शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

युवा ब्रिगेडला पसंती

By admin | Updated: May 27, 2017 02:27 IST

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत ४१८ उमेदवारांपैकी २० ते ४० वर्षे वयोगटातील ५० तरुण उमेदवार विजयी ठरले. शहराचे भविष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यंग ब्रिगेडला

प्राची सोनावणे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत ४१८ उमेदवारांपैकी २० ते ४० वर्षे वयोगटातील ५० तरुण उमेदवार विजयी ठरले. शहराचे भविष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यंग ब्रिगेडला मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. राजकारणासारख्या क्षेत्रातून समाजकार्य करण्यासाठी, तसेच चांगले बदल घडविण्याची संधी मिळाल्याने या विजयी तरुण उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक-८मधील प्रिया विजय भोईर या सर्वात कमी वयाच्या नगरसेविका ठरल्या. घराण्याचा राजकीय वारसा जपणारे हे तरुण आता नगरसेवकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. राजकारणातला फारसा अनुभव नसला, तरीदेखील काम करण्याची वृत्ती, घरातील वडीलधाऱ्यांकडून मिळालेले राजकारणाचे बाळकडू आणि काम करण्याच्या नव्या अंदाजाच्या जोरावर या उमेदवारांना चांगली मते मिळाल्याचे दिसून येते. या विजयी उमेदवारांमध्ये २१ ते ४० वयोगटातील उमेदवारांचा समावेश आहे. निवडून आलेले हे तरुण उमेदवार शहराच्या विकासाकरिता नक्कीच हातभार लावत असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पालिका निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांना सर्वाधिक पसंती दिली होती. २० ते ३० वर्षे वयोगटातील ६६ जण निवडणूक लढवत होते. ३० ते ४० वर्षे वयोगटातील १६१ जणांना उमेदवारी देण्यात आली होती. तरुणाई वेगळ्या नजरेने राजकारणाकडे पाहात आहे. तरुणांचे शिक्षण, कार्यक्षमतेचा वापर शहराच्या विकासासाठी करता यावा व तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी तरुणांना संधी दिली होती. निवडून आलेले तरुण कसे कामकाज करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीमध्ये १९,८५७ मतदारांनी वापरला ‘नोटा’महापालिकेच्या निवडणुकीमध्ये २ लाख ३३ हजार ९५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी तब्बल १९ हजार ८५७ जणांनी ‘नोटा’चा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘नोटा’ वापरणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असून सर्वच राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत २० प्रभागांमध्ये एकूण ४ लाख २५ हजार ४६४ मतदारांची नावे यादीमध्ये होती. यापैकी २ लाख ३३ हजार ९५ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले होते. यामध्ये १ लाख ४ हजार ७३७ महिला व १ लाख २८ हजार ३५८ पुरूष मतदारांचा समावेश होता. पहिल्या निवडणुकीमध्ये ५५ टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला होता. यापैकी तब्बल १९ हजार ८५७ जणांनी ‘नोटा’चा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवळपास २० हजार मतदारांना एकही उमेदवार पात्र वाटलेला नाही. प्रभाग २० क मध्ये तब्बल ५४२ जणांनी ‘नोटा’ वापरला आहे. प्रत्येक प्रभागामध्ये १०० ते ५०० मतदारांनी हा पर्याय वापरलेला आहे.