शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

उरणसह नवी मुंबईच्या सुरक्षेचे काय..?

By नारायण जाधव | Updated: May 12, 2025 03:07 IST

भारत-पाकिस्तानमधील  तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात माॅक ड्रिल घेण्यात आले.

नारायण जाधव, उपवृत्तसंपादक

भारत-पाकिस्तानमधील  तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात माॅक ड्रिल घेण्यात आले. यात राज्यातील अतिसंवेदनशील श्रेणी १ चे ठिकाण म्हणून उरण परिसराचा समावेश केला होता. कारण, उरणमध्ये केंद्र, राज्य आणि खासगी आणि नौदलाचे मोठे प्रकल्प आहेत. अटल सेतूनंतर नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरू होणार आहे. २६/११ नंतर देशात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या बाबतीत जरा काही झाले, तर उरण परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जातात; परंतु कायमस्वरूपी तोडगा कोणी शोधत नाही.  

उरणचा समुद्रकिनारा दक्षिण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. उरणचा समुद्रकिनारा खोल असल्याने ८० च्या दशकात येथे देशातील सर्वांत मोठ्या  जवाहरलाल नेहरू बंदराची पायाभरणी केली. आज त्याचा मोठा विस्तार झाला आहे. येथेच ‘ओएनजीसी’चा सर्वांत मोठा प्रकल्प आहे. येथे जमीन आणि समुद्राखालून ऑइल आणि रसायनांच्या पाइपलाइन गेल्या आहेत. याच परिसरात बुचर आयलँडसह जगप्रसिद्ध एलिफंटाबेटावर ‘युनेस्को’चे वारसास्थळ असलेल्या घारापुरी लेणी आहेत. तेथे पर्यटकांचा ओघ असताे. मात्र, दोन पोलिस शिपाई वगळता ठोस बंदोबस्त आजही नेमलेला नाही.

नौदलाचा आयएनएस आंग्रे हा तळ उरणमध्येच आहे. नौदलाची जहाजे, पाणबुड्यांचा  शस्त्रसाठा येथेच ठेवला जातो.  २६/११ च्या हल्ल्यानंतर नौदलाने मच्छीमार नौकांचे अवागमन असलेल्या राज्यांतील ५९१ लँडिंग पॉइंट्सची तपासणी केली होती. त्यात ९१ पॉइंट्स अतिरेकी हल्ल्यांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आढळले होते. या सर्व ठिकाणी कडक सुरक्षा तैनात करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नौदलाने नोंदविले होते.

‘जेएनपीए’च्या ५०० हेक्टर केमिकल झोनमध्ये मोठमोठे अतिसंवेदनशील प्रकल्प आहेत. यात इंडियन ऑइल,  रिलायन्स, आयएमसी, गणेश बॅन्जो प्लास्ट, सूरज ॲग्रो, बीपीसीएल लिक्विड कार्गो जेट्टीचा समावेश आहे. उरणपासून ८ ते १० किमी सागरी अंतरावर भाऊचा धक्का, ११ किमीवर गेट वे ऑफ इंडिया, ६ किमी सागरी अंतरावर अतिसंवेदनशील बुचर आयलँड आहे. येथूनच तेलवाहू जहाजांची वाहतूक केली जाते. सीलिंक, वाशी खाडी पूल येथून जवळच आहे. रासायनिक व संवेदनशील प्रकल्पात दुर्घटना घडल्यास ३० किमी परिघातील परिसराला धोका संभवतो. यावरून हा परिसर अतिसंवेदनशील असल्याचे अधोरेखीत होते. मात्र, सागरी गस्तीसाठी नवी मुंबईपोलिसांकडे अवघ्या तीन  साध्या स्पीड बोटी आहेत. कोस्ट गार्ड आणि नौदल गस्त घालत असले, तरी ती खोल समुद्रात जास्त असते. मग, किनाऱ्याच्या सुरक्षेचे काय, हा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईuran-acउरणPoliceपोलिस