शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

गुजरात ६६ वर्षांनंतर फायनलमध्ये

By admin | Updated: January 5, 2017 02:19 IST

जसप्रित बुमराहच्या २९ धावांतील ६ बळींच्या जोरावर गुजरातने तब्बल ६६ वर्षानंतर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. व्हीसीएच्या सिव्हिल लाईन्स स्टेडियमवर झालेल्या

नागपूर : जसप्रित बुमराहच्या २९ धावांतील ६ बळींच्या जोरावर गुजरातने तब्बल ६६ वर्षानंतर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. व्हीसीएच्या सिव्हिल लाईन्स स्टेडियमवर झालेल्या पाच दिवसांच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी बुधवारी झारखंडला विजयासाठी २३५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण गुजरातपुढे त्यांनी दुसऱ्या डावात १११ धावांत नांगी टाकताच पराभव पत्करावा लागला.गुजरातने याआधी १९५०-५१ मध्ये एकदाच रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली होती. पण त्यावेळी झालेल्या अंतिम सामन्यात तत्कालीन होळकर संघाकडून(सध्याचा मध्य प्रदेश संघ) पराभवाचे तोंड पहावे लागले होते.गुजरातने सकाळी ४ बाद १०० वरून पुढे खेळ सुरू केला. त्यांचा दुसरा डाव २५२ धावांत आटोपताच झारखंडला विजयासाठी २३५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पहिल्यांदा रणजी करंडकाचा उपांत्य सामना खेळणारा झारखंड संघ हे आव्हान देखील पूर्ण करू शकला नाही. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या झारखंडच्या फलंदाजांनी गुजरातच्या माऱ्यापुढे गुडघे टेकले. त्यांचा दुसरा डाव ४१ षटकांत १११ धावांत संपुष्टात आला. दोन्ही सलामीवीर भोपळा न फोडताच परतले. केवळ पाच फलंदाज दुहेरी आकडा ओलांडण्यात यशस्वी ठरले. त्यात कुशालसिंग याने सर्वाधिक २४ धावा केल्या. एकाही जोडीला मोठी भागीदारी करता न आल्याने पाठोपाठ गडी गमावताच पराभवावर शिक्कामोर्तब झाले. गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलने केवळ तीनच गोलंदाजांचा शिताफीने उपयोग केला. बुमराहने १४ षटकांत २९ धावा देत सहा फलंदाजांना बाद करताना कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्याने या सामन्यात एकूण ७ गडी बाद केले. तसेच, पहिल्या डावात सहा गडी बाद करणारा वेगवान गोलंदाज आर. पी. सिंग याने दुसऱ्या डावातही तीन गडी टिपले. हार्दिक पटेल याने एक गडी बाद केला. गुजरातने सकाळी दुसऱ्या डावात ६ गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावांची भर घातली. (वृत्तसंस्था)