शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक दिवस कपात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 05:27 IST

केडीएमसी हद्दीत नवीन वर्षापासून अंमलबजावणी : महिन्यातील शेवटच्या शनिवारी शटडाउन

कल्याण : बारवी आणि आंध्र धरणांतील घसरणाऱ्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर लघुपाटबंधारे विभागाने ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्राधिकरणांना एका आठवड्यात ३० तास पाणीकपात करण्याचे आदेश दिले आहेत. सलग ३० तास कपात केल्यास पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या भीतीने केडीएमसीने मंगळवारी कपात सुरूच ठेवताना महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पूर्ण दिवस शटडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त गोविंद बोडके यांच्या मान्यतेनंतर ही अंमलबजावणी जानेवारीपासून होण्याची शक्यता आहे.

धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन १५ जुलैपर्यंत करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाने २१ आॅक्टोबरपासून २२ टक्केपाणीकपात लागू केली होती. परंतु, धरणातून सर्वच प्राधिकरणांकडून वारेमाप पाणी उचलले जात असल्यामुळे पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे पाणीकपातीत वाढ करण्याचा निर्णय लघुपाटबंधारे विभागाने घेतला आहे. केडीएमसीकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी, तर एमआयडीसीकडून पुरवले जाणारे पाणी शुक्रवारी २४ तास बंद असते. आता लघुपाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार ही कपात आता सहा तासांनी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे आता नागरिकांना ३० तासांच्या पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी बंद असतो. जर ३० तास सलग कपात लागू केली, तर पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: विस्कळीत होण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आणखीन एक दिवस शटडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे. सलग ३० तास कपात न करता त्यातील २४ तासांव्यतिरिक्त उर्वरित सहा तासांचे चार आठवडे मिळून एक पूर्ण दिवस शटडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो अतिरिक्त दिवस महिन्यातील शेवटचा शनिवार राहील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी दिली. आयुक्तांना यासंदर्भातील प्रस्ताव पाठवला असून त्यांच्या मान्यतेनंतर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.एमआयडीसीची सलग पाणीकपात?नागरिकांना सलग ३० तासांच्या पाणीकपातीची झळ बसू नये, म्हणून केडीएमसीने महिन्याच्या शेवटच्या शनिवारी शटडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयडीसी मात्र सलग ३० तासांची पाणीकपात लागू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होणाºया २७ गावांना पाणीटंचाईची तीव्र झळ बसण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.उद्या पाणी नाहीया आठवड्यात मंगळवारी शटडाउन घेण्यात आले नव्हते. त्याऐवजी, केडीएमसीतर्फे शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच डिसेंबरच्या शेवटच्या शनिवारी पाणीकपात न करता जानेवारीपासून वाढीव कपात सुरू करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Waterपाणीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका