शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

नेरुळमधील वंडर्स पार्कची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 05:16 IST

तपासणी न करताच दिला जातोय प्रवेश : महापालिकेची उदासीनता, नागरिकांची नाराजी

योगेश पिंगळे

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ येथील वंडर्स पार्कमध्ये फिरायला येणाºया नागरिकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पार्कमध्ये येणाºया नागरिकांची कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात येत नाही त्यामुळे वंडर्स पार्कआणि या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या उदासीनतेमुळे पार्कमध्ये एखादी गंभीर घटना होणे नाकारता येत नसून पालिकेच्या कामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई शहराच्या आकर्षणात भर घालणाºया आणि शहराचा नावलौकिक वाढविणाºया नेरु ळ येथे महापालिकेने निर्माण केलेल्या वंडर्स पार्कमध्ये शहरातून आणि शहराबाहेरून येणाºया नागरिकांची संख्या वाढली आहे. लहान मुलांबरोबर मोठ्यांना देखील मौजमजा करता येईल अशा प्रकारची आकर्षक खेळणी या उद्यानात बसविण्यात आली असल्याने उद्यान नागरिक आणि बच्चे कंपनींचे आकर्षण ठरले आहे. पार्कचे प्रवेश शुल्क प्रौढांसाठी ३५ रु पये तर लहान मुलांसाठी २५ रु पये आकारण्यात येत असले तरी देखील पार्कमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी आहेत. पार्कची आणि येथे येणाºया नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पालिकेची आहे. परंतु पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पार्कमध्ये येणाºया नागरिकांची कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात येत नाही. त्यामुळे या पार्कमध्ये येणाºया सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पार्कची सुरक्षा यंत्रणा कशा प्रकारे काम करते याचा आम्ही स्टिंग आॅपरेशन करून प्रत्यक्ष आढावा घेतला. या पाहणीमध्ये एका व्यक्तीकडे शस्त्र देण्यात आले होते. पार्कच्या प्रवेशद्वारावर तिकीट काढल्यावर त्या व्यक्तीने सुरक्षा रक्षकाला तिकीट दाखवून पार्कमध्ये सहज प्रवेश केला. त्यानंतर शस्त्र बाळगून पार्कमध्ये सगळीकडे वावरला असताना देखील अडवले नाही.यामुळे महापालिकेच्या पार्कची सुरक्षा यंत्रणा किती तकलादू आहे याचा अनुभव आला आहे. पार्कमध्ये येणारे नागरिक बॅगा, पिशव्या घेऊन येतात. नागरिकांना तसेच त्यांच्याकडे असलेल्या पिशव्या, बॅगा तपासण्यासाठी मेटल डिटेक्टरसारखी यंत्रणा पार्कमध्ये उपलब्ध नाही.वंडर्स पार्कमध्ये प्रवेशासाठी शुल्क आकारले जाते. प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक फक्त तिकीट तपासण्याचे काम करतात, नागरिकांकडे असलेल्या बॅगा, पिशव्या तपासल्या जात नाहीत. पार्कमध्ये तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे वंडर्स पार्क नागरिकांसाठी असुरक्षित आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने सुरक्षा यंत्रणा सुरू करणे गरजेचे आहे.- किशोर पवार, नागरिक

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई