शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

... मग गणपती कपाटात बसवायचे का ? नवी मुंबईत 'राजगर्जना'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 18:59 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नवी मुंबईतील मनसे कर्मचारी मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या संबंधित प्रश्नांवर राज यांनी प्रकाश टाकला.

नवी मुंबई - गणपती बसवण्यासाठी महापालिका आणि सरकारकडून जागा निश्चित केली जात आहे. मग गणपती कपाटात बसवू का ?. सगळ्या धर्मांना नियम का नाहीत. रस्त्यावरचे नमाज का बंद होत नाहीत, भोंगे का उतरत नाहीत, सगळ्या धर्मांना समान न्याय हवा, अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्य सरकार आणि महापालिकेंवर तोफ डागली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी सरकारला प्रश्न विचारला आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नवी मुंबईतील मनसे कर्मचारी मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या संबंधित प्रश्नांवर राज यांनी प्रकाश टाकला. सरकार करोडो कोटींच्या घोषणा करते, पण देशातील रिक्त जागा का भरत नाही, असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. तसेच एका वर्तमानपत्राचा संदर्भ देत, देशात 24 लाख जाग रिक्त असल्याचेही राज यांनी म्हटले. देशात 24 लाख जागा रिक्त आहेत. पण सरकार या जागा का भरत नाही. याची कारणे म्हणजे सरकार काम करत नाही, सरकारकडे पैसै नाहीत किंवा सरकारची इच्छाच नाही, असे राज यांनी म्हटले. देशातील 24 लाख जागांची वर्गवारी करताना, 10 लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. 5 लाख 40 हजार पोलिसांच्या जागा रिक्त, 2 लाख 20 हजार अंगणवाडी सेविका आहेत. तर आरोग्यसेवकांच्याही लाखो जागा रिक्त असल्याचे राज यांनी सांगितले. सरकार केवळ घोषणा करते, काम काहीही नाही. मीही नवी मुंबईसाठी 50 हजार कोटी देण्याची घोषणा करतो, असा उपरोधात्मक टोलाही राज यांनी लगावला.

आगामी गणेशोत्सवासाठी सरकार जागा निश्चित करुन देणार आहे. याबाबत बोलताना राज्य सरकार आणि महापालिकेवर राज यांनी तोफ डागली. जर सरकारच गणपती मंडळासाठी जागा ठरवणार असले तर, मग गणपती कपाटात बसवू का ?. सगळ्या धर्मांना नियम का नाहीत. रस्त्यावरचे नमाज का बंद होत नाहीत, भोंगे का उतरत नाहीत, सगळ्या धर्मांना समान न्याय हवा, असा आक्रमक पवित्रा राज यांनी घेतला. देशातील आंदोलनावरुनही राज यांनी सरकारला लक्ष्य केले. तसेच आंदोलानातून मराठी तरुणांवर विनाकारण गुन्हे दाखल केले जात असल्याचेही राज यांनी म्हटले. 

राज यांच्या भाषणातील मुद्दे  - 

* सरकारचे देशावर हिप्नॉटिझम चे प्रयोग सुरू आहेत, जसजशा निवडणूक येतील मी मागची आठवण करून देईल.* सगळ्या खासगीसंस्था, नोकऱ्या आहेत कुठे ? जे चाललंय त्यात हात घालायच्याऐवजी योगा करत बसले, असा मोदींना टोला. नोटबंदीनंतर साडेतीन कोटी नागरिकांची नोकरी गेली.  * मराठीचे अस्तित्व टिकवायचे असेल तर आजुबाजूला काय चाललंय यावर नागरिकांचीही नजर पाहिजे. जन्माला आलोय म्हणून जगू नका, जन्माला काहीतरी अर्थ उद्देश पाहिजे.* फक्त नोकऱ्यांची संघटना नको, जागता पहारेकरी म्हणून काम करा. मात्र मोदींसारखा पहारेकरी नको.* महाराष्ट्रात बांग्लादेशींचे मोहोलले उभे राहत आहेत. झोपड्या उभारून एसआरए राबवाययचा आणि पैसे कमवायचे. जागा गिळण्यासाठी राज्याबाहेरुन लोक आणली जात आहेत.* प्रत्येक धर्माला सरकारने न्याय द्यावा, * मराठीच अस्तित्व पुसलं जाणार नाही याची काळजी घ्या* हिंसा करणाऱ्यांचा महाराष्ट्राचा संबंध नाही. बदनाम मात्र तुम्ही होताय. हक्क घेताना मनगटे पण आपली पाहिजेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMumbaiमुंबईNarendra Modiनरेंद्र मोदी