शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

आदित्य वर्मा यांचे शशांक मनोहर यांना आव्हान

By admin | Updated: February 26, 2016 04:06 IST

बिहार क्रिकेटला बीसीसीआयचे पूर्ण सदस्यत्व मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ कालावधीपासून संघर्ष करीत असलेले क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे (सीएबी) सचिव आदित्य वर्मा

नवी दिल्ली : बिहार क्रिकेटला बीसीसीआयचे पूर्ण सदस्यत्व मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ कालावधीपासून संघर्ष करीत असलेले क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे (सीएबी) सचिव आदित्य वर्मा यांनी आता बोर्डाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांना चर्चेसाठी आव्हान दिले आहे. आदित्य वर्मा यांनी बीसीसीआयवर अहंकार बाळगणारी संस्था असल्याचा आरोप करताना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात बीसीसीआय विरोधात याचिका दाखल केली आहे. वर्मा म्हणाले, ‘बीसीसीआय जस्टीस लोढा समितीच्या शिफारशींना महत्त्व देण्याचे टाळत असून न्यायालयाचा अवमान करीत आहे.’वर्मा पुढे म्हणाले, ‘मी सर्वोच्च न्यायालयात बीसीसीआयच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. यावर ३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. जस्टीस लोढा समितीने आपल्या शिफारशींमध्ये बिहारला पूर्ण सदस्यता बहाल करण्याची सूचना केली आहे; पण बीसीसीआयने मात्र अद्याप याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. बीसीसीआय स्वत:ला अहंकारी संस्था मानत असून त्यांच्या लेखी सर्वोच्च न्यायालयातर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीला महत्त्व नाही.’बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पदावरून हटविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आदित्य वर्मा यांनी आता शशांक मनोहर यांना खुले आव्हान दिले आहे. आदित्य म्हणाले, ‘शशांक मनोहर मोठे वकील आहेत; पण लोढा समितीच्या शिफारशींना ते महत्त्व देत नाहीत, ही आश्चर्याची बाब आहे. ते नियमबाह्य कृती का करीत आहेत, हे न समजण्यासारखे आहे. मी त्यांना वादविवादासाठी आव्हान देत असून यात माझी सरशी होईल, असा मला विश्वास आहे. त्यांनी जर मला पराभूत केले तर मी क्रिकेट सोडून देईल.’आदित्य पुढे म्हणाले, ‘गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापासून वंचित असलेल्या बिहारमधील क्रिकेटपटूंसाठी माझी लढाई सुरू आहे. बीसीसीआयने बिहारमधील कुठल्याही संघटनेला मान्यता दिली तर मला अडचण नाही. बीसीसीआयने कुठल्याही संघटनेला मान्यता न दिल्यामुळे मला सर्वोच्च न्यायलयाचे दार ठोठवावे लागले. ३ मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर बोर्डाला निश्चितच मोठा धक्का बसणार आहे. काही राज्यांमध्ये चार तर काहीमध्ये तीन असोसिएशन आहेत; पण बिहार प्रकरणात झारखंडची निर्मिती झाल्यानंतर झारखंड क्रिकेट संघटनेला मान्यता देण्यात आली. मात्र, बिहार क्रिकेट संघटनेकडे डोळेझाक करण्यात आली. मुंबईमध्ये गेल्या १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या बीसीसीआयच्या विशेष आमसभेमध्ये बोर्डाने अवैधपणे बीसीए पाटणा येथील एका गटाला पाचारण केले होते. त्यांना बैठकीमध्ये सहभागी होण्याची संधी दिली. हे लोढा समितीच्या अहवालाचे उल्लंघन आहे.’ (वृत्तसंस्था)शिफारशींचे पालन करण्यास टाळाटाळ लोढा समितीने आपल्या अहवालामध्ये बिहारला मताचा अधिकार बहाल करण्यासह पूर्ण सदस्यता प्रदान करण्याची शिफारस केली आहे. बीसीसीआयचे विद्यमान अधिकारी लोढा समितीच्या शिफारशींचे पालन करण्यास टाळाटाळ करीत आहेत. बीसीएच्या एका गटाला परवानगी बहाल करताना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करीत आहेत. मी दाखल केलेल्या याचिकेमध्ये बोर्डाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आणि लोढा समितीच्या अहवालाचा उल्लेख केला आहे.