शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

अद्भुत... अकल्पनीय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 12:04 IST

डोम्माराजू गुकेशच्या विजयाची तुलना ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर धावण्याची स्पर्धा कोणी ८ सेकंदांत पूर्ण केली, अशा विक्रमासोबत करता येईल. बाकीच्यांना शर्यत पूर्ण करण्यासाठी ९.५ सेकंद लागतात. त्यामुळे गुकेशचा पराक्रम हा अद्भुत, अकल्पनीय आहे. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

प्रवीण ठिपसे, ग्रॅण्डमास्टर 

सिंगापूर येथे झालेल्या वैयक्तिक विश्वविजेतेपद बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा चेन्नईचा डोम्माराजू गुकेश हा विजयी ठरला आहे. त्याने चीनच्या डिंग लिरेन याचा पराभव केला. यापूर्वी वैयक्तिक जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद विश्वनाथन आनंद हे एकमेव भारतीय खेळाडू होते. रॅपिडमध्ये महिलांमध्ये हा पराक्रम कोनेरू हम्पी यांनी केलेला आहे. गुकेशच्या पराक्रमाचा विचार केल्यास, जागतिक विजेतेपद मिळविणारे दुसरे भारतीय, असा उल्लेख करून चालणार नाही. यापूर्वी सर्वांत कमी वयात वैयक्तिक विजेतेपदासाठीचा विक्रम लेजेंडरी गॅरी कास्पारोव्ह यांच्या नावाने होता. ते २२ वर्षे ८ महिन्यांचे असताना जगज्जेते झाले होते. हा विक्रम सुमारे ३९ वर्षे अबाधित होता. विश्वनाथन आनंद किंवा मॅग्नस कार्ल्सन यांनाही तो मोडता आला नाही. गुकेश याने हा विक्रम मोडला तर आहेच, पण ४ वर्षे आणि २ महिन्यांच्या अंतराने विक्रम मोडला आहे. विश्वनाथन आनंद हे जेव्हा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते ठरले, त्यावेळी भारतात एक बुद्धिबळाची लाट आली होती. २०००च्या दशकात शशिकिरण, गांगुली, हरिकृष्ण, आदींनी २६चे रेटिंग पार केले. परंतु, सर्व खेळाडू हे २०-२५ जागतिक रैंकिंगच्या आत येऊन थांबले होते.

ऑलिम्पियाडमध्येही २०१४ चा अपवाद वगळता आपल्याला कधीही पदक मिळाले नव्हते. २०२२चे ऑलिम्पियाड भारतात झाले. कुठलाही प्रायोजक नसताना यजमानपद घेतले होते. मात्र, यामुळे भारतातील तरुण खेळाडूंना चांगली संधी मिळाली. त्यावेळी भारताला एकापेक्षा जास्त संघ खेळविता आले. मॅग्नस कार्ल्सन यांनी त्यावेळी भारताचा संघात प्रज्ञानानंद आणि गुकेश यासाख्या खेळाडुंचा 'ब' संघ पाहून तत्काळ प्रतिक्रिया दिली, की भारताचा 'ब' संघ हा 'अ' संघापेक्षा सरस आहे. तसेच झाले. पदक 'ब' संघाला मिळाले. त्यावेळी १६ वर्षांच्या गुकेशला पहिल्या पटावर सुवर्णपदक मिळाले आणि कार्ल्सनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आपण जगज्जेते होण्याचा प्रयत्न का करत नाही ? ही विचारधारा २०२२च्या ऑलिम्पियाडपासून सुरू झाली. त्यानंतर भारतीय खेळाडुंनी कार्ल्सन, डिंग लिरेन यासाख्या खेळाडूंना हरवायचे आहे, हा ध्यास धरला. आज भारताचा आव्हानवीर जगज्जेता बनला आहे.

