शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

आॅलिम्पिक रद्द झाल्यास सर्व प्रयत्न वाया जातील - चानू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 02:04 IST

गेल्या चार वर्षांपासून मीराबाईने आॅलिम्पिकमध्ये चांगला खेळ करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मात्र सध्या कोरोनामुळे २४ जुलै ते ९ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या आॅलिम्पिकचे काय होणार हा प्रश्न उभा ठाकला आहे.

नवी दिल्ली : ‘कोरोनामुळे टोकियो आॅलिम्पिक जर वेळेत झाले नाही , तर पदक मिळवण्यासाठीचे सर्व प्रयत्न वाया जातील,’ असे मत भारताची स्टार भारोत्तोलक मीराबाई चानू हिने म्हटले आहे. गेल्या चार वर्षांपासून मीराबाईने आॅलिम्पिकमध्ये चांगला खेळ करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मात्र सध्या कोरोनामुळे २४ जुलै ते ९ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या आॅलिम्पिकचे काय होणार हा प्रश्न उभा ठाकला आहे.आॅलिम्पिक आता रद्दही होऊ शकते. मीराबाईने सांगितले की,‘जर आॅलिम्पिक झाले नाही. तर आमची मागची चार वर्षांची मेहनत वाया जाईल. मला वाटते की स्पर्धा रद्द होऊ नये. मी देवाकडे रोज तशी प्रार्थना करत आहे. मी फक्त माझ्यासाठी एक आॅलिम्पिक पदक मागते.’ या आधी मीराबाईला रियो आॅलिम्पिकमध्ये क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये तिन्ही प्रयत्नात वजन उचलता आले नव्हते. कोरोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा स्थगित झाल्या आहेत.टोकियो स्पर्धाही कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव नष्ट होईपर्यंत स्थगित करण्याची मागणी होत आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने खेळाडूंना सराव सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यावरदेखील टीका होत आहे. मीराबाईने या आधीच आॅलिम्पिक कोटा मिळवलाआहे.ती म्हणाली की, ‘पदक जिंकण्यासाठीचा दबाव आता बदलला आहे. मी सरावाच्या वेळेचा विचार करत नाही. जर ही स्पर्धा स्थगित झाली तर खूप समस्या निर्माण होतील.’ भारोत्तोलनची आॅलिम्पिक पात्रता स्पर्धाही कोरोना विषाणूमुळे रद्द झाली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानू