शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

यश मिळाल्यानंतरच गुणवान मल्लांना मिळतात ‘प्रायोजक’, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे याने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 04:52 IST

खऱ्या अर्थाने प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असणा-या प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडूंनाच त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत आर्थिक पाठिंब्याची आवश्यकता असते,’ असे मत ‘रुस्तम-ए-हिंद’ व ‘महाराष्ट्र केसरी’ किताबांचा मानकरी अमोल बुचडे याने व्यक्त केले आहे.

- जयंत कुलकर्णीजालना : ‘राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला विशेष ठसा उमटवला, तरच खेळाडूंना प्रायोजक मिळतात; परंतु खऱ्या अर्थाने प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असणाºया प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडूंनाच त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत आर्थिक पाठिंब्याची आवश्यकता असते,’ असे मत ‘रुस्तम-ए-हिंद’ व ‘महाराष्ट्र केसरी’ किताबांचा मानकरी अमोल बुचडे याने व्यक्त केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडविण्यासाठी १० वर्षांपुढील प्रतिभावान खेळाडूंच्या गुणवत्तेला आकार देण्यासाठी प्रदीर्घ आराखडा आखून त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे अमोल बुचडेला वाटते.अमोलने २०१० साली पंजाबच्या जरखड येथे रुस्तम-ए-हिंदचा किताब पटकावला होता. तसेच याच वर्षी तो बारामती येथे महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला होता. जालना येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त त्याने ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.महाराष्ट्रातील बरेच मल्ल महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यावरच बºयाचदा समाधान मानतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याविषयी त्यांच्या मनात विचार येत नाही याविषयी तो म्हणाला, ‘आर्थिक स्थिती प्रतिकूल असणे, खेळण्यासाठी पोषक वातावरण नसणे आणि कौटुंबिक अडचण अथवा दुखापतीमुळे अनेक मल्लांना महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर खेळ थांबविणे भाग पडते. त्याचप्रमाणे एकदा महाराष्ट्र केसरी झाला की त्याच दर्जाची कामगिरी व्हायला पाहिजे ही मल्लाची इच्छा असते. फक्त महाराष्ट्र केसरी किताबावरच थांबण्याची त्याची स्वत:ची तशी कधीही वैयक्तिक इच्छा नसते. प्रत्येकाचीच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असते. आता ट्रेंड बदलत आहे. आता मल्ल फक्त एकदाच महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यावर समाधान मानत नाही. त्यांचे ध्येय हे तीनदा महाराष्ट्र केसरी होण्याचे आहे. मीदेखील महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर खेळलो आहे.’खेळाडूंना योग्य वयात प्रायोजक मिळत नसल्याची खंत अमोलने व्यक्त केली. अमोल यावेळी म्हणाला, ‘एक दर्जेदार मल्ल घडविण्यासाठी खूप आर्थिक खर्च असतो. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील मल्लांच्या खुराकासाठी किमान १ लाख व राज्य पातळीवरील मल्लांसाठी ५० हजार व सर्वसाधारण मल्लांसाठी २५ हजार रुपयांचा खर्च लागतो.’त्याचप्रमाणे, ‘नवोदित गुणवान मल्लांच्या गुणवत्तेला आकार देण्यासाठी व त्यांचा पाया भक्कम करण्यासाठी प्रायोजकाची गरज असते. तज्ज्ञ व मार्गदर्शकांचा सल्ला घेऊनच त्या खेळाडूला प्रायोजकत्व द्यायला हवे. मीदेखील माझ्या अकादमीत उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले आहे,’ असेही अमोल यावेळी म्हणाला.महाराष्ट्राला मिळेल आॅलिम्पिकमध्ये पदकखाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला आॅलिम्पिक मेडल मिळविण्याची धमक गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे यांच्यात असल्याचे अमोल बुचडे याने आवर्जून सांगितले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र