कार्पोरेट क्षेत्राने पुढाकार घेण्याची गरज

भारतातील अंडर-१५ मधील १०० व इतर गटातील ३०० मुलामुलींना ग्रँडमास्टर्सकडून मोफत प्रशिक्षण मिळायला हवे. एक प्रस्ताव देण्यात आला आहे की, खासगी प्रायोजक आणून सुमारे ४०० खेळाडूंना मोफत प्रशिक्षण द्यावे, जेणेकरून सातत्याने चांगली परिस्थिती राहू शकते, जशी रशियामध्ये होती. अन्यथा एक भीती आहे की, गुकेश किंवा प्रज्ञानानंद यासारखे खेळाडू गेले आणि त्यानंतर कोणीच या तोडीचा खेळाडू तयार झाला नाही. यासाठी कार्पोरेट सेक्टरने प्रशिक्षणासाठी निधी दिला पाहिजे. अनेक गरीब किंवा मध्यम वर्गातील प्रतिभावंत खेळाडू एका टप्प्यात थांबतात. हे रोखण्यासाठी प्रशिक्षणाची सोय केली पाहिजे.

प्रशिक्षणावर होतो प्रचंड खर्च 

बरेच खेळाडू ग्रँडमास्टर होईपर्यंत सुमारे ४० ते ५० लाख रुपयांपर्यंत प्रशिक्षण आणि स्पर्धा खेळण्यावर खर्च करतात. त्यामुळे श्रीमंत वर्गातील खेळाडूच खेळू शकतात. आपल्याकडे आज ३६ हजार खेळाडूच नोंदणीकृत आहेत, जे स्पर्धामध्ये भाग घेतात. ऑनलाइनमध्ये हा आकडा ६ ते ७ कोटींवर आहे.  मात्र, ऑनलाइन खेळाडू काही जगज्जेते होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष स्पर्धा खेळणारे ३६ हजार एवढेच आहेत. त्यात महिलांचे प्रमाण केवळ ८ टक्के आहे. या परिस्थितीत भविष्य कसे आहे, याकडे पाहिले पाहिजे. पण, कुठेतरी प्रशिक्षणाची व्यवस्था निर्माण व्हायला हवी.

'यूएसएसआर'चा पॅटर्न राबविण्याची गरज

सुमारे ५० वर्षे बुद्धिबळात 'यूएसएसआर'चे वर्चस्व होते. तसे जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला प्रशिक्षणाची एक यंत्रणा उभारावी लागेल. प्रतिभावंत ३००-४०० खेळाडूंना प्रशिक्षित करता येईल. तरच भारत बुद्धिबळाचा सुपर पॉवर होईल. २०१८ मधील चीनसारखे होईल. २०१८मध्ये चीन सुपर पॉवर होता. महिला विजेतेपद, ऑलिम्पियाडमध्ये महिला व पुरुष गटाचे जेतेपद चीनकडे होते. गेल्या वर्षी डिंग लिरेन चॅम्पियन झाला. त्यावेळी चारही जेतेपद आमच्याकडे होते, अशा अभिमान चीनने दाखविला. परंतु, २०१८मध्ये शासकीय मदत थांबली. आज त्यांच्याकडे केवळ एकच महिला विजेतेपद राहिले आहे. तेदेखील कधीपर्यंत राहील, हे सांगता येत नाही. चीनने केलेला पराक्रम आपल्याला साध्य करायचा आहे. पण, आपल्याला यूएसएसआरसारखे सातत्य राखायचे आहे. यूएसएसआरसारखी पद्धत आपण कार्पोरेट सेक्टरकडून वापरायला हवी. नाहीतर अनेक प्रतिभाशाली खेळाडू खेळ सोडून देतील. आताचे खेळाडू पुढे ८-१० वर्षांनंतर जेव्हा खेळ सोडतील, तेव्हा त्यांची जागा घ्यायला कोणी खेळाडू नसेल. 

टॅग्स :Chessबुद्धीबळ