) खराब फटका मारुन परतला. पण अश्विन आणि साहा यांनी विकेटन पडू देता खेळपट्टीवर उभे ठाकले.

डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. कर्णधार जेसन होल्डरचा विश्वास गोलंदाजांनी सार्थ ठरवताना भारतीयांना जखडवून ठेवले. सलामीवीर शिखर धवन अडखळत खेळत असताना दुसरीकडे राहुल आत्मविश्वासाने खेळत होता. शॅनन गॅब्रियलने धवनला (४) यष्टीरक्षक शेन डॉर्विचकरवी बाद करुन भारताला पहिला धक्का दिला. भारत या धक्क्यातून सावरत असतानाचा युवा गोलंदाज अलझारी जोसेफने कर्णधार विराट कोहलीला स्लीपमध्ये डॅरेन ब्रावो करवी झेलबाद केले.

या निर्णायक बळीनंतर विंडिजला राहुलच्या तंत्रशुध्द फटकेबाजीला सामोरे जावे लागले. यावेळी मुंबईकर अजिंक्य रहाणेने संयमी फलंदाजी घेत खेळपट्टीचा अंदाज घेतला. तर, स्थिरावलेल्या राहुलने शानदार अर्धशतक झळकावले. मात्र, अष्टपैलू रोस्टन चेसने राहुलला क्रेग ब्रेथवेटकरवी झेलबाद करुन पुन्हा भारताला बॅकफूटवर आणले. राहुलने ६५ चेंडूत ६ चौकारांसह ५० धावा फटकावल्या. त्याने रहाणेसह तिसऱ्या बळीसाठी ५८ धावांची भागीदारी केली.

यानंतर रोहित शर्माच्या कामगिरीकडे भारतीयांचे लक्ष होते. मात्र तो केवळ ९ धावा काढून जोसेफचा शिकार ठरल्याने भारताची ४ बाद ८७ अशी अवस्था झाली. रहाणे आणी अश्विन यांनी पाचव्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. रहाणे - अश्विन भारताला सावरणार असे दिसत असतानाच रहाणेचा चेसला स्वीप करण्याचा अंदाज चुकला आणि तो त्रिफळाचीत झाला. रहाणेच्या य चुकीमुळे भारताचा अर्धा संघ १२६ धावांत परतला. उद्या भारताला अश्विन, साहा, जडोजा यांचाकडून खेळपट्टीवर टिकून धावा वाढवण्याच्या आशा असतील.