शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

वाहून गेलेली ‘ती’ महिला बेपत्ताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:18 IST

उमरोली येथील पुलावरून दुचाकीसह वाहून गेलेल्या दोघांपैकी आदित्य आंब्रे याचा मृतदेह सापडला आहे.

मयूर तांबडेपनवेल : उमरोली येथील पुलावरून दुचाकीसह वाहून गेलेल्या दोघांपैकी आदित्य आंब्रे याचा मृतदेह सापडला आहे. मात्र, सारिका आंब्रे यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सलग चार दिवस शोध घेऊनही सारिका यांचा मृतदेह न सापडल्याने अखेर शनिवारी शोधमोहीम थांबविण्यात आली. त्यामुळे पुणे येथून आलेली एनडीआरएफची टीमदेखील माघारी परतली आहे.गेल्या आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे उमरोली पूल पाण्याखाली गेला होता, या पुलावरून जाताना दुचाकीसह आदित्य आंब्रे व सारिका आंब्रे हे पती-पत्नी वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. पहिले दोन दिवस काहीच पत्ता लागला नाही. पहिल्या दिवशी घटनास्थळी सारिका हिच्या चप्पल आढळून आल्या. पनवेल येथील निसर्ग मित्र संस्था व अग्निशमन दलाच्या जवानांनीही मृतदेहांचा शोध घेतला. मात्र, त्यांना यश आले नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० जुलै रोजी एनडीआरएफची टीम व बॉर्डर सिक्युरिटी संस्था घटनास्थळी दाखल झाली. या टीमने शर्थीचे प्रयत्न करीत वाहून गेलेली मोटारसायकल शोधून काढली. मात्र, वाहून गेलेल्या दोघांचा शोध लागला नाही. ११ जुलै रोजी सकाळी एनडीआरएफच्या ३५ जणांच्या टीमने पुन्हा शांतिवन येथून मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. शांतिवन ते नेरे येथील गाढी नदीच्या मध्यभागी त्यांना आदित्य आंब्रे यांच्या अंगावरील रेनकोट सापडून आला. त्यामुळे शोधमोहीम अधिक जोरात करण्यात आली. पुणे येथील एनडीआरएफ, सिडको अग्निशमन दल, पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयामार्फत तिसºया दिवशीही शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, पनवेल कोळीवाडा येथील हरिचंद्र (हारू) भगत, प्रमोद भगत, कमलाकर कोळी, मनोज कोळी, कृष्णा कोळी या मच्छीमारांनीही या मोहिमेत भाग घेतला. अखेर तिसºया दिवशी कामोठे-जुई खाडीत मच्छीमारांना आदित्य आंब्रे याचा मृत्यदेह आढळून आला. त्यांनी ताबडतोब संबंधितांना याची माहिती दिली. मृतदेह खाडीतून काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. त्याच्यावर उमरोली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. चौथ्या दिवशी म्हणजेच १२ जुलै रोजी एनडीआरएफच्या टीमने उमरोली ते खाडीपर्यंत पुन्हा शोधमोहीम राबवली. मात्र, सारिका आंब्रे हिचा मृतदेह सापडला नाही. एनडीआरएफच्या टीमने शोधमोहीम थांबवली आहे.