शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

उरणसह नवी मुंबईच्या सुरक्षेचे काय..?

By नारायण जाधव | Updated: May 12, 2025 03:07 IST

भारत-पाकिस्तानमधील  तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात माॅक ड्रिल घेण्यात आले.

नारायण जाधव, उपवृत्तसंपादक

भारत-पाकिस्तानमधील  तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात माॅक ड्रिल घेण्यात आले. यात राज्यातील अतिसंवेदनशील श्रेणी १ चे ठिकाण म्हणून उरण परिसराचा समावेश केला होता. कारण, उरणमध्ये केंद्र, राज्य आणि खासगी आणि नौदलाचे मोठे प्रकल्प आहेत. अटल सेतूनंतर नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरू होणार आहे. २६/११ नंतर देशात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या बाबतीत जरा काही झाले, तर उरण परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जातात; परंतु कायमस्वरूपी तोडगा कोणी शोधत नाही.  

उरणचा समुद्रकिनारा दक्षिण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. उरणचा समुद्रकिनारा खोल असल्याने ८० च्या दशकात येथे देशातील सर्वांत मोठ्या  जवाहरलाल नेहरू बंदराची पायाभरणी केली. आज त्याचा मोठा विस्तार झाला आहे. येथेच ‘ओएनजीसी’चा सर्वांत मोठा प्रकल्प आहे. येथे जमीन आणि समुद्राखालून ऑइल आणि रसायनांच्या पाइपलाइन गेल्या आहेत. याच परिसरात बुचर आयलँडसह जगप्रसिद्ध एलिफंटाबेटावर ‘युनेस्को’चे वारसास्थळ असलेल्या घारापुरी लेणी आहेत. तेथे पर्यटकांचा ओघ असताे. मात्र, दोन पोलिस शिपाई वगळता ठोस बंदोबस्त आजही नेमलेला नाही.

नौदलाचा आयएनएस आंग्रे हा तळ उरणमध्येच आहे. नौदलाची जहाजे, पाणबुड्यांचा  शस्त्रसाठा येथेच ठेवला जातो.  २६/११ च्या हल्ल्यानंतर नौदलाने मच्छीमार नौकांचे अवागमन असलेल्या राज्यांतील ५९१ लँडिंग पॉइंट्सची तपासणी केली होती. त्यात ९१ पॉइंट्स अतिरेकी हल्ल्यांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आढळले होते. या सर्व ठिकाणी कडक सुरक्षा तैनात करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नौदलाने नोंदविले होते.

‘जेएनपीए’च्या ५०० हेक्टर केमिकल झोनमध्ये मोठमोठे अतिसंवेदनशील प्रकल्प आहेत. यात इंडियन ऑइल,  रिलायन्स, आयएमसी, गणेश बॅन्जो प्लास्ट, सूरज ॲग्रो, बीपीसीएल लिक्विड कार्गो जेट्टीचा समावेश आहे. उरणपासून ८ ते १० किमी सागरी अंतरावर भाऊचा धक्का, ११ किमीवर गेट वे ऑफ इंडिया, ६ किमी सागरी अंतरावर अतिसंवेदनशील बुचर आयलँड आहे. येथूनच तेलवाहू जहाजांची वाहतूक केली जाते. सीलिंक, वाशी खाडी पूल येथून जवळच आहे. रासायनिक व संवेदनशील प्रकल्पात दुर्घटना घडल्यास ३० किमी परिघातील परिसराला धोका संभवतो. यावरून हा परिसर अतिसंवेदनशील असल्याचे अधोरेखीत होते. मात्र, सागरी गस्तीसाठी नवी मुंबईपोलिसांकडे अवघ्या तीन  साध्या स्पीड बोटी आहेत. कोस्ट गार्ड आणि नौदल गस्त घालत असले, तरी ती खोल समुद्रात जास्त असते. मग, किनाऱ्याच्या सुरक्षेचे काय, हा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईuran-acउरणPoliceपोलिस