शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील तरुणांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका; घरातील कर्त्या व्यक्तींचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 00:32 IST

४४५ कुटुंबीयांचा आधार हरपला, तरुणाईमध्ये मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. २० ते ५० वयोगटांतील तब्बल ४४५ जणांचा मृत्यू झाला आहे.  

नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाविषयी निष्काळजीपणा तरुणाईसाठीही धोकादायक ठरत आहे. आतापर्यंत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या व घराचा आधार असणाऱ्या २० ते ५० वयोगटांतील तब्बल ४४५ जणांचा मृत्यू झाला आहे. या वयोगटातील तब्बल २९ हजार २१४ जणांना कोरोची लागण झाली आहे. धोका अजून टळलेला नसल्यामुळे सर्वच वयोगटांतील नागरिकांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 

नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यास महानगरपालिकेस यश येऊ लागले आहे. या आठवड्यात रग्णवाढीपेक्षा बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोनामुक्तीची टक्केवारी धिम्या गतीने का होईना, पण सुधारू लागली आहे. प्रादुर्भाव कमी होत असला, तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. सद्यस्थितीमध्ये नागरिकांमधील विशेषत: तरुणाईमध्ये निष्काळजीपणा वाढत आहे. २० ते ५० वयोगटांतील नागरिक सर्वाधिक वेळ घराबाहेर असल्याचे निदर्शनास आले आहे. कोराेनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून नाेकरी, व्यवसाय व अर्थार्जनासाठी तरुणाईला घराबाहेर पडावे लागत आहे. कुटुंबीयांची जबाबदारी सांभाळताना घराबाहेर पडणे आवश्यक आहे, पण अशा वेळी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणेही आवश्यक आहे, परंतु अनेक जण नियमांचे पालन करत नाहीत. यामुळे प्रादुर्भाव होत आहे.

तरुणाईमध्ये मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. २० ते ५० वयोगटांतील तब्बल ४४५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील अनेक जण कुटुंबीयांचा आधार होते. काही जण कुटुंबामधील एकटेच कमवती व्यक्ती होती. अनेक जण यशस्वीपणे व्यवसाय करत होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी मार्केटमधील तरुण व्यापाऱ्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यांच्या परिवारातील तीन जणांचा पंधरा दिवसांत मृत्यू झाल्यामुळे कुटुंबातील उर्वरित सदस्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सीवूडमधील डॉक्टर व त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून, घरामध्ये फक्त तरुण मुलगा जिवंत आहे. नेरुळमधील एक तरुण वकील व सामाजिक कार्यकर्त्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्या चौकामध्ये त्यांच्या नवीन नियुक्तीचा फलक लागला होता, त्याच चौकात काही दिवसांमध्ये श्रद्धांजलीचा फलक लावावा लागला. 

नियमांचे पालन आवश्यकनोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर जाणाऱ्या तरुणांची संख्या जास्त आहे. २० ते ५० वयोगटांत सर्वात जास्त कोरोनाची लागण झालेली निदर्शनास आले आहे. घराबाहेर गेल्यामुळे तरुणाईला कोरोनाची लागण होते व त्यांच्यामुळे घरातील इतरांनाही लागण होत आहे. यामुळे तरुणांनी स्वत:च्या कुटुंबीयांसाठी तरी नियमांचे पालन करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका