शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

राजकीय समीकरणे बदलवणारे वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:16 IST

राष्ट्रवादीला खिंडार; नाईक परिवारालाही धक्का; चारही मतदार संघांवर भाजपचे वर्चस्व

नवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये २०१९ हे वर्ष राजकीय समिकरण बदलवणारे ठरले. नाईक परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले. विधानसभा निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडीनंतर संदीप नाईक यांना उमेदवारीपासून वंचीत रहावे लागल्यामुळे नाईक परिवारासही धक्का बसला. भाजपसाठी हे वर्ष दिलासादायक ठरले असून चारही मतदार संघावर वर्चस्व मिळविण्यात पक्षाला यश आले आहे.नवी मुंबईमधील राजकारणाला मावळत्या वर्षामध्ये धक्कादायक कलाटणी मिळाली. लोकसभा निवडणुकीमध्ये ऐरोली व बेलापूर मतदार संघामध्ये शिवसेना उमेदवार राजन विचारे यांना प्रचंड मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादीच्या गोटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. राष्ट्रवादीमधील अनेक नगरसेवक शिवसेना व भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सर्वप्रथम ऐरोलीचे आमदार संदीप नाईक व नंतर माजी मंत्री गणेश नाईक, संजीव नाईक व पक्षाच्या ४८ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये खिंडार पडले. नाईकांच्या भाजप प्रवेशामुळे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे उमेदवारी धोक्यात आल्याचे बोलण्यात येत होते. परंतु शेवटच्या क्षणी पक्षाने म्हात्रे यांच्यावरच विश्वास दाखविला व गणेश नाईक यांची उमदेवारी कापली. नाईक समर्थकांसाठी हा निर्णय धक्कादायक होता. अखेर शेवटच्या क्षणी संदीप नाईक यांनी ऐरोली मतदार संघाचा त्याग करून तेथून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली. तिसऱ्यांदा निवडून येण्याचे संदीप नाईक यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. युतीमुळे शिवसेनेला एकही मतदार संघामध्ये उमेदवारी मिळाली नसल्यामुळे पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची निराशा झाली. विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागली.लोकसभा निवडणुकीमध्ये पनवेल व उरण विधानसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठे मताधिक्य मिळाले. यामुळे पवार कुटूंबियांच्या तिसºया पिढीतील पार्थ पवार यांना मावळ मतदार संघातून पराभवास सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीमध्येही पनवेलमधून भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी हॅट्रीक केली. युतीमध्ये उरण मतदार संघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला होता. परंतु तेथे भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी केली. त्यांच्या बंडखोरीला पक्षाने अप्रत्यक्षपणे पाठिंबा देवून निवडूणही आणले. शिवसेना उमेदवारास पराभवास सामोरे जावे लागले.पनवेल व उरण हा कित्येक दशके शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. परंतु विधानसभा निवडणुकीमध्येही दोन्ही मतदार संघामध्ये शेकापला पराभवास सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे दहा वर्षापुर्वी नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरातमध्ये भाजपचे अस्तीत्वही नव्हते. परंतु २०१९ मध्ये चारही मतदार संघावर भाजपने एकहाती वर्चस्व प्राप्त केले आहे.महापालिकेची समीकरणे बदललीनवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून भारतीय जनता पक्षाला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. २००५ व २०१० च्या निवडणुकीमध्ये फक्त १ नगसेवक निवडून आला होता. २०१५ च्या निवडणुकीमध्ये फक्त सहा नगरसेवक निवडून आले होते. परंतु २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिकेवर वर्चस्व निर्माण झाले असून २०२० मध्ये होणाºया निवडणुकीची सर्व समिकरणेच बदलली आहे.शिवसेना पदाधिकाऱ्यांची निराशालोकसभा निवडणुकीमधील यशानंतर शिवसेना पदाधिकाºयांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. विधानसभेसाठी बेलापूर मतदार संघामधून विजय नाहटा यांनी तयारी सुरू केली होती. ऐरोलीमधून विजय चोगुले यांच्यासह एम के मढवी यांनीही निवडणूक लढण्याची तयारी केली होती. परंतु युतीमध्ये दोन्ही मतदार संघ भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे शिवसैनीकांची व पक्षाच्या नेत्यांचीही निराशा झाली.वर्षभर फुटीची चर्चानवी मुंबईमध्ये सर्वच राजकिय पक्षामध्ये वर्षभर फुटीची चर्चा सुरू होती. काँगे्रसचे माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, विजय वाळूंज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीमधील तब्बल ४८ नगरसेवकांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमधील काही नगरसेवक महापालिका निवडणुकीपुर्वी फुटून शिवसेनेत येण्याची शक्यता वर्तविली जात असून संपूर्ण वर्ष फोडाफोडीच्या राजकारणाने गाजल्याचे चित्र पहावयास मिळाले.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस