शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नवी मुंबईतील तरुणांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका; घरातील कर्त्या व्यक्तींचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 00:32 IST

४४५ कुटुंबीयांचा आधार हरपला, तरुणाईमध्ये मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. २० ते ५० वयोगटांतील तब्बल ४४५ जणांचा मृत्यू झाला आहे.  

नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाविषयी निष्काळजीपणा तरुणाईसाठीही धोकादायक ठरत आहे. आतापर्यंत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या व घराचा आधार असणाऱ्या २० ते ५० वयोगटांतील तब्बल ४४५ जणांचा मृत्यू झाला आहे. या वयोगटातील तब्बल २९ हजार २१४ जणांना कोरोची लागण झाली आहे. धोका अजून टळलेला नसल्यामुळे सर्वच वयोगटांतील नागरिकांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 

नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यास महानगरपालिकेस यश येऊ लागले आहे. या आठवड्यात रग्णवाढीपेक्षा बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोनामुक्तीची टक्केवारी धिम्या गतीने का होईना, पण सुधारू लागली आहे. प्रादुर्भाव कमी होत असला, तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. सद्यस्थितीमध्ये नागरिकांमधील विशेषत: तरुणाईमध्ये निष्काळजीपणा वाढत आहे. २० ते ५० वयोगटांतील नागरिक सर्वाधिक वेळ घराबाहेर असल्याचे निदर्शनास आले आहे. कोराेनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून नाेकरी, व्यवसाय व अर्थार्जनासाठी तरुणाईला घराबाहेर पडावे लागत आहे. कुटुंबीयांची जबाबदारी सांभाळताना घराबाहेर पडणे आवश्यक आहे, पण अशा वेळी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणेही आवश्यक आहे, परंतु अनेक जण नियमांचे पालन करत नाहीत. यामुळे प्रादुर्भाव होत आहे.

तरुणाईमध्ये मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. २० ते ५० वयोगटांतील तब्बल ४४५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील अनेक जण कुटुंबीयांचा आधार होते. काही जण कुटुंबामधील एकटेच कमवती व्यक्ती होती. अनेक जण यशस्वीपणे व्यवसाय करत होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी मार्केटमधील तरुण व्यापाऱ्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यांच्या परिवारातील तीन जणांचा पंधरा दिवसांत मृत्यू झाल्यामुळे कुटुंबातील उर्वरित सदस्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सीवूडमधील डॉक्टर व त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून, घरामध्ये फक्त तरुण मुलगा जिवंत आहे. नेरुळमधील एक तरुण वकील व सामाजिक कार्यकर्त्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्या चौकामध्ये त्यांच्या नवीन नियुक्तीचा फलक लागला होता, त्याच चौकात काही दिवसांमध्ये श्रद्धांजलीचा फलक लावावा लागला. 

नियमांचे पालन आवश्यकनोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर जाणाऱ्या तरुणांची संख्या जास्त आहे. २० ते ५० वयोगटांत सर्वात जास्त कोरोनाची लागण झालेली निदर्शनास आले आहे. घराबाहेर गेल्यामुळे तरुणाईला कोरोनाची लागण होते व त्यांच्यामुळे घरातील इतरांनाही लागण होत आहे. यामुळे तरुणांनी स्वत:च्या कुटुंबीयांसाठी तरी नियमांचे पालन करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका