शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

दोन तासांत सभा उरकली; तब्बल १२३ कोटींचे प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 23:38 IST

११६ पैकी शेवटपर्यंत ३४ नगरसेवकच उपस्थित

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. यामुळे महानगरपालिकेमध्ये विकासकामांचे प्रस्ताव मार्गी लावण्याची घाई सुरू झाली आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये तब्बल १२३ कोटी रुपयांचे ५४ प्रस्ताव चर्चा न करताच मंजूर करण्यात आले. ११६ नगरसेवकांपैकी शेवटपर्यंत फक्त ३४ नगरसेवकच उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक महिन्याच्या २० तारखेच्या दरम्यान सर्वसाधारण सभेचे आयोजन करत असते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे सप्टेंबर महिन्याची सभा १३ सप्टेंबरलाच आयोजित करण्यात आली. सकाळी ११ वाजता सभा सुरू होणे अपेक्षित होते. परंतु नगरसेवक वेळेत उपस्थित न झाल्यामुळे दोन तास उशिरा सभेचे कामकाज सुरू झाले. साडेबारा वाजता फक्त १४ नगरसेवक उपस्थित होते. एक वाजता ११६ नगरसेवकांपैकी फक्त ६० नगरसेवक उपस्थित होते. विषय पत्रिकेवर प्रशासनाने पाठविलेले ९ विषय होते. आयत्या वेळी ४५ प्रस्ताव मांडण्यात आले. रोडचे काँक्रीटीकरण, पदपथ निर्मिती, उद्यानांची सुधारणा व इतर अनेक महत्त्वाचे विषय सभागृहात मांडण्यात आले. एकाही विषयावर चर्चा करण्यात आली नाही. सभागृह नेत्यांनी प्रस्ताव मांडले की तत्काळ मंजूर झाल्याची घोषणा करून दुसरा प्रस्ताव मंजुरीसाठी घेतला जात होता. एका प्रस्तावावर शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी बोलण्यासाठी हात वर केला, परंतु त्यांना बोलू न देता विषय मंजूर करण्यात आला. शेवटचे दोन प्रस्ताव मांडण्याची घोषणा करण्यात आली, परंतु त्या प्रस्तावांची विषयपत्रिकाही कोणाकडेच नव्हती. मात्र ती सर्वांना देण्यापूर्वीच विषय मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली.

सर्वसाधारण सभा पावणेएक वाजता सुरू झाली व तीन वाजता दोन तासांमध्ये सर्व कामकाज संपविण्यात आले. यामधील अर्धा तास श्रद्धांजली वाहण्यासाठी व अर्धा तास प्रश्नोत्तराच्या तासाला देण्यात आला होता. ८ नगरसेवकांनी सभागृहात लेखी प्रश्न उपस्थित केले होते, परंतु फक्त दोनच नगरसेवकांना त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करता आली. प्रश्नोत्तराचा तास संपल्याचे कारण देवून इतरांना बोलू दिले नाही.नगरसेवकांनी मागणी करूनही वेळ वाढवून दिला नाही. प्रश्नोत्तरानंतर पुढील एक तासामध्ये तब्बल १२३ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले. सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांना विषयांचे गांभीर्य नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. निवडणुका होणार असल्यामुळे ही घाई करण्यात आली आहे. चर्चा झाली नसल्यामुळे प्रस्तावांमधील त्रुटींना जबाबदार कोण असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.नगरसेवकांची उदासीनता; नागरिकांकडूनही नाराजी व्यक्तसर्वसाधारण सभेला अनेक नगरसेवकांनी दांडी मारली. सकाळी ११ वाजता सभेची वेळ होती, परंतु तेव्हा एकही नगरसेवक सभागृहात नव्हता. साडेबारा वाजता फक्त १४ नगरसेवक उपस्थित होते. पावणेएक वाजता ४५ व एक वाजता ६० नगरसेवक होते. पावणेतीन वाजता सभागृहात ३१ जणच उपस्थित होते. महापालिकेमध्ये १११ लोकनियुक्ती व ५ स्वीकृत असे एकूण ११६ नगरसेवक आहेत. सभा संपली तेव्हा फक्त ३४ जणच उपस्थित होते. यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली.दोन कार्यकारी अभियंत्यांना नोटीसशहर अभियंत्यांनी महापालिका कार्यक्षेत्रामधील खड्डे दुरुस्तीच्या कामामध्ये निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून कार्यकारी अभियंता संजय देसाई व अनिल नेरपगार यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याचे सभागृहात सांगितले.दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. समाधानकारक उत्तर न दिल्यास निलंबनाची कारवाईही केली जाईल, असेही सभागृहात स्पष्ट केले.शिवसेना नगरसेवकाचा सभात्यागसानपाडा येथील शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर यांना त्यांच्या प्रभागामधील विषयावर चर्चा करू दिली नाही. त्यांनी हात वर केला असतानाही प्रस्ताव घाईमध्ये मंजूर करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या वास्कर यांनी विषयपत्रिका फेकून निषेध व्यक्त केला. त्यांनी व कोमल वास्कर यांनी या मनमानीचा निषेध करून सभात्याग केला.नाल्यांच्या दुरवस्थेचे सभागृहात उमटले पडसादसीबीडीमधील नाल्याच्या दुरुस्तीच्या एकमेव प्रस्तावावर सभागृहात चर्चा झाली. रामदास पवळे, अशोक गुरखे, शुभांगी पाटील, शंकर मोरे, शशिकला पाटील, लता मढवी, सुरेखा नरबागे, कविता आंगोडे, रामचंद्र घरत, देविदास हांडे पाटील, प्रशांत पाटील, मुनावर पटेल, रवींद्र इथापे यांनी शहरातील नाले, भुयारी मार्ग व पादचारी पुलांच्या दुरवस्थेविषयी नाराजी व्यक्त केली. मागणी करूनही नाल्यांची कामे केली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. महापौर जयवंत सुतार यांनीही सदस्यांनी मांडलेल्या भावना लक्षात घेवून नाले, पादचारी पूल व भुयारी मार्गांची कामे लवकर करण्याचे आदेश दिले.सभागृहात कोरमही अपूर्णमहापालिकेची सभा सुरू करण्यासाठी साधारणत: ३७ नगरसेवक सभागृहात असणे आवश्यक आहे. कोरम पूर्ण होत नसल्याने सभा दोन तास उशिरा सुरू झाली. सभेच्या शेवटच्या पंधरा मिनिटामध्ये कोरम पूर्ण होईल एवढेही संख्याबळ नव्हते. परंतु विरोधकांनीही आक्षेप घेतला नसल्याने सर्व विषय मंजूर करण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका