शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

आणखी एक दिवस कपात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 05:27 IST

केडीएमसी हद्दीत नवीन वर्षापासून अंमलबजावणी : महिन्यातील शेवटच्या शनिवारी शटडाउन

कल्याण : बारवी आणि आंध्र धरणांतील घसरणाऱ्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर लघुपाटबंधारे विभागाने ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्राधिकरणांना एका आठवड्यात ३० तास पाणीकपात करण्याचे आदेश दिले आहेत. सलग ३० तास कपात केल्यास पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या भीतीने केडीएमसीने मंगळवारी कपात सुरूच ठेवताना महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पूर्ण दिवस शटडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त गोविंद बोडके यांच्या मान्यतेनंतर ही अंमलबजावणी जानेवारीपासून होण्याची शक्यता आहे.

धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन १५ जुलैपर्यंत करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाने २१ आॅक्टोबरपासून २२ टक्केपाणीकपात लागू केली होती. परंतु, धरणातून सर्वच प्राधिकरणांकडून वारेमाप पाणी उचलले जात असल्यामुळे पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे पाणीकपातीत वाढ करण्याचा निर्णय लघुपाटबंधारे विभागाने घेतला आहे. केडीएमसीकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी, तर एमआयडीसीकडून पुरवले जाणारे पाणी शुक्रवारी २४ तास बंद असते. आता लघुपाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार ही कपात आता सहा तासांनी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे आता नागरिकांना ३० तासांच्या पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी बंद असतो. जर ३० तास सलग कपात लागू केली, तर पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: विस्कळीत होण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आणखीन एक दिवस शटडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे. सलग ३० तास कपात न करता त्यातील २४ तासांव्यतिरिक्त उर्वरित सहा तासांचे चार आठवडे मिळून एक पूर्ण दिवस शटडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो अतिरिक्त दिवस महिन्यातील शेवटचा शनिवार राहील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी दिली. आयुक्तांना यासंदर्भातील प्रस्ताव पाठवला असून त्यांच्या मान्यतेनंतर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.एमआयडीसीची सलग पाणीकपात?नागरिकांना सलग ३० तासांच्या पाणीकपातीची झळ बसू नये, म्हणून केडीएमसीने महिन्याच्या शेवटच्या शनिवारी शटडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयडीसी मात्र सलग ३० तासांची पाणीकपात लागू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होणाºया २७ गावांना पाणीटंचाईची तीव्र झळ बसण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.उद्या पाणी नाहीया आठवड्यात मंगळवारी शटडाउन घेण्यात आले नव्हते. त्याऐवजी, केडीएमसीतर्फे शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच डिसेंबरच्या शेवटच्या शनिवारी पाणीकपात न करता जानेवारीपासून वाढीव कपात सुरू करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Waterपाणीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका