शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

राजकीय समीकरणे बदलवणारे वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:16 IST

राष्ट्रवादीला खिंडार; नाईक परिवारालाही धक्का; चारही मतदार संघांवर भाजपचे वर्चस्व

नवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये २०१९ हे वर्ष राजकीय समिकरण बदलवणारे ठरले. नाईक परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले. विधानसभा निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडीनंतर संदीप नाईक यांना उमेदवारीपासून वंचीत रहावे लागल्यामुळे नाईक परिवारासही धक्का बसला. भाजपसाठी हे वर्ष दिलासादायक ठरले असून चारही मतदार संघावर वर्चस्व मिळविण्यात पक्षाला यश आले आहे.नवी मुंबईमधील राजकारणाला मावळत्या वर्षामध्ये धक्कादायक कलाटणी मिळाली. लोकसभा निवडणुकीमध्ये ऐरोली व बेलापूर मतदार संघामध्ये शिवसेना उमेदवार राजन विचारे यांना प्रचंड मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादीच्या गोटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. राष्ट्रवादीमधील अनेक नगरसेवक शिवसेना व भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सर्वप्रथम ऐरोलीचे आमदार संदीप नाईक व नंतर माजी मंत्री गणेश नाईक, संजीव नाईक व पक्षाच्या ४८ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये खिंडार पडले. नाईकांच्या भाजप प्रवेशामुळे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे उमेदवारी धोक्यात आल्याचे बोलण्यात येत होते. परंतु शेवटच्या क्षणी पक्षाने म्हात्रे यांच्यावरच विश्वास दाखविला व गणेश नाईक यांची उमदेवारी कापली. नाईक समर्थकांसाठी हा निर्णय धक्कादायक होता. अखेर शेवटच्या क्षणी संदीप नाईक यांनी ऐरोली मतदार संघाचा त्याग करून तेथून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली. तिसऱ्यांदा निवडून येण्याचे संदीप नाईक यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. युतीमुळे शिवसेनेला एकही मतदार संघामध्ये उमेदवारी मिळाली नसल्यामुळे पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची निराशा झाली. विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागली.लोकसभा निवडणुकीमध्ये पनवेल व उरण विधानसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठे मताधिक्य मिळाले. यामुळे पवार कुटूंबियांच्या तिसºया पिढीतील पार्थ पवार यांना मावळ मतदार संघातून पराभवास सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीमध्येही पनवेलमधून भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी हॅट्रीक केली. युतीमध्ये उरण मतदार संघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला होता. परंतु तेथे भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी केली. त्यांच्या बंडखोरीला पक्षाने अप्रत्यक्षपणे पाठिंबा देवून निवडूणही आणले. शिवसेना उमेदवारास पराभवास सामोरे जावे लागले.पनवेल व उरण हा कित्येक दशके शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. परंतु विधानसभा निवडणुकीमध्येही दोन्ही मतदार संघामध्ये शेकापला पराभवास सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे दहा वर्षापुर्वी नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरातमध्ये भाजपचे अस्तीत्वही नव्हते. परंतु २०१९ मध्ये चारही मतदार संघावर भाजपने एकहाती वर्चस्व प्राप्त केले आहे.महापालिकेची समीकरणे बदललीनवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून भारतीय जनता पक्षाला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. २००५ व २०१० च्या निवडणुकीमध्ये फक्त १ नगसेवक निवडून आला होता. २०१५ च्या निवडणुकीमध्ये फक्त सहा नगरसेवक निवडून आले होते. परंतु २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिकेवर वर्चस्व निर्माण झाले असून २०२० मध्ये होणाºया निवडणुकीची सर्व समिकरणेच बदलली आहे.शिवसेना पदाधिकाऱ्यांची निराशालोकसभा निवडणुकीमधील यशानंतर शिवसेना पदाधिकाºयांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. विधानसभेसाठी बेलापूर मतदार संघामधून विजय नाहटा यांनी तयारी सुरू केली होती. ऐरोलीमधून विजय चोगुले यांच्यासह एम के मढवी यांनीही निवडणूक लढण्याची तयारी केली होती. परंतु युतीमध्ये दोन्ही मतदार संघ भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे शिवसैनीकांची व पक्षाच्या नेत्यांचीही निराशा झाली.वर्षभर फुटीची चर्चानवी मुंबईमध्ये सर्वच राजकिय पक्षामध्ये वर्षभर फुटीची चर्चा सुरू होती. काँगे्रसचे माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, विजय वाळूंज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीमधील तब्बल ४८ नगरसेवकांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमधील काही नगरसेवक महापालिका निवडणुकीपुर्वी फुटून शिवसेनेत येण्याची शक्यता वर्तविली जात असून संपूर्ण वर्ष फोडाफोडीच्या राजकारणाने गाजल्याचे चित्र पहावयास मिळाले.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस