शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

बचतीत दडलाय प्रगतीचा मार्ग

By admin | Updated: October 30, 2014 22:31 IST

काटकसरीमध्ये प्रगतीचा मार्ग दडला असून देशाच्या हितासाठी प्रत्येकाने वीज, पाणी व इंधनाची बचत करणो आवश्यक आहे.

नामदेव मोरे - नवी मुंबई
काटकसरीमध्ये प्रगतीचा मार्ग दडला असून देशाच्या हितासाठी प्रत्येकाने  वीज, पाणी व इंधनाची बचत करणो आवश्यक आहे. 
देशातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईमध्ये समाधानकारक सार्वजनिक सुविधा उपलब्ध होत आहेत. दळणवळण, पाणी व विजेची टंचाई शहरात भासत नाही. परंतु या सुबत्तेमुळे नागरिकांमधील निष्काळजीपणा वाढत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीची उधळण सुरू आहे. नवी मुंबई महापालिकेने मोरबे धरण विकत घेतल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. शहरातील 65 टक्के परिसरात चोवीस तास पाणीपुरवठा होत आहे. शहरवासी रोज जवळपास 425 एमएलडी पाणी वापरत आहेत. मोठय़ा प्रमाणात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. उद्यानासाठीही पिण्याचा पाण्याचा वापर सुरू आहे. 
पाण्याप्रमाणो मुंबई, ठाणो, नवी मुंबईमध्ये विजेची मोठय़ा प्रमाणात उधळपट्टी सुरू आहे. शहरातील बाजारपेठा, मॉल्स व इतर ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त वीज वापरली जात आहे. शासकीय व खाजगी कार्यालयांमध्येही गरज नसताना वातानुकूलित यंत्रणा, पंखे सुरूच ठेवले जात आहेत. हे थांबविण्यासाठी आवश्यक वीज वापरणो आवश्यक आहे वीज, पाणी व इंधनाच्या बचतीमध्ये देशाच्या प्रगतीचा मार्ग दडला आहे. जबाबदारी ओळखून नैसर्गिक साधनसंपत्तीचा आवश्यक तेवढाच वापर करणो आवश्यक आहे.
 
च्प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. वाहने धुण्यासाठी व कुंडीतील झाडांना पाणी घालताना पाइपचा वापर करू नये. प्रसाधनगृहामध्ये फ्लशचा वापर करू नये. व्यावसायिक व घरगुती वापरासाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरणो आवश्यक आहे.
 
च्पाण्याची उधळपट्टी करताना कोणी आढळून आले तर संबंधितांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती नवी मुंबई पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली.
 
च्विजेचा अत्यंत काटकसरीने वापर करणो आवश्यक आहे. शहरांमध्ये अनावश्यक कामांसाठी विजेचा वापर होत असतो. शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये वातानुकूलित यंत्रणा, पंख्यांचा वापर आवश्यक तेवढा करावा. दिवसा घर व कार्यालयांमध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश येईल अशी रचना असावी.
 
च्विजेची उपकरणो कमीत कमी वापरावी. विजेची उधळपट्टी कोणालाच परवडणारी नसून प्रत्येक नागरिकाने स्वत:चे कर्तव्य समजून एक -एक युनिट वीज वाचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता ए. एम. थोरात यांनी केले आहे.