शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Commonwealth Games:८८ वर्षांपूर्वी 'या' पैलवानाने मिळवून दिले होते भारताला पहिले राष्ट्रकुल पदक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 12:35 IST

तब्बल ८८ वर्षांपूर्वी भारताच्या पैलवानाने राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदक मिळवले होते.

Rashid Anwar । नवी दिल्ली : भारतासह जगभर सध्या राष्ट्रकुल स्पर्धेची चर्चा रंगली आहे. खरं तर या राष्ट्रकुल स्पर्धेची (Commonwealth Games) सुरूवात १९३० मध्ये झाली होती, मात्र तेव्हा भारताला यामध्ये सहभागी होत आले नव्हते. भारताला या बहुचर्चित स्पर्धेत सहभागी होण्याची संधी १९३४ मध्ये मिळाली. तेव्हा राष्ट्रकुल स्पर्धांना 'ब्रिटिश एम्पायर गेम्स' म्हणून ओळखले जात होते. लंडनमध्ये पार पडलेल्या या ब्रिटिश एम्पायर गेम्समध्ये भारताने थलेटिक्स आणि कुस्तीमध्ये ६ खेळाडूंचा गट पाठवला होता. या ६ खेळाडूंमधीलच एक नाव म्हणजे राशिद अनवर (Rashid Anwar)होते, ज्यांनी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताच्या विजयाचे खाते उघडले. राशिद यांनी तेव्हा कांस्य पदक जिंकून भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. 

राशिद अनवर यांचा जन्म १२ एप्रिल १९१० रोजी झाला होता. विशेष म्हणजे ते रेल्वेमध्ये नोकरी करत असताना त्यांची पोस्टिंग उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाली होती. या नोकरीसोबतच ते कुस्तीचे डावपेच शिकत गेले. माहितीनुसार, ते कुस्तीतील वेल्टरवेट श्रेणीमध्ये ८ वेळा नॅशनल चॅम्पियन राहिले होते. १९३४ मध्ये जेव्हा त्यांना एवढ्या मोठ्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी कांस्य पदकावर आपले नाव कोरले.  

१९४० मध्येही होते पदकाचे प्रबळ दावेदार राशिद अनवर यांनी १९३६ मध्ये बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र या ऑलिम्पिकमधील दुसऱ्या राउंडमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि ते बाहेर झाले. १९४० च्या ऑलिम्पिकसाठी अनवर यांनी जोरदार तयारी केली होती मात्र दुसऱ्या युद्धाच्या कारणास्तव ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. या ऑलिम्पिकमध्ये राशिद यांना पदकाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. कारण १९४० च्या ऑलिम्पिक आधी त्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चॅम्पियन पैलवान अल फुलर आणि बिली रिले यांना चितपट केले होते. त्यांच्या कुस्तीतील एका डावाला तर 'स्विंगिंग बोस्टन क्रॅब' असे नाव देण्यात आले होते. 

संघर्षमय प्रवास दुसऱ्या विश्व युद्धामुळे राशिद आणि कुस्ती यामधील अंतर वाढू लागले होते. कारण युद्धामुळे मोठ्या कालावधीपर्यंत स्पर्धांचे आयोजन होत नव्हते. अशा परिस्थितीत युद्धाच्या काळात राशिद यांनी रूग्णवाहिकेवर चालक म्हणून देखील काम केले. १९५७ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा कुस्तीच्या मैदानात पाय ठेवला आणि १९५९ मध्ये एका प्रसिद्ध सामन्यात चॅम्पियन हान्स स्ट्रीगरचा पराभव केला. यानंतर वाढत्या वयामुळे त्यांची कुस्तीवरील पकड हळूहळू ढासळत गेली. अखेर १९७३ मध्ये या संघर्षमय योद्ध्याची प्राणज्योत मावळली, तेव्हा ते लंडनमधील कॅमडेन येथे राहत होते. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Wrestlingकुस्तीLondonलंडनIndiaभारत