शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

नेरुळमधील वंडर्स पार्कची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 05:16 IST

तपासणी न करताच दिला जातोय प्रवेश : महापालिकेची उदासीनता, नागरिकांची नाराजी

योगेश पिंगळे

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ येथील वंडर्स पार्कमध्ये फिरायला येणाºया नागरिकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पार्कमध्ये येणाºया नागरिकांची कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात येत नाही त्यामुळे वंडर्स पार्कआणि या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या उदासीनतेमुळे पार्कमध्ये एखादी गंभीर घटना होणे नाकारता येत नसून पालिकेच्या कामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई शहराच्या आकर्षणात भर घालणाºया आणि शहराचा नावलौकिक वाढविणाºया नेरु ळ येथे महापालिकेने निर्माण केलेल्या वंडर्स पार्कमध्ये शहरातून आणि शहराबाहेरून येणाºया नागरिकांची संख्या वाढली आहे. लहान मुलांबरोबर मोठ्यांना देखील मौजमजा करता येईल अशा प्रकारची आकर्षक खेळणी या उद्यानात बसविण्यात आली असल्याने उद्यान नागरिक आणि बच्चे कंपनींचे आकर्षण ठरले आहे. पार्कचे प्रवेश शुल्क प्रौढांसाठी ३५ रु पये तर लहान मुलांसाठी २५ रु पये आकारण्यात येत असले तरी देखील पार्कमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी आहेत. पार्कची आणि येथे येणाºया नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पालिकेची आहे. परंतु पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पार्कमध्ये येणाºया नागरिकांची कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात येत नाही. त्यामुळे या पार्कमध्ये येणाºया सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पार्कची सुरक्षा यंत्रणा कशा प्रकारे काम करते याचा आम्ही स्टिंग आॅपरेशन करून प्रत्यक्ष आढावा घेतला. या पाहणीमध्ये एका व्यक्तीकडे शस्त्र देण्यात आले होते. पार्कच्या प्रवेशद्वारावर तिकीट काढल्यावर त्या व्यक्तीने सुरक्षा रक्षकाला तिकीट दाखवून पार्कमध्ये सहज प्रवेश केला. त्यानंतर शस्त्र बाळगून पार्कमध्ये सगळीकडे वावरला असताना देखील अडवले नाही.यामुळे महापालिकेच्या पार्कची सुरक्षा यंत्रणा किती तकलादू आहे याचा अनुभव आला आहे. पार्कमध्ये येणारे नागरिक बॅगा, पिशव्या घेऊन येतात. नागरिकांना तसेच त्यांच्याकडे असलेल्या पिशव्या, बॅगा तपासण्यासाठी मेटल डिटेक्टरसारखी यंत्रणा पार्कमध्ये उपलब्ध नाही.वंडर्स पार्कमध्ये प्रवेशासाठी शुल्क आकारले जाते. प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक फक्त तिकीट तपासण्याचे काम करतात, नागरिकांकडे असलेल्या बॅगा, पिशव्या तपासल्या जात नाहीत. पार्कमध्ये तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे वंडर्स पार्क नागरिकांसाठी असुरक्षित आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने सुरक्षा यंत्रणा सुरू करणे गरजेचे आहे.- किशोर पवार, नागरिक

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई