शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

वाशी खाडीवर तिसऱ्या पुलाचे काम; मंत्री दादाजी भुसे यांनी काढला २०२४ चा मुहूर्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 12:01 IST

सध्यातरी वाहतूककोंडीतून मुंबईकरांची सुटका नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावरील वाशी खाडीवर तिसरा पूल उभारण्यात येत आहे.  या पुलाची एक मार्गिका मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (एमएसआरडीसी) दादाजी भुसे यांनी पाहणी केल्यानंतर सांगितले. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सध्या तरी सुटका होणार नाही, असेच दिसून येत आहे. राजधानी मुंबईला नवी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राशी जोडणाऱ्या वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलाची गुरुवारी सकाळी मंत्री भुसे यांनी पाहणी केली.

दोन्ही बाजूंच्या पुलांचे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत ऑगस्ट २०२४ असून, त्यातील एका बाजूकडील ३ लेनचा पूल मे २०२४ पर्यंत तर संपूर्ण पूल सप्टेंबर २०२४ अखेरीस पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

७७५ कोटींहून अधिक खर्च

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या या बहुचर्चित तिसऱ्या पुलाच्या निर्मितीसाठी सुरुवातीला कांदळवनाचा अडथळा निर्माण झाला होता; परंतु सर्व अडथळे पार झाल्यानंतर रस्ते विकास महामंडळाने एल ॲण्ड टी कंपनीला कार्यादेश दिले आहेत. त्यानुसार वेगाने काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. या कामावर ७७५ कोटींहून अधिक खर्च करण्यात येत आहे.

टोलनाका परिसरात वाहतूककोंडी

नवी मुंबई आणि मुंबईला जोडणारा पहिला खाडी पूल १९७१, तर दुसरा खाडी पूल १९९५ मध्ये सुरू झाला आहे. मधल्या काळात शीव-पनवेल महामार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ झाली. यामुळे दोन्ही बाजूंच्या टोलनाक्यांच्या परिसरात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे यातून सुटका करण्यासाठी या तिसऱ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई