शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

राजकीय समीकरणे बदलवणारे वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:16 IST

राष्ट्रवादीला खिंडार; नाईक परिवारालाही धक्का; चारही मतदार संघांवर भाजपचे वर्चस्व

नवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये २०१९ हे वर्ष राजकीय समिकरण बदलवणारे ठरले. नाईक परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले. विधानसभा निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडीनंतर संदीप नाईक यांना उमेदवारीपासून वंचीत रहावे लागल्यामुळे नाईक परिवारासही धक्का बसला. भाजपसाठी हे वर्ष दिलासादायक ठरले असून चारही मतदार संघावर वर्चस्व मिळविण्यात पक्षाला यश आले आहे.नवी मुंबईमधील राजकारणाला मावळत्या वर्षामध्ये धक्कादायक कलाटणी मिळाली. लोकसभा निवडणुकीमध्ये ऐरोली व बेलापूर मतदार संघामध्ये शिवसेना उमेदवार राजन विचारे यांना प्रचंड मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादीच्या गोटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. राष्ट्रवादीमधील अनेक नगरसेवक शिवसेना व भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सर्वप्रथम ऐरोलीचे आमदार संदीप नाईक व नंतर माजी मंत्री गणेश नाईक, संजीव नाईक व पक्षाच्या ४८ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये खिंडार पडले. नाईकांच्या भाजप प्रवेशामुळे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे उमेदवारी धोक्यात आल्याचे बोलण्यात येत होते. परंतु शेवटच्या क्षणी पक्षाने म्हात्रे यांच्यावरच विश्वास दाखविला व गणेश नाईक यांची उमदेवारी कापली. नाईक समर्थकांसाठी हा निर्णय धक्कादायक होता. अखेर शेवटच्या क्षणी संदीप नाईक यांनी ऐरोली मतदार संघाचा त्याग करून तेथून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली. तिसऱ्यांदा निवडून येण्याचे संदीप नाईक यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. युतीमुळे शिवसेनेला एकही मतदार संघामध्ये उमेदवारी मिळाली नसल्यामुळे पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची निराशा झाली. विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागली.लोकसभा निवडणुकीमध्ये पनवेल व उरण विधानसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठे मताधिक्य मिळाले. यामुळे पवार कुटूंबियांच्या तिसºया पिढीतील पार्थ पवार यांना मावळ मतदार संघातून पराभवास सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीमध्येही पनवेलमधून भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी हॅट्रीक केली. युतीमध्ये उरण मतदार संघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला होता. परंतु तेथे भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी केली. त्यांच्या बंडखोरीला पक्षाने अप्रत्यक्षपणे पाठिंबा देवून निवडूणही आणले. शिवसेना उमेदवारास पराभवास सामोरे जावे लागले.पनवेल व उरण हा कित्येक दशके शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. परंतु विधानसभा निवडणुकीमध्येही दोन्ही मतदार संघामध्ये शेकापला पराभवास सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे दहा वर्षापुर्वी नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरातमध्ये भाजपचे अस्तीत्वही नव्हते. परंतु २०१९ मध्ये चारही मतदार संघावर भाजपने एकहाती वर्चस्व प्राप्त केले आहे.महापालिकेची समीकरणे बदललीनवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून भारतीय जनता पक्षाला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. २००५ व २०१० च्या निवडणुकीमध्ये फक्त १ नगसेवक निवडून आला होता. २०१५ च्या निवडणुकीमध्ये फक्त सहा नगरसेवक निवडून आले होते. परंतु २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिकेवर वर्चस्व निर्माण झाले असून २०२० मध्ये होणाºया निवडणुकीची सर्व समिकरणेच बदलली आहे.शिवसेना पदाधिकाऱ्यांची निराशालोकसभा निवडणुकीमधील यशानंतर शिवसेना पदाधिकाºयांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. विधानसभेसाठी बेलापूर मतदार संघामधून विजय नाहटा यांनी तयारी सुरू केली होती. ऐरोलीमधून विजय चोगुले यांच्यासह एम के मढवी यांनीही निवडणूक लढण्याची तयारी केली होती. परंतु युतीमध्ये दोन्ही मतदार संघ भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे शिवसैनीकांची व पक्षाच्या नेत्यांचीही निराशा झाली.वर्षभर फुटीची चर्चानवी मुंबईमध्ये सर्वच राजकिय पक्षामध्ये वर्षभर फुटीची चर्चा सुरू होती. काँगे्रसचे माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, विजय वाळूंज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीमधील तब्बल ४८ नगरसेवकांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमधील काही नगरसेवक महापालिका निवडणुकीपुर्वी फुटून शिवसेनेत येण्याची शक्यता वर्तविली जात असून संपूर्ण वर्ष फोडाफोडीच्या राजकारणाने गाजल्याचे चित्र पहावयास मिळाले.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस