शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

... आणि बांगलादेशी वाघांचे झाले मांजर !

By admin | Updated: June 16, 2017 05:04 IST

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या उपांत्य लढतीचा निकाल अखेर अपेक्षेप्रमाणे लागला. संपूर्ण भूतल पादाक्रांत करण्याच्या इराद्याने

- बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
 
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या उपांत्य लढतीचा निकाल अखेर अपेक्षेप्रमाणे लागला. संपूर्ण भूतल पादाक्रांत करण्याच्या इराद्याने निघालेल्या सैन्याने वाटेत येणारे अडथळे अगदी सहजपणे चिरडून पुढे वाटचाल करावी, तसे विराट सेनेने बांगलादेशला चिरडले. तसे या सामन्यापूर्वी त्यांनी डरकाळ्या फार फोडल्या. सोशल मीडियावर टिंगल केली. पण प्रत्यक्ष मैदानात भारताच्या सिंहाशी गाठ पडल्यावर त्यांना पळता भूई थोडी झाली. मँचेस्टरच्या मैदानात फक्त भारतीय सिंहाची डरकाळी घुमली आणि बांगलादेशी वाघांचे पार मांजर झाले.
बांगलादेशचा संघ युवा आहे, त्यांच्यात जोश आहे. त्यांनी काही वेळा भारताला पराभूतही केलेय. पण म्हणून प्रत्येक वेळी भारतीय संघ त्यांच्यासमोर कमकुवत ठरेल असे नाही. या सामन्यात भारतीय संघ वरचढ ठरणार हे निश्चित होते. गरज होती ती प्रतिस्पर्ध्याला कमी न लेखता सावध राहण्याची. टीम इंडियाच्या शिलेदारांनी त्याची योग्य खबरदारी घेतली आणि अगदी शांतपणे आपली रणनीती अमलात आणत बांगलादेशला गारद केले.
खरंतर बांगलादेशी खेळाडू या लढतीत प्रचंड तयारी करून उतरले होते. जागतिक क्रिकेटच्या मंचावर भारतीय संघाला मात देण्याचा त्यांचा इरादा होता. खराब सुरुवात झाल्यानंतर तमीम इक्बाल आणि मुशफिकूर रहिम खेळपट्टीवर असेपर्यंत बांगलादेशने आपल्यावर वर्चस्व राखले होते. पण केदार जाधवला गोलंदाजीसाठी आणण्याचा विराट कोहलीचा डाव भारतीय संघासाठी मास्टरस्ट्रोक ठरला. केदारने घेतलेले तमिम आणि मुशफिकूरचे बळी सामन्यात टर्निंग पॉईंट ठरले. त्यानंतर मात्र बांगलादेशी खेळाडूंना सामन्यात पुनरागमन करणे शक्य झाले नाही. 
बांगलादेशी फलंदाजांनी अडखळत धडपडत उभे केलेले 265 धावांचे आव्हान भारतीय फलंदाजांसाठी किरकोळ होते. पुढे धवन, विराट आणि रोहितच्या फलंदाजीने ते अगदीच किरकोळ बनवून टाकले.  शानदार शतकी खेळी करणाऱ्या रोहिबरोबर विराटचेही शतक पूर्ण झाले असते तर दुधात साखर पडली असती, असो. धवन, विराट आणि रोहितची धडाकेबाज फलंदाजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या अंतिम लढतीपूर्वी सुचिन्हच म्हटले पाहिजे. तसेच प्रत्येक स्पर्धेगणिक आपली कामगिरी उंचावणारा बांगलादेशचा संघ भविष्यात अधिक देदीप्यमान यश मिळवेल, हेही येथे नमूद करावे लागले. आता आपल्याला रविवारवर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यात योगायोगाने पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत अंतिम लढत खेळण्याची संधी मिळालीय. त्यामुळे या लढतीचं महत्त्व शतपटीने वाढलंय. बाकी फायनलमध्ये पाकिस्तानला लोळवून अजिंक्यपद पटकावण्यात जी मजा आहे ती दुसऱ्या कशातही नाही...