शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलू देणार नाही, रामदास आठवलेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 03:36 IST

रिपब्लिकन पक्ष आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलू देणार नाही व त्याकडे वाकड्या नजरेने कोणाला पाहताही येणार नाही, असा इशारा राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला अहो.

नवी मुंबई - रिपब्लिकन पक्ष आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलू देणार नाही व त्याकडे वाकड्या नजरेने कोणाला पाहताही येणार नाही, असा इशारा राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला अहो. सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते वाशीत उपस्थित होते. सदर कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.पॅथर नामदेवराव गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाजरत्न’ व ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी आठवले यांनी बाबासाहेबांच्या संविधानात बदल होऊ देणार नाही, अथवा त्याकडे कोणाला वाकड्या डोळ्यानेही पाहू देणार नाही, असा इशारा दिला. सदर कार्यक्रमाचे आयोजन विजय कांबळे, एल. आर. गायकवाड, नारायण मोरे, सचिन कटारे, भरत भालेराव, विशाल कांबळे तर आयोजन ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष गायकवाड, सुमित्रा गायकवाड व विठ्ठल गायकवाड यांनी केले होते. रिपब्लिकन ऐक्यासाठी पॅथरसारखी संघटना बरखास्त करावी लागली; पण आज एकत्र येण्याऐवजी अनेक जण नवनवीन गट काढत आहेत, असे गट काढण्यापेक्षा नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असेही आठवले म्हणाले.या प्रसंगी प्रा. सुषमा अंधारे, सुमंतराव गायकवाड, नगरसेवक जगदिश गायकवाड, जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ, चंद्रकांत जगताप, नागेश कांबळे, आप्पासाहेब शिवशरण, युवराज मोरे, टिळक जाधव, शीलाताई बोदडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई