शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

आणखी एक दिवस कपात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 05:27 IST

केडीएमसी हद्दीत नवीन वर्षापासून अंमलबजावणी : महिन्यातील शेवटच्या शनिवारी शटडाउन

कल्याण : बारवी आणि आंध्र धरणांतील घसरणाऱ्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर लघुपाटबंधारे विभागाने ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्राधिकरणांना एका आठवड्यात ३० तास पाणीकपात करण्याचे आदेश दिले आहेत. सलग ३० तास कपात केल्यास पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या भीतीने केडीएमसीने मंगळवारी कपात सुरूच ठेवताना महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पूर्ण दिवस शटडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त गोविंद बोडके यांच्या मान्यतेनंतर ही अंमलबजावणी जानेवारीपासून होण्याची शक्यता आहे.

धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन १५ जुलैपर्यंत करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाने २१ आॅक्टोबरपासून २२ टक्केपाणीकपात लागू केली होती. परंतु, धरणातून सर्वच प्राधिकरणांकडून वारेमाप पाणी उचलले जात असल्यामुळे पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे पाणीकपातीत वाढ करण्याचा निर्णय लघुपाटबंधारे विभागाने घेतला आहे. केडीएमसीकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी, तर एमआयडीसीकडून पुरवले जाणारे पाणी शुक्रवारी २४ तास बंद असते. आता लघुपाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार ही कपात आता सहा तासांनी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे आता नागरिकांना ३० तासांच्या पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी बंद असतो. जर ३० तास सलग कपात लागू केली, तर पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: विस्कळीत होण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आणखीन एक दिवस शटडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे. सलग ३० तास कपात न करता त्यातील २४ तासांव्यतिरिक्त उर्वरित सहा तासांचे चार आठवडे मिळून एक पूर्ण दिवस शटडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो अतिरिक्त दिवस महिन्यातील शेवटचा शनिवार राहील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी दिली. आयुक्तांना यासंदर्भातील प्रस्ताव पाठवला असून त्यांच्या मान्यतेनंतर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.एमआयडीसीची सलग पाणीकपात?नागरिकांना सलग ३० तासांच्या पाणीकपातीची झळ बसू नये, म्हणून केडीएमसीने महिन्याच्या शेवटच्या शनिवारी शटडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयडीसी मात्र सलग ३० तासांची पाणीकपात लागू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होणाºया २७ गावांना पाणीटंचाईची तीव्र झळ बसण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.उद्या पाणी नाहीया आठवड्यात मंगळवारी शटडाउन घेण्यात आले नव्हते. त्याऐवजी, केडीएमसीतर्फे शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच डिसेंबरच्या शेवटच्या शनिवारी पाणीकपात न करता जानेवारीपासून वाढीव कपात सुरू करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Waterपाणीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका