शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

सिडकोने वसविलेले शहर कुठे हरविले?

By नारायण जाधव | Updated: October 10, 2022 10:25 IST

खरे पाहिले तर नवी मुंबई महापालिकेची नियोजन प्राधिकरण म्हणून स्थापना केल्यानंतर येथील भूखंडाचे मालक असलेल्या सिडकोनेही कोणताही भूखंड विकताना महापालिकेची परवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे

नारायण जाधव,उप-वृत्तसंपादकशिरा का होईना, अखेर नवी मुंबई महापालिकेने आपला विकास आराखडा प्रसिद्ध करून हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. वास्तविक पाहता, नवी मुंबई महापालिकेची स्थापना १९९२ मध्ये झाली. त्यानंतर १९९५ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट आली. नगररचना कायदा १९६६ नुसार महापालिकेची नियोजन प्राधिकरण म्हणून स्थापना झाल्यानंतर प्रशासनाने त्यानंतरच्या चार वर्षांत शहराच्या पुढील २० वर्षांच्या विकासाचा विचार करून विकास आराखडा तयार करून त्यास शासनाची मंजुरी करून काम करणे अपेक्षित असते; परंतु, नवी मुंबई महापालिकेत त्यासाठी जे सहायक नगरचनाकार आले, त्यांनी गेल्या ३० वर्षांत असा विकास आराखडा तयार करण्याऐवजी स्क्वेअर फुटांमागे मिळणारा मलिदा लाटण्यासाठी वाट्टेल त्या भूखंडावरील इमारतींना सीसी- ओसी देण्यात धन्यता मानली. यामुळे सिडकोने वसविलेल्या या सुनियोजित शहराची चांगलीच वासलात लागली आहे.

येथील गावठाण म्हणजे अनधिकृत बांधकामांचे आगर झाले आहे. शिवाय, महापालिकेने झोपेचे साेंग घेतल्याने सिडकोनेही वाहत्या गंगेत हात धुवून शहरातील मोक्याचे आरक्षित भूखंड महापालिकेची परवानगी न घेताच विकून स्वत:चे भले करून घेतले आहे. खरे पाहिले तर नवी मुंबई महापालिकेची नियोजन प्राधिकरण म्हणून स्थापना केल्यानंतर येथील भूखंडाचे मालक असलेल्या सिडकोनेही कोणताही भूखंड विकताना महापालिकेची परवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे; परंतु, आपल्या आर्थिक दादागिरीच्या जोरावर सिडकोने वाट्टेल तशी मनमानी केली. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारचे भूखंड विकले.  सिडकोच्या या बाजारू प्रवृत्तीचा त्रास नवी मुंबईकरांना भोगावा लागत आहे. छोट्या रस्त्यांलगत शाळा, सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करता यावा, यासाठी क्रिसिलसारख्या नामवंत संस्थेकडून महापालिकेने अहवाल तयार करून घेतला आहे. या अहवालानेच नवी मुंबई शहराची कशी वासलात लागली आहे, याचा बुरखा फाडला आहे.  

माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी अंधारातच होते. नंतर आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह काही सामाजिक संस्थांनी वाचा फोडली. त्याला माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी चळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले. भगत यांनी आठवडाभर संपूर्ण शहरात जनजागृती करून तब्बल १२ हजार हरकती गोळा करून विकास आराखडा कसा चुकीचा आहे, हे दाखवून दिले आहे. या हरकतींवर आता नवे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हे तर अनौरस अपत्यवास्तविक पाहता सिडकोनेही नवी मुंबईचा विकास आराखडा तयार केलेला नाही. त्यांचा आराखडा ढोबळ आहे. ‘प्लॉट टू प्लाॅट’, कोणते आरक्षण कसे असेल व त्यास शासनाची मंजुरी न घेताच सिडकोने नवी मुंबई नामक शहर वसविले. त्यास शासनानेही मूक संमती दिली आहे. म्हणूनच की काय विकास आराखडा मंजूर नसतानाही वसविलेले नवी मुंबई हे एकमेव सुनियोजित नगर आहे. यामुळे काही नगररचना तज्ज्ञ नवी मुंबईची गंमतीने सिडको आणि महाराष्ट्र शासनाचे ‘अनौरस अपत्य’ म्हणून अवहेलना करतात. यातील विनोद सोडला, तर हा विषय खूपच गंभीर आहे, हे नक्की.

टॅग्स :cidcoसिडको