शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

दोन तासांत सभा उरकली; तब्बल १२३ कोटींचे प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 23:38 IST

११६ पैकी शेवटपर्यंत ३४ नगरसेवकच उपस्थित

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. यामुळे महानगरपालिकेमध्ये विकासकामांचे प्रस्ताव मार्गी लावण्याची घाई सुरू झाली आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये तब्बल १२३ कोटी रुपयांचे ५४ प्रस्ताव चर्चा न करताच मंजूर करण्यात आले. ११६ नगरसेवकांपैकी शेवटपर्यंत फक्त ३४ नगरसेवकच उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक महिन्याच्या २० तारखेच्या दरम्यान सर्वसाधारण सभेचे आयोजन करत असते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे सप्टेंबर महिन्याची सभा १३ सप्टेंबरलाच आयोजित करण्यात आली. सकाळी ११ वाजता सभा सुरू होणे अपेक्षित होते. परंतु नगरसेवक वेळेत उपस्थित न झाल्यामुळे दोन तास उशिरा सभेचे कामकाज सुरू झाले. साडेबारा वाजता फक्त १४ नगरसेवक उपस्थित होते. एक वाजता ११६ नगरसेवकांपैकी फक्त ६० नगरसेवक उपस्थित होते. विषय पत्रिकेवर प्रशासनाने पाठविलेले ९ विषय होते. आयत्या वेळी ४५ प्रस्ताव मांडण्यात आले. रोडचे काँक्रीटीकरण, पदपथ निर्मिती, उद्यानांची सुधारणा व इतर अनेक महत्त्वाचे विषय सभागृहात मांडण्यात आले. एकाही विषयावर चर्चा करण्यात आली नाही. सभागृह नेत्यांनी प्रस्ताव मांडले की तत्काळ मंजूर झाल्याची घोषणा करून दुसरा प्रस्ताव मंजुरीसाठी घेतला जात होता. एका प्रस्तावावर शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी बोलण्यासाठी हात वर केला, परंतु त्यांना बोलू न देता विषय मंजूर करण्यात आला. शेवटचे दोन प्रस्ताव मांडण्याची घोषणा करण्यात आली, परंतु त्या प्रस्तावांची विषयपत्रिकाही कोणाकडेच नव्हती. मात्र ती सर्वांना देण्यापूर्वीच विषय मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली.

सर्वसाधारण सभा पावणेएक वाजता सुरू झाली व तीन वाजता दोन तासांमध्ये सर्व कामकाज संपविण्यात आले. यामधील अर्धा तास श्रद्धांजली वाहण्यासाठी व अर्धा तास प्रश्नोत्तराच्या तासाला देण्यात आला होता. ८ नगरसेवकांनी सभागृहात लेखी प्रश्न उपस्थित केले होते, परंतु फक्त दोनच नगरसेवकांना त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करता आली. प्रश्नोत्तराचा तास संपल्याचे कारण देवून इतरांना बोलू दिले नाही.नगरसेवकांनी मागणी करूनही वेळ वाढवून दिला नाही. प्रश्नोत्तरानंतर पुढील एक तासामध्ये तब्बल १२३ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले. सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांना विषयांचे गांभीर्य नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. निवडणुका होणार असल्यामुळे ही घाई करण्यात आली आहे. चर्चा झाली नसल्यामुळे प्रस्तावांमधील त्रुटींना जबाबदार कोण असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.नगरसेवकांची उदासीनता; नागरिकांकडूनही नाराजी व्यक्तसर्वसाधारण सभेला अनेक नगरसेवकांनी दांडी मारली. सकाळी ११ वाजता सभेची वेळ होती, परंतु तेव्हा एकही नगरसेवक सभागृहात नव्हता. साडेबारा वाजता फक्त १४ नगरसेवक उपस्थित होते. पावणेएक वाजता ४५ व एक वाजता ६० नगरसेवक होते. पावणेतीन वाजता सभागृहात ३१ जणच उपस्थित होते. महापालिकेमध्ये १११ लोकनियुक्ती व ५ स्वीकृत असे एकूण ११६ नगरसेवक आहेत. सभा संपली तेव्हा फक्त ३४ जणच उपस्थित होते. यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली.दोन कार्यकारी अभियंत्यांना नोटीसशहर अभियंत्यांनी महापालिका कार्यक्षेत्रामधील खड्डे दुरुस्तीच्या कामामध्ये निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून कार्यकारी अभियंता संजय देसाई व अनिल नेरपगार यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याचे सभागृहात सांगितले.दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. समाधानकारक उत्तर न दिल्यास निलंबनाची कारवाईही केली जाईल, असेही सभागृहात स्पष्ट केले.शिवसेना नगरसेवकाचा सभात्यागसानपाडा येथील शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर यांना त्यांच्या प्रभागामधील विषयावर चर्चा करू दिली नाही. त्यांनी हात वर केला असतानाही प्रस्ताव घाईमध्ये मंजूर करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या वास्कर यांनी विषयपत्रिका फेकून निषेध व्यक्त केला. त्यांनी व कोमल वास्कर यांनी या मनमानीचा निषेध करून सभात्याग केला.नाल्यांच्या दुरवस्थेचे सभागृहात उमटले पडसादसीबीडीमधील नाल्याच्या दुरुस्तीच्या एकमेव प्रस्तावावर सभागृहात चर्चा झाली. रामदास पवळे, अशोक गुरखे, शुभांगी पाटील, शंकर मोरे, शशिकला पाटील, लता मढवी, सुरेखा नरबागे, कविता आंगोडे, रामचंद्र घरत, देविदास हांडे पाटील, प्रशांत पाटील, मुनावर पटेल, रवींद्र इथापे यांनी शहरातील नाले, भुयारी मार्ग व पादचारी पुलांच्या दुरवस्थेविषयी नाराजी व्यक्त केली. मागणी करूनही नाल्यांची कामे केली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. महापौर जयवंत सुतार यांनीही सदस्यांनी मांडलेल्या भावना लक्षात घेवून नाले, पादचारी पूल व भुयारी मार्गांची कामे लवकर करण्याचे आदेश दिले.सभागृहात कोरमही अपूर्णमहापालिकेची सभा सुरू करण्यासाठी साधारणत: ३७ नगरसेवक सभागृहात असणे आवश्यक आहे. कोरम पूर्ण होत नसल्याने सभा दोन तास उशिरा सुरू झाली. सभेच्या शेवटच्या पंधरा मिनिटामध्ये कोरम पूर्ण होईल एवढेही संख्याबळ नव्हते. परंतु विरोधकांनीही आक्षेप घेतला नसल्याने सर्व विषय मंजूर करण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका