शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

राजकीय समीकरणे बदलवणारे वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:16 IST

राष्ट्रवादीला खिंडार; नाईक परिवारालाही धक्का; चारही मतदार संघांवर भाजपचे वर्चस्व

नवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये २०१९ हे वर्ष राजकीय समिकरण बदलवणारे ठरले. नाईक परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले. विधानसभा निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडीनंतर संदीप नाईक यांना उमेदवारीपासून वंचीत रहावे लागल्यामुळे नाईक परिवारासही धक्का बसला. भाजपसाठी हे वर्ष दिलासादायक ठरले असून चारही मतदार संघावर वर्चस्व मिळविण्यात पक्षाला यश आले आहे.नवी मुंबईमधील राजकारणाला मावळत्या वर्षामध्ये धक्कादायक कलाटणी मिळाली. लोकसभा निवडणुकीमध्ये ऐरोली व बेलापूर मतदार संघामध्ये शिवसेना उमेदवार राजन विचारे यांना प्रचंड मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादीच्या गोटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. राष्ट्रवादीमधील अनेक नगरसेवक शिवसेना व भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सर्वप्रथम ऐरोलीचे आमदार संदीप नाईक व नंतर माजी मंत्री गणेश नाईक, संजीव नाईक व पक्षाच्या ४८ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये खिंडार पडले. नाईकांच्या भाजप प्रवेशामुळे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे उमेदवारी धोक्यात आल्याचे बोलण्यात येत होते. परंतु शेवटच्या क्षणी पक्षाने म्हात्रे यांच्यावरच विश्वास दाखविला व गणेश नाईक यांची उमदेवारी कापली. नाईक समर्थकांसाठी हा निर्णय धक्कादायक होता. अखेर शेवटच्या क्षणी संदीप नाईक यांनी ऐरोली मतदार संघाचा त्याग करून तेथून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली. तिसऱ्यांदा निवडून येण्याचे संदीप नाईक यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. युतीमुळे शिवसेनेला एकही मतदार संघामध्ये उमेदवारी मिळाली नसल्यामुळे पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची निराशा झाली. विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागली.लोकसभा निवडणुकीमध्ये पनवेल व उरण विधानसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठे मताधिक्य मिळाले. यामुळे पवार कुटूंबियांच्या तिसºया पिढीतील पार्थ पवार यांना मावळ मतदार संघातून पराभवास सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीमध्येही पनवेलमधून भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी हॅट्रीक केली. युतीमध्ये उरण मतदार संघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला होता. परंतु तेथे भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी केली. त्यांच्या बंडखोरीला पक्षाने अप्रत्यक्षपणे पाठिंबा देवून निवडूणही आणले. शिवसेना उमेदवारास पराभवास सामोरे जावे लागले.पनवेल व उरण हा कित्येक दशके शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. परंतु विधानसभा निवडणुकीमध्येही दोन्ही मतदार संघामध्ये शेकापला पराभवास सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे दहा वर्षापुर्वी नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरातमध्ये भाजपचे अस्तीत्वही नव्हते. परंतु २०१९ मध्ये चारही मतदार संघावर भाजपने एकहाती वर्चस्व प्राप्त केले आहे.महापालिकेची समीकरणे बदललीनवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून भारतीय जनता पक्षाला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. २००५ व २०१० च्या निवडणुकीमध्ये फक्त १ नगसेवक निवडून आला होता. २०१५ च्या निवडणुकीमध्ये फक्त सहा नगरसेवक निवडून आले होते. परंतु २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिकेवर वर्चस्व निर्माण झाले असून २०२० मध्ये होणाºया निवडणुकीची सर्व समिकरणेच बदलली आहे.शिवसेना पदाधिकाऱ्यांची निराशालोकसभा निवडणुकीमधील यशानंतर शिवसेना पदाधिकाºयांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. विधानसभेसाठी बेलापूर मतदार संघामधून विजय नाहटा यांनी तयारी सुरू केली होती. ऐरोलीमधून विजय चोगुले यांच्यासह एम के मढवी यांनीही निवडणूक लढण्याची तयारी केली होती. परंतु युतीमध्ये दोन्ही मतदार संघ भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे शिवसैनीकांची व पक्षाच्या नेत्यांचीही निराशा झाली.वर्षभर फुटीची चर्चानवी मुंबईमध्ये सर्वच राजकिय पक्षामध्ये वर्षभर फुटीची चर्चा सुरू होती. काँगे्रसचे माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, विजय वाळूंज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीमधील तब्बल ४८ नगरसेवकांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमधील काही नगरसेवक महापालिका निवडणुकीपुर्वी फुटून शिवसेनेत येण्याची शक्यता वर्तविली जात असून संपूर्ण वर्ष फोडाफोडीच्या राजकारणाने गाजल्याचे चित्र पहावयास मिळाले.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस