शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

वाशी खाडीवर तिसऱ्या पुलाचे काम; मंत्री दादाजी भुसे यांनी काढला २०२४ चा मुहूर्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 12:01 IST

सध्यातरी वाहतूककोंडीतून मुंबईकरांची सुटका नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावरील वाशी खाडीवर तिसरा पूल उभारण्यात येत आहे.  या पुलाची एक मार्गिका मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (एमएसआरडीसी) दादाजी भुसे यांनी पाहणी केल्यानंतर सांगितले. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सध्या तरी सुटका होणार नाही, असेच दिसून येत आहे. राजधानी मुंबईला नवी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राशी जोडणाऱ्या वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलाची गुरुवारी सकाळी मंत्री भुसे यांनी पाहणी केली.

दोन्ही बाजूंच्या पुलांचे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत ऑगस्ट २०२४ असून, त्यातील एका बाजूकडील ३ लेनचा पूल मे २०२४ पर्यंत तर संपूर्ण पूल सप्टेंबर २०२४ अखेरीस पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

७७५ कोटींहून अधिक खर्च

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या या बहुचर्चित तिसऱ्या पुलाच्या निर्मितीसाठी सुरुवातीला कांदळवनाचा अडथळा निर्माण झाला होता; परंतु सर्व अडथळे पार झाल्यानंतर रस्ते विकास महामंडळाने एल ॲण्ड टी कंपनीला कार्यादेश दिले आहेत. त्यानुसार वेगाने काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. या कामावर ७७५ कोटींहून अधिक खर्च करण्यात येत आहे.

टोलनाका परिसरात वाहतूककोंडी

नवी मुंबई आणि मुंबईला जोडणारा पहिला खाडी पूल १९७१, तर दुसरा खाडी पूल १९९५ मध्ये सुरू झाला आहे. मधल्या काळात शीव-पनवेल महामार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ झाली. यामुळे दोन्ही बाजूंच्या टोलनाक्यांच्या परिसरात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे यातून सुटका करण्यासाठी या तिसऱ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई