शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

... मग गणपती कपाटात बसवायचे का ? नवी मुंबईत 'राजगर्जना'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 18:59 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नवी मुंबईतील मनसे कर्मचारी मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या संबंधित प्रश्नांवर राज यांनी प्रकाश टाकला.

नवी मुंबई - गणपती बसवण्यासाठी महापालिका आणि सरकारकडून जागा निश्चित केली जात आहे. मग गणपती कपाटात बसवू का ?. सगळ्या धर्मांना नियम का नाहीत. रस्त्यावरचे नमाज का बंद होत नाहीत, भोंगे का उतरत नाहीत, सगळ्या धर्मांना समान न्याय हवा, अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्य सरकार आणि महापालिकेंवर तोफ डागली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी सरकारला प्रश्न विचारला आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नवी मुंबईतील मनसे कर्मचारी मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या संबंधित प्रश्नांवर राज यांनी प्रकाश टाकला. सरकार करोडो कोटींच्या घोषणा करते, पण देशातील रिक्त जागा का भरत नाही, असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. तसेच एका वर्तमानपत्राचा संदर्भ देत, देशात 24 लाख जाग रिक्त असल्याचेही राज यांनी म्हटले. देशात 24 लाख जागा रिक्त आहेत. पण सरकार या जागा का भरत नाही. याची कारणे म्हणजे सरकार काम करत नाही, सरकारकडे पैसै नाहीत किंवा सरकारची इच्छाच नाही, असे राज यांनी म्हटले. देशातील 24 लाख जागांची वर्गवारी करताना, 10 लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. 5 लाख 40 हजार पोलिसांच्या जागा रिक्त, 2 लाख 20 हजार अंगणवाडी सेविका आहेत. तर आरोग्यसेवकांच्याही लाखो जागा रिक्त असल्याचे राज यांनी सांगितले. सरकार केवळ घोषणा करते, काम काहीही नाही. मीही नवी मुंबईसाठी 50 हजार कोटी देण्याची घोषणा करतो, असा उपरोधात्मक टोलाही राज यांनी लगावला.

आगामी गणेशोत्सवासाठी सरकार जागा निश्चित करुन देणार आहे. याबाबत बोलताना राज्य सरकार आणि महापालिकेवर राज यांनी तोफ डागली. जर सरकारच गणपती मंडळासाठी जागा ठरवणार असले तर, मग गणपती कपाटात बसवू का ?. सगळ्या धर्मांना नियम का नाहीत. रस्त्यावरचे नमाज का बंद होत नाहीत, भोंगे का उतरत नाहीत, सगळ्या धर्मांना समान न्याय हवा, असा आक्रमक पवित्रा राज यांनी घेतला. देशातील आंदोलनावरुनही राज यांनी सरकारला लक्ष्य केले. तसेच आंदोलानातून मराठी तरुणांवर विनाकारण गुन्हे दाखल केले जात असल्याचेही राज यांनी म्हटले. 

राज यांच्या भाषणातील मुद्दे  - 

* सरकारचे देशावर हिप्नॉटिझम चे प्रयोग सुरू आहेत, जसजशा निवडणूक येतील मी मागची आठवण करून देईल.* सगळ्या खासगीसंस्था, नोकऱ्या आहेत कुठे ? जे चाललंय त्यात हात घालायच्याऐवजी योगा करत बसले, असा मोदींना टोला. नोटबंदीनंतर साडेतीन कोटी नागरिकांची नोकरी गेली.  * मराठीचे अस्तित्व टिकवायचे असेल तर आजुबाजूला काय चाललंय यावर नागरिकांचीही नजर पाहिजे. जन्माला आलोय म्हणून जगू नका, जन्माला काहीतरी अर्थ उद्देश पाहिजे.* फक्त नोकऱ्यांची संघटना नको, जागता पहारेकरी म्हणून काम करा. मात्र मोदींसारखा पहारेकरी नको.* महाराष्ट्रात बांग्लादेशींचे मोहोलले उभे राहत आहेत. झोपड्या उभारून एसआरए राबवाययचा आणि पैसे कमवायचे. जागा गिळण्यासाठी राज्याबाहेरुन लोक आणली जात आहेत.* प्रत्येक धर्माला सरकारने न्याय द्यावा, * मराठीच अस्तित्व पुसलं जाणार नाही याची काळजी घ्या* हिंसा करणाऱ्यांचा महाराष्ट्राचा संबंध नाही. बदनाम मात्र तुम्ही होताय. हक्क घेताना मनगटे पण आपली पाहिजेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMumbaiमुंबईNarendra Modiनरेंद्र मोदी