शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

गुजरात ६६ वर्षांनंतर फायनलमध्ये

By admin | Updated: January 5, 2017 02:19 IST

जसप्रित बुमराहच्या २९ धावांतील ६ बळींच्या जोरावर गुजरातने तब्बल ६६ वर्षानंतर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. व्हीसीएच्या सिव्हिल लाईन्स स्टेडियमवर झालेल्या

नागपूर : जसप्रित बुमराहच्या २९ धावांतील ६ बळींच्या जोरावर गुजरातने तब्बल ६६ वर्षानंतर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. व्हीसीएच्या सिव्हिल लाईन्स स्टेडियमवर झालेल्या पाच दिवसांच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी बुधवारी झारखंडला विजयासाठी २३५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण गुजरातपुढे त्यांनी दुसऱ्या डावात १११ धावांत नांगी टाकताच पराभव पत्करावा लागला.गुजरातने याआधी १९५०-५१ मध्ये एकदाच रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली होती. पण त्यावेळी झालेल्या अंतिम सामन्यात तत्कालीन होळकर संघाकडून(सध्याचा मध्य प्रदेश संघ) पराभवाचे तोंड पहावे लागले होते.गुजरातने सकाळी ४ बाद १०० वरून पुढे खेळ सुरू केला. त्यांचा दुसरा डाव २५२ धावांत आटोपताच झारखंडला विजयासाठी २३५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पहिल्यांदा रणजी करंडकाचा उपांत्य सामना खेळणारा झारखंड संघ हे आव्हान देखील पूर्ण करू शकला नाही. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या झारखंडच्या फलंदाजांनी गुजरातच्या माऱ्यापुढे गुडघे टेकले. त्यांचा दुसरा डाव ४१ षटकांत १११ धावांत संपुष्टात आला. दोन्ही सलामीवीर भोपळा न फोडताच परतले. केवळ पाच फलंदाज दुहेरी आकडा ओलांडण्यात यशस्वी ठरले. त्यात कुशालसिंग याने सर्वाधिक २४ धावा केल्या. एकाही जोडीला मोठी भागीदारी करता न आल्याने पाठोपाठ गडी गमावताच पराभवावर शिक्कामोर्तब झाले. गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलने केवळ तीनच गोलंदाजांचा शिताफीने उपयोग केला. बुमराहने १४ षटकांत २९ धावा देत सहा फलंदाजांना बाद करताना कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्याने या सामन्यात एकूण ७ गडी बाद केले. तसेच, पहिल्या डावात सहा गडी बाद करणारा वेगवान गोलंदाज आर. पी. सिंग याने दुसऱ्या डावातही तीन गडी टिपले. हार्दिक पटेल याने एक गडी बाद केला. गुजरातने सकाळी दुसऱ्या डावात ६ गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावांची भर घातली. (वृत्तसंस्था)