- प्रशांत शेडगे, पनवेलपनवेल परिसरातून जजाणाऱ्या मुख्य नद्यांचे शुध्दीकरण आणि परिसराचे सुशोभिकरण करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय तालुका प्रशासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत लवकरच नद्यांच्या पात्रातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व्हेक्षणानंतर विशेष अतिक्रमण मोहिम राबविण्यात येणार आहे. पनवेल परिसरातून गाढी, काळुंद्रे, कासाडी या महत्वाच्या नदया वाहतात. या नदया हंगामी स्वरूपाच्या आहेत. डोंगरातून या नदयांचा उगम होतो आण ित्या खाडीला जावून मिळतात. यापैकी गाढी नदी मुख्य नदी म्हणून ओळखली जाते. माथेरानच्या डोंगररांगातून ही नदी वाहत येते. गाढेश्वरपासून या नदीचे पात्र मोठे होत जात असून छोटे छोटे ओढे या नदीला येवून मिळतात.या नदीचे पात्र मोठे असले तरी त्यामध्ये खडक आहेत त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातील लोकांनी नदीच्या काठेवर अतिक्र मण केले आहे. त्यामुळे २६ जुलै २00५ मध्ये नद्यांच्या पात्रातून पाणी बाहेर आल्याने पनवेल परिसरात महाप्रलय आला होता. विशेष म्हणजे यानंतरही अतिक्रमणे जैसे थे अवस्थेत आहेत. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सुकापुर, देवद, विचुंबे, आकुर्ली, नेरे या गावांच्या हद्दीतही नद्यांच्या पात्रात अतिक्रमण उभारली आहेत. त्यामुळे नदीतून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होत. काळुंद्रे नदीची स्थिती फारशी चांगली नाही, अतिक्रमण काठावर आहेत. त्यामुळे नदीचे पात्र काही प्रमाणात अरूंद झाले आहे. . कासाडी नदी शिरवलीच्या डोंगरातून उगम पावून ती तळोजा एमआयडीसी परिसरातून खाडीला जावून मिळते. या नदीच्या पात्रालगत काही कारखाने तसेच इतरांनी अतिक्र मण केले आहे. त्यामुळे कासाडी नेमकी गटारगंगा आहे , नदी का नाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेवून गंगा नदीच्या धर्तीवर पनवेलच्या मुख्य नदयाचे जलशुध्दीकर करण्याचा निर्णय घेतला. या संकल्पनेला तालुका प्रशासनाने चांगले बळ दिले असून ८ एप्रील रोजी गाढी नदीची परिक्र मा करून या अभियानाला सुरूवात करण्यात आली.दोन दिवसापुर्वी या संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी उगमापासून ते मुखापर्यंत सर्ऱ्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये अनिधकृत बांधकाम किती आहेत याबाबत माहिती घेण्यात येणार आहे.त्यानंतर संबधीत अतिक्र मणावर त्वरीत कारवाई करून नदीचे पात्र तसेच आजूबाजूचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश आमदार प्रशांत ठाकूर आणि तहसिलदार दिपक आकडे यांनी दिले आहेत. ही जबाबदारी गटविकास अधिकारी आणि पनवेल नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. लवकरच बैठकमुख्य नदीचे शुध्दीकरण आण िसुशोभिकरण हे लोकसहभागातून करण्यात येणार आहे. याकरीता मोठया प्रमाणात निधीची गरज भासणार आहे. कंपन्याकडे सामाजिक उपक्र माकरीता निधी राखीव ठेवला जातो. त्याचा वापर या अभियानाकरीता करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार पनवेल परिसरात कंपनी मालकांची लवकरच बैठक बोलाविण्यात येणार आहे.नद्या शुध्दीकरणआणि सुशोभिकरणाचा महत्वकांक्षी प्रकल्प आपण हाती घेतला आहे. सर्वात आगोदर नदयांचे पात्र आण िलगत असलेले अतिक्र मण हटविण्याचा आमचा मानस आहे. त्याकरीता संबधीत विभागांना सर्व्हेक्षण करण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहे. त्याचबरोबर बीडीओ आणि सीओ यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवून अतिक्रमणे हटविण्यात येईल- दीपक आकडे, तहसीलदार, पनवेल
नद्यांच्या पात्रातील अतिक्रमण हटविणार
By admin | Updated: April 24, 2016 00:26 IST